शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ठाणे जिल्ह्यात बारावीत मुलींचा निकाल नव्वदीपार; मुरबाड तालुका अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 03:37 IST

यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई विभागीय मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या ठाणे जिल्ह्याची या निकालावर चांगलीच छाप पडली आहे.

ठाणे : गुरुवारी दुपारी जाहीर झालेल्या बारावीच्या आॅनलाइन निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ८९.८६ टक्के इतका लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील निकालात मुलींनी बाजी मारली. सर्वच तालुक्यांतील मुलींचा निकाल नव्वदीपार गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याच्या निकालात यंदा तब्बल पाच टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यात मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९२.८३ टक्के इतका लागला आहे.यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई विभागीय मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या ठाणे जिल्ह्याची या निकालावर चांगलीच छाप पडली आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९१ हजार ३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८१ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांची संख्या ४१ हजार ७७८ आणि मुलींची संख्या ४० हजार २७ आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ८७.०५ आणि ९२.९९ टक्के इतके आहे. उत्तीर्ण झालेल्या एकूणपैकी १० हजार ६४० विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, २७ हजार ९८० विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, ३८ हजार ४०४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी, तर ४७८१ विद्यार्थ्यांना पास श्रेणी मिळाली आहे.विज्ञान शाखेचानिकाल सर्वाधिकजिल्ह्याचा शाखानिहाय निकाल पाहिल्यास विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.६२ टक्के लागला आहे.तर, एचएससी व्होकेशनल शाखेचा निकाल त्याखालोखाल ९०.८४ टक्के लागला आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ८९.७६ टक्के लागला आहे. सर्वात कमी कला शाखेचा निकाल ७९.७३ टक्के लागला आहे.७९,२२६ नियमित विद्यार्थी उत्तीर्णयंदा जिल्ह्यातून ९० हजार १६२ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७९ हजार २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सात हजार ३३३ खाजगी विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत पाच हजार १०६ उत्तीर्ण झाले. जिल्ह्याच्या एकूण निकालात चांगलीच वाढ झाल्याने शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल