शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
3
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
4
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
5
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
6
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
7
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
8
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
9
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
10
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
11
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
13
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
14
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
15
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
16
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
17
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
18
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
19
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
20
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस

दोन महिन्यांनी मिळाला ‘त्या’ सोसायटीला टँकर

By admin | Updated: April 10, 2016 01:20 IST

ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतही नागरिक पाणीकपातीमुळे त्रस्त झाले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतही नागरिक पाणीकपातीमुळे त्रस्त झाले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने टंचाईमुळे फेब्रुवारीत टँकर बुक केला होता. मात्र दोन महिने झाले तरी तो आला नाही. या संदर्भात ‘लोकमत’च्या गुरुवारच्या ‘हॅलो ठाणे’ मध्ये ‘टँकरचीही होतेय पळवापळवी’ अशी बातमी प्रसिद्ध होताच रविवारी पालिकेने या सोसायटीत टँकर पाठवला.या सोसयाटीने फेब्रुवारीत टँकर बुक केले होते. त्यापैकी दोन टँकर आले होते. मात्र उर्वरित टँकरसाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. पालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील अधिकारी केवळ टोलवाटोलवी करत होते. सोसयाटीने पाठपुरावा केला नसल्याने टँकर मिळाला नसेल, अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी दिली होती. वास्तविक अनेकदा सोसायटीचे रहिवाशी किंवा पदाधिकारी या कार्यालयात जात असत. पण तेथील अधिकारी दादच देत नव्हते. अखेर याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत रविवारी दुपारी टँकर आला. पाणी मिळाल्याने इमारतीतील रहिवाशांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. शास्त्रीनगरचा जलकुंभच भरत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेकडूनच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगण्यात आले. पूर्वी दुपारी १२ वाजता जलकुंभ भरत असत. मात्र आता दुपारी दोनपर्यंतही तो भरत नाही. आम्ही असेल तेवढे पाणी सोडतो असे, सूत्रांनी सांगितले. जेमतेम दीड तास आणि तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने टाकी भरत नाही. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र याच जलकुंभातून अन्य भागात व्यवस्थित पाणीपुरवठा कसा होतो, असा सवालही विचारला जात आहे.