शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

तुर्भे जनता मार्केटची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: October 27, 2014 01:17 IST

तुर्भे जनता मार्केटमधील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून, अग्निशमन नियमांचेही मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे.

नवी मुंबई : तुर्भे जनता मार्केटमधील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून, अग्निशमन नियमांचेही मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे. दिवाळीत लागलेल्या आगीमध्ये जवळपास पाच दुकाने जळून गेली असून, भविष्यात मोठी दुर्घटना होऊन जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या मार्केटची सुरक्षाच धोक्यात आली आहे.नवी मुंबईमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी असणाऱ्या बाजारपेठांमध्ये तुर्भे जनता मार्केटचा समावेश आहे. या ठिकाणी हार्डवेअर, गृहोपयोगी वस्तू, कपडे व इतर वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे. रविवारी व सणांच्या काळात मार्केटमध्ये प्रचंड गर्दी असते. ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे येथील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही केले आहे. येथील गल्ल्या अरुंद झाल्या आहेत. दुकानांच्या बाहेरील जागाही व्यवसायासाठी वापरली जात आहे. येथील फेरीवाल्यांची संख्याही वाढली आहे. दिवाळीच्या दिवशी मार्केटमध्ये लागलेल्या आगीमध्ये पाच दुकानांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासही अडथळा निर्माण झाला होता. जनता मार्केटमध्ये दुकानांची रचना अत्यंत चुकीची आहे. काही दुकानांमध्ये जाण्यासाठी अत्यंत चिंचोळा मार्ग आहे. मोठी आग लागली तर येथील नागरिकांना बाहेर पडण्यासही अडथळा होऊ शकतो. आग विझविता न आल्याने प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत. पूर्ण मार्केटची सुरक्षा रामभरोसे सुरू आहे. महापालिका प्रशासनाने वेळेत मार्केटमधील अनागोंदी कारभार थांबविला नाहीतर भविष्यात गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)