शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 06:08 IST

रेल्वे फाटक बंद असतानाही त्याच्या खालून दुचाकी नेणाऱ्या दोन नाका कामगारांचा सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दिवा स्थानकात घडली.

डोंबिवली : रेल्वे फाटक बंद असतानाही त्याच्या खालून दुचाकी नेणाऱ्या दोन नाका कामगारांचा सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दिवा स्थानकात घडली. अंग्रेज चौधरी आणि रामचरण चौधरी (रा. बस्ती, उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे असल्याची प्राथमिक माहिती तपासाधिका-यांनी दिली.तपासाधिकारी पोलीस निरीक्षक एस. व्ही. ढाकणे यांनी सांगितले की, अंग्रेज आणि रामचरण हे दिवा गावातील एका घरात फरशी बसविण्यासाठी सोमवारी सकाळी आले होते. त्या वेळी फाटक बंद असतानाही ते पश्चिमेहून पूर्वेला रेल्वे फाटकातून दुचाकी नेत होते. मात्र, मुंबईकडे जाणाºया सेवाग्राम एक्स्प्रेसच्या वेगाचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे या एक्स्प्रेसची त्यांच्या दुचाकीला धडक बसून ते जखमी झाले. या दोघांना गावातील जीवनदीप रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.’अपघात घडल्यानंतर स्थानकात आरडाओरडा झाल्याने काही वेळ सेवाग्राम एक्स्प्रेस थांबली होती. यावेळी बघ्यांनी गर्दी केल्याने काही वेळ मदतकार्यात अडथळा आला. परंतु, रेल्वे पोलिसांनी त्यांना पांगवले.दिव्यातील म्हात्रे नामक व्यक्तीकडे फरशी बसविण्याचे काम करण्यासाठी अंग्रेज आणि रामचरण आले होते, पण ते कुठले रहिवासी होते, दिव्यात कधीपासून आले होते, काय काम करत होते, आदी तपशील मिळविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. अपघातग्रस्त दुचाकी ही कपिल माळी यांच्या नावे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे, परंतु माळी यांनी मोबाइल फोन न उचलल्याने दुचाकी त्या दोघांकडे कशी आली, याची माहिती मिळविण्यात अडथळे आल्याचे ढाकणे यांनी सांगितले.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, मध्य रेल्वेच्या उपनगरीय यात्री उपभोक्ता समितीचे सदस्य अ‍ॅड. आदेश भगत यांनी घटनास्थळी पाहणी केली. ते म्हणाले की, ‘गेटमनने दुचाकीस्वारांना फाटक बंद असल्याचे सांगितले होते, परंतु त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. ते पुढे गेल्याने अपघात झाला.’>...तरीही रूळ ओलांडणे सुरूचदिवा स्थानकातील या अपघातानंतर पूर्वेला रेल्वे फाटकाजवळ रेल्वे सुरक्षा बलाचे दोन पोलीस तैनात करण्यात आले. मात्र, तरीही प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडून प्रवास करत होते. त्यामुळे पोलीस हतबल असल्याचे दिसून आले.फाटकात कायमस्वरूपी पोलीस तैनात करावेत, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली असतानाही सुरक्षा यंत्रणा मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवास धोका आहे.