शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

ठाण्यात माजीवडा ओव्हरब्रिजवर ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी

By जितेंद्र कालेकर | Updated: May 22, 2024 21:27 IST

घाेडबंदर ते मुंबई मार्गावर वाहतुकीचा खाेळंबा : उड्डाणपुलावरील वाहतूक खालच्या रस्त्यावर

ठाणे: ठाण्यात घाेडबंदर रोड ते मुंबईकडे जाणाऱ्या माजीवडा येथील ओव्हरब्रिजवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक ट्रक उलटून रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली. या अपघातामुळे या ब्रिजवरील सर्व वाहने खालच्या मार्गावर आल्याने घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ऐन सध्याकाळी गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर ही वाहतूक तीन तासांनी सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यातील घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर माजीवडा उड्डाणपुलावर एक हेवी सिमेंट मिक्सर बुधवारी सायंकाळी ४:४५ वाजता चालक लखन याचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइलही सांडले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कापूरबावडी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजूषा भोगले, वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने हायड्रा क्रेनसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी रोडवर सांडलेल्या ऑइलवर माती पसरविली.

अपघातग्रस्त वाहन हायड्राच्या साहाय्याने रात्री ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान बाजूला करण्यात आले. या काळात हा मार्ग रोड वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मोकळा करण्यात आला. मात्र, माजीवडा उड्डाणपुलावर यू टर्नजवळच हा अपघात झाल्याने घाेडबंदर ते मुंंबईकडे जाणारी सर्व वाहने ही पुलाऐवजी खालच्या रस्त्यावर आली. त्यामुळे या मार्गावर ऐन संध्याकाळी मोठी कोंडी झाली. माजीवडा ते अगदी पातलीपाड्यापर्यंत सायंकाळी ५:३० ते रात्री ७:३० वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या काळात वाहतूककोंडी फोडताना वाहतूक शाखेच्या पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.........................चालकाचे पलायन -उड्डाणपुलावरील अपघातानंतर मिक्सर ट्रकचालकाने पलायन केले. त्यामुळे नेमके काय झाले, याची सुरुवातीला पोलिसांनाही माहिती नव्हती.......................यू टर्नवर वारंवार अपघातमाजीवडा उड्डाणपुलावर घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या यू टर्नच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारी काही कामे अपुऱ्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी रमलर्स, टायर बसविणे आणि ब्लिंकर्सची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. या कारणांमुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे