शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्येनुसार अडीच टक्के फेरीवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 03:08 IST

केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेत अडीच टक्के फेरीवाले बसवण्याचा निर्णय मंगळवारी बैठकीत घेण्यात आला.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेत अडीच टक्के फेरीवाले बसवण्याचा निर्णय मंगळवारी बैठकीत घेण्यात आला. त्याला फेरीवाला संघटनांनी अनुमती दर्शवली आहे.फेरीवाल्यांच्या विविध संघटनांची बैठक आयुक्त गोविंद बोडके यांच्यासोबत मंगळवारी झाली. या बैठकीस कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे, अरविंद मोरे, प्रशांत माळी, रमेश हनुमंते, नाना पाटील, संदीप वर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.महापालिकेत १० प्रभागक्षेत्रे आहेत. त्यापैकी समजा एखाद्या प्रभागाची लोकसंख्या १० हजार इतकी आहे. तर, तेथे त्याच्या तुलनेत अडीच टक्के म्हणजे २५० फेरीवाले व्यवसाय करतील. २७ गावांसह महापालिका हद्दीतील लोकसंख्या १५ लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत अडीच टक्के फेरीवाला सामावून घेतले जाणार आहेत. त्याला फेरीवाला संघटनेने मान्यता दिली आहे. परंतु, कल्याण स्टेशन व डोंबिवली स्टेशन परिसरांत फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तेथे अडीच टक्क्यांचा निकष कसा लावणार, याविषयी ठोस निर्णय झालेला नाही.महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार, महापालिका हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. संघटनांच्या मते हा आकडा १५ हजार इतका असू शकतो. दुसरे सर्वेक्षण झालेले नसले, तरी नऊ हजार ५३१ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण संघटनांनी मान्य केलेले आहे.दरम्यान, फेरीवाल्यांना सोडत पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी जागा ठरवून दिली जाईल. त्याला फेरीवाल्यांनी प्रथम विरोध केला होता. आता सोडत पद्धतीने जागावाटपाला संघटनांनी होकार दर्शवला आहे.>स्मार्ट सिटीमुळे फेरीवाल्यांच्या व्यवसायावर गदाफेरीवाला संघटनेचे पदाधिकारी रमेश हनुमंते म्हणाले की, महापालिकेने स्मार्ट सिटीचा आराखडा तयार केला आहे. कल्याण स्टेशन परिसराच्या विकासासाठी ४७५ कोटींची निविदा काढण्यात येणार आहे. पश्चिमेला कामासाठी रेल्वेने अनुमती दिली आहे. तर, पूर्वेला अद्याप रेल्वेकडून मान्यता मिळणे बाकी आहे. कल्याण पश्चिमेसह पूर्वेलाही स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसर विकास होणार आहे. तर, फेरीवाल्यांना त्यात सामावून घेतले आहे का, असा सवाल केला जात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे फेरीवाल्यांच्या व्यवसायावर गदा येईल. कल्याण स्टेशन परिसरापाठोपाठ डोंबिवली स्टेशन परिसर विकासाचा डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नेमला गेला आहे. कल्याण व डोंबिवली स्टेशन परिसरात सगळ्यात जास्त फेरीवाले आहेत. त्यांच्या समायोजनाचा विकास स्मार्ट सिटीत नसेल, तर स्मार्ट सिटी ही कष्टकरीवर्गाला विकास प्रक्रियेत सामावून न घेता बाहेर फेकणार असेल. तर आमचा स्मार्ट सिटीला विरोध असेल.