शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच परमिटवर दोन रिक्षा

By admin | Updated: November 11, 2016 02:58 IST

जुनी रिक्षा विकून नवीन रिक्षा घेतल्याचे भासवायचे. मात्र प्रत्यक्षात दोन्ही रिक्षा एकाच परमीटवर चालवायच्या, असा प्रकार कल्याण डोंबिवलीत बोकाळला आहे

आकाश गायकवाड, डोंबिवलीजुनी रिक्षा विकून नवीन रिक्षा घेतल्याचे भासवायचे. मात्र प्रत्यक्षात दोन्ही रिक्षा एकाच परमीटवर चालवायच्या, असा प्रकार कल्याण डोंबिवलीत बोकाळला आहे. प्रवासी आणि रिक्षा संघटनेच्या नेत्यांच्या अंदाजानुसार अशा पद्धतीने किमान ५ हजार रिक्षा बेकायदा रस्त्यांवर धावत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील अधिकृत रिक्षांची संख्या सुमारे २५ हजार आहे. वाहतूक पोलीस व आरटीओची कृपादृष्टी अशीच राहिल्यास शहरातील रस्त्यांवर अधिकृत रिक्षांच्या तुलनेत बेकायदा रिक्षांची संख्या अधिक दिसेल, असे प्रवासी संघटनांचे मत आहे.नवीन रिक्षा घेतल्यास तीन ते चार वर्षांनंतर देखभाल, दुरु स्तीचा खर्च सुरू होतो. त्या अवधीत कर्ज फिटल्याने अनेक रिक्षाचालक त्याच परमीटवर नवी रिक्षा चालवायला घेतात. जुन्या रिक्षावर तुटपुंज्या पगारावरील एखादा ड्रायव्हर नेमला की एका परमीटवर २ रिक्षा धावू लागतात. एकाच नंबरच्या दोन किंवा अधिक रिक्षाही रस्त्यांवर धावत असल्याचे अनेक रिक्षाचालकांनी सांगितले. दोन्ही रिक्षांचे उत्पन्न मिळत असल्याने रिक्षाचालक खूष असतात. अशी रिक्षा आरटीओने पकडली तरी दंड भरु न सोडवता येते. अगदी जप्तीची कारवाई झाली तरी रिक्षा भंगारात जाण्याच्या स्थितीत असल्याने रिक्षा चालकांना फारसा फरक पडत नाही. त्यामुळेच बोगस रिक्षा बोकाळल्या आहेत. या भागांत प्रमाण मोठेडोंबिवली पश्चिमेकडील देवीचापाड, कुंभारखानपाडा, सत्यावान चौक, उमेशनगर आणि जुनी डोंबिवली तर पूर्वेतील मानपाडा रोड, टाटानाका, दावडी सागाव, सोनारपाडा ग्रामीण भाग, यामार्गांवर बेकायदा रिक्षा मोठ्या प्रमाणात आढळतात. कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा आणि खडेगोळवली मार्गावर,तसेच संध्याकाळनंतर कल्याण पश्चिमेतही अवैध रिक्षा धावतात. ५ हजारांहून अधिक बेकायदा रिक्षा!कल्याण डोंबिवलीत ५ हजारांपेक्षा जास्त बेकायदेशीर रिक्षा असाव्यात. केवळ परमीट नूतनीकरणासाठी आलेल्या रिक्षांची तपासणी करण्याऐवजी आरटीओ अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली तर या रिक्षा सापडतील. आरटीओ यंत्रणेकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने, अशी अचानक तपासणीच होत नाही. त्यामुळे बेकायदा रिक्षाचालकांचे फावले आहे. बेकायदा रिक्षा चालविण्यासाठी १ हजार रू पयांचे हप्ता दिला जातो, असे बोलले जात आहे.कल्याण डोंबिवलीत सुमारे १५० अधिकृत आणि अनधिकृ त रिक्षा स्टॅँन्ड आहेत.त्यातील बोटावर मोजण्या इतक्या रिक्षा स्टॅँन्डला रेलींग बसविण्यात आले आहे. मात्र उर्वरीत रिक्षा स्टॅँन्डला रेलींग न बसविल्याने शहरातील बहुतांश भागात वाहतूक कोंडी होत असते. रेलिंग नसल्याचा फायदा घेऊन अनेक बेशिस्त रिक्षाचालक रस्त्याच्या मध्ये वेडीवाकडी रिक्षा लावून धंदा करतात. हे दृष्य दररोज समोर दिसत असूनही वाहतूक पोलीस डोळयावर पट्टी बांधून असतात, असे प्रवासी संघटनांचे मत आहे.