शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

घोडबंदर भागात पातलीपाडा येथे संरक्षक भिंत घरांवर पडल्याने एकाचा मृत्यु , दोन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:58 IST

नाल्याच्या बाजूला असलेली आरक्षित भुखंडाची संरक्षक भिंत पाच घरांवर कोसळल्याने झालेल्या दुर्देवी घटनेत एकाचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोन जण जखमी झाल्याची घटना घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे घडली.

ठळक मुद्देसंरक्षक भिंतीच्या मुद्यावरुन संभ्रमदुरुस्तीची केली होती मागणी

ठाणे - दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने सोमवार पासून पुन्हा बरसण्यास सुरवात केली आहे. या पावसामुळे धोकादायक भिंत पाच घरांवर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यु झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका दहा वर्षीय मुलाचा समावेश आहे.                         सोमवार पासून ठाण्यात पुन्हा पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. मंगळवारी रात्रीपासूनच शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये पाच ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आगीची एक व अन्य १२ अशा एकूण २० तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती विभागाला प्राप्त झाल्या आहेत. परंतु यामध्ये एक संरक्षक भिंत पडल्याची देखील घटना घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे घडली आहे. नाल्याच्या बाजूला असलेल्या पाच झोपड्यांवर रात्री १२ च्या सुमारास ही भिंत पडली. यामध्ये प्रकाश वाळवे (३५) यांचा जागीचा मृत्यु झाला आहे. तर भारती वाळवे (२९) या गंभीर जखमी झाल्या असून समय जाधव हा १० वर्षीय मुलगा देखील यात जमखी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पालिका प्रशासनाला योग्य ते सहाकार्य करण्याच्या सुचना केल्या. दुसरीकडे ही भिंत पडल्याने येथील काही घरांमध्ये देखील नाल्याचे पाणी शिरले होते. परंतु आता या संरक्षक भिंतीच्या मुद्यावरुन अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. ज्या ठिकाणी ही संरक्षित भिंत उभी आहे, ती जागा पालिकेच्या टर्मनिलसाठी आरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु पालिकेने हा भुखंड अद्याप ताब्यात घेतलाच नसल्याचा दावा पालिकेच्या सुत्रांनी केला आहे. संबधीत जागा मालकानेच ही कच्ची भिंत उभारली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.दरम्यान ही कमकुवत झालेली संरक्षक भिंत दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत होती. परंतु ती न करण्यात आल्यानेच ही घटना घडली असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकाराला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAccidentअपघात