शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कामगारांअभावी दोन हजार कोटींचा आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:48 IST

आनंदनगर एमआयडीसीला महिन्याला दोन हजार कोटींचे नुकसान होत असल्याची माहिती ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.

बदलापूर : सर्वात मोठी एमआयडीसी अशी ओळख असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीत कामगारांअभावी सध्या प्रचंड नुकसान होत आहे. परप्रांतीय कामगार गावी परतल्याने एमआयडीसीत ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आनंदनगर एमआयडीसीला महिन्याला दोन हजार कोटींचे नुकसान होत असल्याची माहिती ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.अंबरनाथ एमआयडीसीत १ हजारापेक्षा अधिक कंपन्या असून तिथे जवळपास २५ हजार परप्रांतीय कामगार काम करतात. यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कामगार गावाला गेल्याने कामगारांची चणचण एमआयडीसीत निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. शिवाय निर्यातही बंद आहे. त्यामुळे अंबरनाथ एमआयडीसीला महिन्याला तब्बल २ हजार कोटींचा आर्थिक फटका बसत असल्याची माहिती तायडे यांनी दिली. तर, दुसरीकडे मनसेने हा तुटवडा भरून काढण्यासाठी मराठी कामगारांना संधी द्यावी, अशी मागणी संघटनेकडे केली आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी एमआयडीसीत काम करण्याची इच्छा असलेल्या मराठी बेरोजगार तरुणांची यादीही संघटनेला दिली आहे.>अंबरनाथ एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक कामगार हे परराज्यांतील असल्याने त्याचा थेट फटका कंपनीच्या उत्पादनाला बसत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर कारखानदारांनी काम सुरू केले. मात्र, त्यांना हवे त्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच जे कामगार उपलब्ध आहेत, त्यांना ये-जा करण्यासाठी वाहतुकीची साधने नसल्याने ही परिस्थिती अधिकच बिघडली आहे.