शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

राष्ट्रवादीला स्पर्धेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:31 IST

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात व्हावी, याकरिता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांनाच लक्ष्य केले आहे.

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात व्हावी, याकरिता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांनाच लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने डावखरे यांच्यावर गद्दारीचा आरोप करून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.निवडणुकीच्या रिंगणात १४ उमेदवार असले, तरी शिवसेना, भाजपाने आपल्या संघर्षात राष्ट्रवादीच्या तिसऱ्या उमेदवाराचीही मतदारांनी दखल घेऊ नये, अशी परस्परांवर चिखलफेक सुरू केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.‘गद्दाराला धडा शिकवा’ ही राष्ट्रवादी काँग्रेसची हाक असून, त्यांचे लक्ष्य डावखरे हेच आहे. निरंजन यांना लक्ष्य करताना सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले गेले. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा कोकण पदवीधर मतदार संघ मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. भाजपाकडून पदवीधरांवर अन्याय झाल्याचा आरोप करत, शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला लक्ष्य केले आहे.येत्या २५ जून रोजी कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता मतदान होणार असून, मतमोजणी २८ जूनला आहे. कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का देण्यात शिवसेना यशस्वी झाली, तर विधान परिषदेतील त्यांचे संख्याबळ वाढेल. सध्या विधान परिषदेत भाजपाचे स्पष्ट बहुमत नाही. जुलै महिन्यात विधानसभेतील सदस्यांनी मतदान केल्याने, विधान परिषदेवर निवडून जाणाºया सदस्यांची निवड झाल्यावर भाजपा बहुमतात येईल. तत्पूर्वी कोकण व मुंबई पदवीधर या दोन्ही मतदार संघांवर वर्चस्व मिळवून भाजपाची डोकेदुखी वाढविणे हाच शिवसेनेचा हेतू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक असो की, पालघर लोकसभा पोटनिवडणूक भाजपा-शिवसेनेने परस्परांवर टीका करून, उत्तम यश संपादन केले आहे. तोच पॅटर्न पदवीधर निवडणुकीत अंमलात आणला जात आहे.निरंजन डावखरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ते विजयी झाले, तर भाजपासारख्या नव्या पक्षातही त्यांची राजकीय कारकीर्द बहरेल. मात्र, पराभव झाला तर ना घर का ना घाट का, अशी स्थिती होईल>पदवीधरांसाठी कोणत्याही योजना आणलेल्या नाहीतमित्राला जागा सोडत गेल्याने भाजपा कमी झाली, परंतु आता पालघरपाठोपाठ कोकण पदवीधरच्या निमित्ताने जी संधी आली, त्या संधीचे सोने करत कोकण पुन्हा आपल्याकडे घ्यायचे असल्याचा नारा भाजपाने दिला आहे. अर्थात, हे स्वप्न साकार करताना त्यांचा उमेदवार हा आयात आहे व संघ परिवाराच्या संस्कारांत वाढलेले पदवीधर तो कसा स्वीकारतात, याबाबत उलटसुलट दावे केले जात आहेत. भाजपाने पदवीधरांसाठी कोणत्याही योजना आणलेल्या नाहीत. केंद्र सरकार यामध्ये सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप शिवसेनेचा आहे. शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे जंगजंग पछाडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक हे मैदानात उतरले आहेत, परंतु सभेच्या ठिकाणी नाईक आणि आव्हाडांमध्ये आजही धग जाणवते. हे दोघे उमेदवारांचा प्रचार करण्याऐवजी एकमेकांवरच टीका करण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारावरील आरोप व दाखल गुन्हेही त्या पक्षाकरिता डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.