शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कामगारांअभावी दोन हजार कोटींचा आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:48 IST

आनंदनगर एमआयडीसीला महिन्याला दोन हजार कोटींचे नुकसान होत असल्याची माहिती ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.

बदलापूर : सर्वात मोठी एमआयडीसी अशी ओळख असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीत कामगारांअभावी सध्या प्रचंड नुकसान होत आहे. परप्रांतीय कामगार गावी परतल्याने एमआयडीसीत ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आनंदनगर एमआयडीसीला महिन्याला दोन हजार कोटींचे नुकसान होत असल्याची माहिती ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.अंबरनाथ एमआयडीसीत १ हजारापेक्षा अधिक कंपन्या असून तिथे जवळपास २५ हजार परप्रांतीय कामगार काम करतात. यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कामगार गावाला गेल्याने कामगारांची चणचण एमआयडीसीत निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. शिवाय निर्यातही बंद आहे. त्यामुळे अंबरनाथ एमआयडीसीला महिन्याला तब्बल २ हजार कोटींचा आर्थिक फटका बसत असल्याची माहिती तायडे यांनी दिली. तर, दुसरीकडे मनसेने हा तुटवडा भरून काढण्यासाठी मराठी कामगारांना संधी द्यावी, अशी मागणी संघटनेकडे केली आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी एमआयडीसीत काम करण्याची इच्छा असलेल्या मराठी बेरोजगार तरुणांची यादीही संघटनेला दिली आहे.>अंबरनाथ एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक कामगार हे परराज्यांतील असल्याने त्याचा थेट फटका कंपनीच्या उत्पादनाला बसत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर कारखानदारांनी काम सुरू केले. मात्र, त्यांना हवे त्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच जे कामगार उपलब्ध आहेत, त्यांना ये-जा करण्यासाठी वाहतुकीची साधने नसल्याने ही परिस्थिती अधिकच बिघडली आहे.