शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 06:08 IST

रेल्वे फाटक बंद असतानाही त्याच्या खालून दुचाकी नेणाऱ्या दोन नाका कामगारांचा सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दिवा स्थानकात घडली.

डोंबिवली : रेल्वे फाटक बंद असतानाही त्याच्या खालून दुचाकी नेणाऱ्या दोन नाका कामगारांचा सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दिवा स्थानकात घडली. अंग्रेज चौधरी आणि रामचरण चौधरी (रा. बस्ती, उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे असल्याची प्राथमिक माहिती तपासाधिका-यांनी दिली.तपासाधिकारी पोलीस निरीक्षक एस. व्ही. ढाकणे यांनी सांगितले की, अंग्रेज आणि रामचरण हे दिवा गावातील एका घरात फरशी बसविण्यासाठी सोमवारी सकाळी आले होते. त्या वेळी फाटक बंद असतानाही ते पश्चिमेहून पूर्वेला रेल्वे फाटकातून दुचाकी नेत होते. मात्र, मुंबईकडे जाणाºया सेवाग्राम एक्स्प्रेसच्या वेगाचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे या एक्स्प्रेसची त्यांच्या दुचाकीला धडक बसून ते जखमी झाले. या दोघांना गावातील जीवनदीप रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.’अपघात घडल्यानंतर स्थानकात आरडाओरडा झाल्याने काही वेळ सेवाग्राम एक्स्प्रेस थांबली होती. यावेळी बघ्यांनी गर्दी केल्याने काही वेळ मदतकार्यात अडथळा आला. परंतु, रेल्वे पोलिसांनी त्यांना पांगवले.दिव्यातील म्हात्रे नामक व्यक्तीकडे फरशी बसविण्याचे काम करण्यासाठी अंग्रेज आणि रामचरण आले होते, पण ते कुठले रहिवासी होते, दिव्यात कधीपासून आले होते, काय काम करत होते, आदी तपशील मिळविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. अपघातग्रस्त दुचाकी ही कपिल माळी यांच्या नावे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे, परंतु माळी यांनी मोबाइल फोन न उचलल्याने दुचाकी त्या दोघांकडे कशी आली, याची माहिती मिळविण्यात अडथळे आल्याचे ढाकणे यांनी सांगितले.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, मध्य रेल्वेच्या उपनगरीय यात्री उपभोक्ता समितीचे सदस्य अ‍ॅड. आदेश भगत यांनी घटनास्थळी पाहणी केली. ते म्हणाले की, ‘गेटमनने दुचाकीस्वारांना फाटक बंद असल्याचे सांगितले होते, परंतु त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. ते पुढे गेल्याने अपघात झाला.’>...तरीही रूळ ओलांडणे सुरूचदिवा स्थानकातील या अपघातानंतर पूर्वेला रेल्वे फाटकाजवळ रेल्वे सुरक्षा बलाचे दोन पोलीस तैनात करण्यात आले. मात्र, तरीही प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडून प्रवास करत होते. त्यामुळे पोलीस हतबल असल्याचे दिसून आले.फाटकात कायमस्वरूपी पोलीस तैनात करावेत, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली असतानाही सुरक्षा यंत्रणा मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवास धोका आहे.