शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

एकाच परमिटवर दोन रिक्षा

By admin | Updated: November 11, 2016 02:58 IST

जुनी रिक्षा विकून नवीन रिक्षा घेतल्याचे भासवायचे. मात्र प्रत्यक्षात दोन्ही रिक्षा एकाच परमीटवर चालवायच्या, असा प्रकार कल्याण डोंबिवलीत बोकाळला आहे

आकाश गायकवाड, डोंबिवलीजुनी रिक्षा विकून नवीन रिक्षा घेतल्याचे भासवायचे. मात्र प्रत्यक्षात दोन्ही रिक्षा एकाच परमीटवर चालवायच्या, असा प्रकार कल्याण डोंबिवलीत बोकाळला आहे. प्रवासी आणि रिक्षा संघटनेच्या नेत्यांच्या अंदाजानुसार अशा पद्धतीने किमान ५ हजार रिक्षा बेकायदा रस्त्यांवर धावत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील अधिकृत रिक्षांची संख्या सुमारे २५ हजार आहे. वाहतूक पोलीस व आरटीओची कृपादृष्टी अशीच राहिल्यास शहरातील रस्त्यांवर अधिकृत रिक्षांच्या तुलनेत बेकायदा रिक्षांची संख्या अधिक दिसेल, असे प्रवासी संघटनांचे मत आहे.नवीन रिक्षा घेतल्यास तीन ते चार वर्षांनंतर देखभाल, दुरु स्तीचा खर्च सुरू होतो. त्या अवधीत कर्ज फिटल्याने अनेक रिक्षाचालक त्याच परमीटवर नवी रिक्षा चालवायला घेतात. जुन्या रिक्षावर तुटपुंज्या पगारावरील एखादा ड्रायव्हर नेमला की एका परमीटवर २ रिक्षा धावू लागतात. एकाच नंबरच्या दोन किंवा अधिक रिक्षाही रस्त्यांवर धावत असल्याचे अनेक रिक्षाचालकांनी सांगितले. दोन्ही रिक्षांचे उत्पन्न मिळत असल्याने रिक्षाचालक खूष असतात. अशी रिक्षा आरटीओने पकडली तरी दंड भरु न सोडवता येते. अगदी जप्तीची कारवाई झाली तरी रिक्षा भंगारात जाण्याच्या स्थितीत असल्याने रिक्षा चालकांना फारसा फरक पडत नाही. त्यामुळेच बोगस रिक्षा बोकाळल्या आहेत. या भागांत प्रमाण मोठेडोंबिवली पश्चिमेकडील देवीचापाड, कुंभारखानपाडा, सत्यावान चौक, उमेशनगर आणि जुनी डोंबिवली तर पूर्वेतील मानपाडा रोड, टाटानाका, दावडी सागाव, सोनारपाडा ग्रामीण भाग, यामार्गांवर बेकायदा रिक्षा मोठ्या प्रमाणात आढळतात. कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा आणि खडेगोळवली मार्गावर,तसेच संध्याकाळनंतर कल्याण पश्चिमेतही अवैध रिक्षा धावतात. ५ हजारांहून अधिक बेकायदा रिक्षा!कल्याण डोंबिवलीत ५ हजारांपेक्षा जास्त बेकायदेशीर रिक्षा असाव्यात. केवळ परमीट नूतनीकरणासाठी आलेल्या रिक्षांची तपासणी करण्याऐवजी आरटीओ अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली तर या रिक्षा सापडतील. आरटीओ यंत्रणेकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने, अशी अचानक तपासणीच होत नाही. त्यामुळे बेकायदा रिक्षाचालकांचे फावले आहे. बेकायदा रिक्षा चालविण्यासाठी १ हजार रू पयांचे हप्ता दिला जातो, असे बोलले जात आहे.कल्याण डोंबिवलीत सुमारे १५० अधिकृत आणि अनधिकृ त रिक्षा स्टॅँन्ड आहेत.त्यातील बोटावर मोजण्या इतक्या रिक्षा स्टॅँन्डला रेलींग बसविण्यात आले आहे. मात्र उर्वरीत रिक्षा स्टॅँन्डला रेलींग न बसविल्याने शहरातील बहुतांश भागात वाहतूक कोंडी होत असते. रेलिंग नसल्याचा फायदा घेऊन अनेक बेशिस्त रिक्षाचालक रस्त्याच्या मध्ये वेडीवाकडी रिक्षा लावून धंदा करतात. हे दृष्य दररोज समोर दिसत असूनही वाहतूक पोलीस डोळयावर पट्टी बांधून असतात, असे प्रवासी संघटनांचे मत आहे.