शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

दोन महिन्यांनी मिळाला ‘त्या’ सोसायटीला टँकर

By admin | Updated: April 10, 2016 01:20 IST

ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतही नागरिक पाणीकपातीमुळे त्रस्त झाले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतही नागरिक पाणीकपातीमुळे त्रस्त झाले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने टंचाईमुळे फेब्रुवारीत टँकर बुक केला होता. मात्र दोन महिने झाले तरी तो आला नाही. या संदर्भात ‘लोकमत’च्या गुरुवारच्या ‘हॅलो ठाणे’ मध्ये ‘टँकरचीही होतेय पळवापळवी’ अशी बातमी प्रसिद्ध होताच रविवारी पालिकेने या सोसायटीत टँकर पाठवला.या सोसयाटीने फेब्रुवारीत टँकर बुक केले होते. त्यापैकी दोन टँकर आले होते. मात्र उर्वरित टँकरसाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. पालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील अधिकारी केवळ टोलवाटोलवी करत होते. सोसयाटीने पाठपुरावा केला नसल्याने टँकर मिळाला नसेल, अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी दिली होती. वास्तविक अनेकदा सोसायटीचे रहिवाशी किंवा पदाधिकारी या कार्यालयात जात असत. पण तेथील अधिकारी दादच देत नव्हते. अखेर याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत रविवारी दुपारी टँकर आला. पाणी मिळाल्याने इमारतीतील रहिवाशांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. शास्त्रीनगरचा जलकुंभच भरत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेकडूनच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगण्यात आले. पूर्वी दुपारी १२ वाजता जलकुंभ भरत असत. मात्र आता दुपारी दोनपर्यंतही तो भरत नाही. आम्ही असेल तेवढे पाणी सोडतो असे, सूत्रांनी सांगितले. जेमतेम दीड तास आणि तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने टाकी भरत नाही. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र याच जलकुंभातून अन्य भागात व्यवस्थित पाणीपुरवठा कसा होतो, असा सवालही विचारला जात आहे.