शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

राष्ट्रवादीला स्पर्धेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:31 IST

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात व्हावी, याकरिता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांनाच लक्ष्य केले आहे.

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात व्हावी, याकरिता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांनाच लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने डावखरे यांच्यावर गद्दारीचा आरोप करून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.निवडणुकीच्या रिंगणात १४ उमेदवार असले, तरी शिवसेना, भाजपाने आपल्या संघर्षात राष्ट्रवादीच्या तिसऱ्या उमेदवाराचीही मतदारांनी दखल घेऊ नये, अशी परस्परांवर चिखलफेक सुरू केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.‘गद्दाराला धडा शिकवा’ ही राष्ट्रवादी काँग्रेसची हाक असून, त्यांचे लक्ष्य डावखरे हेच आहे. निरंजन यांना लक्ष्य करताना सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले गेले. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा कोकण पदवीधर मतदार संघ मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. भाजपाकडून पदवीधरांवर अन्याय झाल्याचा आरोप करत, शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला लक्ष्य केले आहे.येत्या २५ जून रोजी कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता मतदान होणार असून, मतमोजणी २८ जूनला आहे. कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का देण्यात शिवसेना यशस्वी झाली, तर विधान परिषदेतील त्यांचे संख्याबळ वाढेल. सध्या विधान परिषदेत भाजपाचे स्पष्ट बहुमत नाही. जुलै महिन्यात विधानसभेतील सदस्यांनी मतदान केल्याने, विधान परिषदेवर निवडून जाणाºया सदस्यांची निवड झाल्यावर भाजपा बहुमतात येईल. तत्पूर्वी कोकण व मुंबई पदवीधर या दोन्ही मतदार संघांवर वर्चस्व मिळवून भाजपाची डोकेदुखी वाढविणे हाच शिवसेनेचा हेतू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक असो की, पालघर लोकसभा पोटनिवडणूक भाजपा-शिवसेनेने परस्परांवर टीका करून, उत्तम यश संपादन केले आहे. तोच पॅटर्न पदवीधर निवडणुकीत अंमलात आणला जात आहे.निरंजन डावखरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ते विजयी झाले, तर भाजपासारख्या नव्या पक्षातही त्यांची राजकीय कारकीर्द बहरेल. मात्र, पराभव झाला तर ना घर का ना घाट का, अशी स्थिती होईल>पदवीधरांसाठी कोणत्याही योजना आणलेल्या नाहीतमित्राला जागा सोडत गेल्याने भाजपा कमी झाली, परंतु आता पालघरपाठोपाठ कोकण पदवीधरच्या निमित्ताने जी संधी आली, त्या संधीचे सोने करत कोकण पुन्हा आपल्याकडे घ्यायचे असल्याचा नारा भाजपाने दिला आहे. अर्थात, हे स्वप्न साकार करताना त्यांचा उमेदवार हा आयात आहे व संघ परिवाराच्या संस्कारांत वाढलेले पदवीधर तो कसा स्वीकारतात, याबाबत उलटसुलट दावे केले जात आहेत. भाजपाने पदवीधरांसाठी कोणत्याही योजना आणलेल्या नाहीत. केंद्र सरकार यामध्ये सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप शिवसेनेचा आहे. शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे जंगजंग पछाडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक हे मैदानात उतरले आहेत, परंतु सभेच्या ठिकाणी नाईक आणि आव्हाडांमध्ये आजही धग जाणवते. हे दोघे उमेदवारांचा प्रचार करण्याऐवजी एकमेकांवरच टीका करण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारावरील आरोप व दाखल गुन्हेही त्या पक्षाकरिता डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.