शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

लोकसंख्येनुसार अडीच टक्के फेरीवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 03:08 IST

केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेत अडीच टक्के फेरीवाले बसवण्याचा निर्णय मंगळवारी बैठकीत घेण्यात आला.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेत अडीच टक्के फेरीवाले बसवण्याचा निर्णय मंगळवारी बैठकीत घेण्यात आला. त्याला फेरीवाला संघटनांनी अनुमती दर्शवली आहे.फेरीवाल्यांच्या विविध संघटनांची बैठक आयुक्त गोविंद बोडके यांच्यासोबत मंगळवारी झाली. या बैठकीस कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे, अरविंद मोरे, प्रशांत माळी, रमेश हनुमंते, नाना पाटील, संदीप वर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.महापालिकेत १० प्रभागक्षेत्रे आहेत. त्यापैकी समजा एखाद्या प्रभागाची लोकसंख्या १० हजार इतकी आहे. तर, तेथे त्याच्या तुलनेत अडीच टक्के म्हणजे २५० फेरीवाले व्यवसाय करतील. २७ गावांसह महापालिका हद्दीतील लोकसंख्या १५ लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत अडीच टक्के फेरीवाला सामावून घेतले जाणार आहेत. त्याला फेरीवाला संघटनेने मान्यता दिली आहे. परंतु, कल्याण स्टेशन व डोंबिवली स्टेशन परिसरांत फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तेथे अडीच टक्क्यांचा निकष कसा लावणार, याविषयी ठोस निर्णय झालेला नाही.महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार, महापालिका हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. संघटनांच्या मते हा आकडा १५ हजार इतका असू शकतो. दुसरे सर्वेक्षण झालेले नसले, तरी नऊ हजार ५३१ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण संघटनांनी मान्य केलेले आहे.दरम्यान, फेरीवाल्यांना सोडत पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी जागा ठरवून दिली जाईल. त्याला फेरीवाल्यांनी प्रथम विरोध केला होता. आता सोडत पद्धतीने जागावाटपाला संघटनांनी होकार दर्शवला आहे.>स्मार्ट सिटीमुळे फेरीवाल्यांच्या व्यवसायावर गदाफेरीवाला संघटनेचे पदाधिकारी रमेश हनुमंते म्हणाले की, महापालिकेने स्मार्ट सिटीचा आराखडा तयार केला आहे. कल्याण स्टेशन परिसराच्या विकासासाठी ४७५ कोटींची निविदा काढण्यात येणार आहे. पश्चिमेला कामासाठी रेल्वेने अनुमती दिली आहे. तर, पूर्वेला अद्याप रेल्वेकडून मान्यता मिळणे बाकी आहे. कल्याण पश्चिमेसह पूर्वेलाही स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसर विकास होणार आहे. तर, फेरीवाल्यांना त्यात सामावून घेतले आहे का, असा सवाल केला जात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे फेरीवाल्यांच्या व्यवसायावर गदा येईल. कल्याण स्टेशन परिसरापाठोपाठ डोंबिवली स्टेशन परिसर विकासाचा डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नेमला गेला आहे. कल्याण व डोंबिवली स्टेशन परिसरात सगळ्यात जास्त फेरीवाले आहेत. त्यांच्या समायोजनाचा विकास स्मार्ट सिटीत नसेल, तर स्मार्ट सिटी ही कष्टकरीवर्गाला विकास प्रक्रियेत सामावून न घेता बाहेर फेकणार असेल. तर आमचा स्मार्ट सिटीला विरोध असेल.