शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ठाण्यात चाचणी न करताच कोरोना रुग्णांना घरी सोडण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:46 IST

महापौरांचा गंभीर आरोप : आयुक्तांना लिहिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उपचारासाठी दाखल झाल्यानंतर सातव्या किंवा आठव्या दिवशी कोरोना रुग्णांना बरे वाटल्यानंतर तत्काळ घरी सोडले जात असल्याचा धक्कादायक आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. वास्तविक, घरी सोडण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी होणे गरजेचे असतानाही तसे केले जात नसल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा मागणीचे पत्र त्यांनी आयुक्त विजय सिंघल यांना दिले आहे.

ठाण्यात कोरोनावर १५४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ११५ रुग्ण हे बरे झाले असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, या मागचे वास्तव आता समोर येत आहे. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना सात ते आठ दिवसांत बरे वाटू लागल्यास आणि ताप येत नसल्यास पुन्हा चाचणी न करताच त्यांना घरी सोडले जात आहे.

वास्तविक पाहता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात स्पष्ट सांगितले होते की इतर राज्याप्रमाणे किंवा केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार नाही तर जोपर्यंत कोरोनाबाधीत रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही, त्याची चाचणी निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्याला घरी सोडू नये. परंतु, त्याकडेही खाजगी रुग्णालयांनी दुर्लक्ष केल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.शहरात झोपडपट्टी भागात रुग्ण वाढत आहेत. त्यात चाचणी न करता एखाद्याला घरी सोडले जात असेल आणि तो पूर्णपणे बरा झाला नसेल, तर त्याच्या संपर्कातील इतरांनाही लागण होऊ शकते. ही चिंतेची बाब असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. त्यातही या रुग्णालयांकडे विचारणा केली असता आमच्याकडे तशा स्वरुपाचे आदेश किंवा पत्र आलेले नसल्याचे सांगितले जात आहे.