शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

महिलांना विश्वास देण्याचे काम भरोसा कक्ष करणार - आशुतोष डुंबरे ; भिवंडीत भरोसा कक्षाची स्थापना

By नितीन पंडित | Updated: July 1, 2024 18:53 IST

 भिवंडी शहरातील महिलांना ठाणे येथे येण्याचा त्रास टाळावा यासाठी भिवंडीत हे कक्ष सुरू करण्यात येत आहे.घटस्फोटाची कारणे काळानुरूप बदलत गेली.

नितीन पंडितभिवंडी: पोलिस प्रशासनाने २००९ मध्ये महिला तक्रार निवारण कक्ष सुरू केले होते.२०१९ मध्ये त्याचे नाव भरोसा कक्ष असे केले आहे.त्यामाध्यमातून कुटुंबीयांना भरोसा व विश्वास देण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत आहे असे प्रतिपादन पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केले आहे.सोमवारी ते भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या भरोसा कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.भिवंडीत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी भरोसा कक्ष सुरू करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी अप्पर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले,पोलिस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील,भिवंडी पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांसह सर्व पोलिस अधिकारी,महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 भिवंडी शहरातील महिलांना ठाणे येथे येण्याचा त्रास टाळावा यासाठी भिवंडीत हे कक्ष सुरू करण्यात येत आहे.घटस्फोटाची कारणे काळानुरूप बदलत गेली.शुल्लक कारणावरून घटस्फोट घेतले जातात.त्यामध्ये महिला देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.पण यामध्ये प्रश्न त्या दोघांचा नसतो तर अनेकांवर त्याचा परिणाम होत असतो.त्यांचे समुपदेशन,मार्गदर्शन करून कुटुंब जोडण्याचे काम होणार आहे असे सांगत ठाणे पोलिस आयुक्तालयात मागील दीड वर्षात ९१० तक्रार भरोसा कक्षात दाखल झाल्या त्यापैकी ४०० तक्रारींमध्ये तडजोड करून कुटुंब जोडण्यात यश मिळाले आहे असे प्रतिपादन शेवटी आशुतोष डुंबरे यांनी केले.

 पोलिसांनी कायदा राबविताना सामाजिक भान राखून कौटुंबिक वाद सोडवताना मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.संयुक्त कुटुंब संपुष्टात येत असताना छोट्या कुटुंबात शुल्लक कारणातून कौटुंबिक वाद वाढत असतात त्यामध्ये समाजाचे समाधान करण्याचे काम नक्कीच होईल अशी ग्वाही अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली. भरोसा कक्ष हा सुरवाती पासून ठाणे पोलिस आयुक्तालयात गुन्हे विभागाच्या अंतर्गत सुरू होता.कौटुंबिक वाद गुन्हे दाखल करण्या पूर्वी भरोसा कक्षात समुपदेशन मार्गदर्शन करून सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.

भिवंडी परिसरातील महिलांना ठाणे येथे येणे वेळकाढू व खर्चिक असल्याने  पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी भिवंडी येथे भरोसा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असे प्रास्तावीक गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले.भिवंडी पूर्व विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी सूत्रसंचालन केले.तर आभार प्रदर्शन पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी करताना एक जुलै पासून जुने कायदे संहिता रद्द करून  नव्याने अमलात आलेल्या भारतीय न्याय संहिता,भारतीय सुरक्षा संहिता, भारतीय  साक्ष संहिता याची माहिती उपस्थितांना दिली.