शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ठाण्यात माजीवडा ओव्हरब्रिजवर ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी

By जितेंद्र कालेकर | Updated: May 22, 2024 21:27 IST

घाेडबंदर ते मुंबई मार्गावर वाहतुकीचा खाेळंबा : उड्डाणपुलावरील वाहतूक खालच्या रस्त्यावर

ठाणे: ठाण्यात घाेडबंदर रोड ते मुंबईकडे जाणाऱ्या माजीवडा येथील ओव्हरब्रिजवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक ट्रक उलटून रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली. या अपघातामुळे या ब्रिजवरील सर्व वाहने खालच्या मार्गावर आल्याने घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ऐन सध्याकाळी गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर ही वाहतूक तीन तासांनी सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यातील घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर माजीवडा उड्डाणपुलावर एक हेवी सिमेंट मिक्सर बुधवारी सायंकाळी ४:४५ वाजता चालक लखन याचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइलही सांडले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कापूरबावडी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजूषा भोगले, वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने हायड्रा क्रेनसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी रोडवर सांडलेल्या ऑइलवर माती पसरविली.

अपघातग्रस्त वाहन हायड्राच्या साहाय्याने रात्री ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान बाजूला करण्यात आले. या काळात हा मार्ग रोड वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मोकळा करण्यात आला. मात्र, माजीवडा उड्डाणपुलावर यू टर्नजवळच हा अपघात झाल्याने घाेडबंदर ते मुंंबईकडे जाणारी सर्व वाहने ही पुलाऐवजी खालच्या रस्त्यावर आली. त्यामुळे या मार्गावर ऐन संध्याकाळी मोठी कोंडी झाली. माजीवडा ते अगदी पातलीपाड्यापर्यंत सायंकाळी ५:३० ते रात्री ७:३० वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या काळात वाहतूककोंडी फोडताना वाहतूक शाखेच्या पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.........................चालकाचे पलायन -उड्डाणपुलावरील अपघातानंतर मिक्सर ट्रकचालकाने पलायन केले. त्यामुळे नेमके काय झाले, याची सुरुवातीला पोलिसांनाही माहिती नव्हती.......................यू टर्नवर वारंवार अपघातमाजीवडा उड्डाणपुलावर घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या यू टर्नच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारी काही कामे अपुऱ्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी रमलर्स, टायर बसविणे आणि ब्लिंकर्सची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. या कारणांमुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे