शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात माजीवडा ओव्हरब्रिजवर ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी

By जितेंद्र कालेकर | Updated: May 22, 2024 21:27 IST

घाेडबंदर ते मुंबई मार्गावर वाहतुकीचा खाेळंबा : उड्डाणपुलावरील वाहतूक खालच्या रस्त्यावर

ठाणे: ठाण्यात घाेडबंदर रोड ते मुंबईकडे जाणाऱ्या माजीवडा येथील ओव्हरब्रिजवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक ट्रक उलटून रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली. या अपघातामुळे या ब्रिजवरील सर्व वाहने खालच्या मार्गावर आल्याने घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ऐन सध्याकाळी गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर ही वाहतूक तीन तासांनी सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यातील घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर माजीवडा उड्डाणपुलावर एक हेवी सिमेंट मिक्सर बुधवारी सायंकाळी ४:४५ वाजता चालक लखन याचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइलही सांडले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कापूरबावडी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजूषा भोगले, वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने हायड्रा क्रेनसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी रोडवर सांडलेल्या ऑइलवर माती पसरविली.

अपघातग्रस्त वाहन हायड्राच्या साहाय्याने रात्री ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान बाजूला करण्यात आले. या काळात हा मार्ग रोड वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मोकळा करण्यात आला. मात्र, माजीवडा उड्डाणपुलावर यू टर्नजवळच हा अपघात झाल्याने घाेडबंदर ते मुंंबईकडे जाणारी सर्व वाहने ही पुलाऐवजी खालच्या रस्त्यावर आली. त्यामुळे या मार्गावर ऐन संध्याकाळी मोठी कोंडी झाली. माजीवडा ते अगदी पातलीपाड्यापर्यंत सायंकाळी ५:३० ते रात्री ७:३० वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या काळात वाहतूककोंडी फोडताना वाहतूक शाखेच्या पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.........................चालकाचे पलायन -उड्डाणपुलावरील अपघातानंतर मिक्सर ट्रकचालकाने पलायन केले. त्यामुळे नेमके काय झाले, याची सुरुवातीला पोलिसांनाही माहिती नव्हती.......................यू टर्नवर वारंवार अपघातमाजीवडा उड्डाणपुलावर घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या यू टर्नच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारी काही कामे अपुऱ्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी रमलर्स, टायर बसविणे आणि ब्लिंकर्सची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. या कारणांमुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे