शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ठाण्यात पुन्हा ट्रक पलटी, सहा तास वाहतुकीची कोंडी; चुकीच्या दिशेने आलेल्या बस आणि दुचाकीस्वारांमुळे पुन्हा काेंडीत भर

By जितेंद्र कालेकर | Updated: September 4, 2024 17:01 IST

काेंडीमध्ये मुंबईकडे जाणारे अनेक मंत्रालयीन अधिकाऱ्यांसह शाळकरी मुलेही चार ते पाच तास या वाहतूक काेंडीमध्ये अडकल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशीही बुधवारी सकाळी पॅराफॉर्मल्डिहाइड या रसायनाने भरलेल्या ३४ टनाच्या बॅगा घेउन जाणारा ट्रक पातलीपाडा ब्रिजवर पलटी झाल्याची घटना घडली. त्यामुळे सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या पाच ते सहा तासांच्या कालावधीमध्ये ठाणे ते घाेडबंदर या मार्गावर आधी वाहतूक काेंडी झाली. त्यानंतर अनेक खासगी बस आणि दुचाकीस्वारांनी घाेडबंदर ते ठाणे या मार्गावरही उलट दिशेने वाहने आणली. त्यामुळे घाेडबंदर ते ठाणे हा दुसराही मार्ग बंद पडला. त्यामुळे या काेंडीमध्ये मुंबईकडे जाणारे अनेक मंत्रालयीन अधिकाऱ्यांसह शाळकरी मुलेही चार ते पाच तास या वाहतूक काेंडीमध्ये अडकल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. या अपघातात ट्रक चालक मोहम्मद रुजदार (५०) हा किरकोळ जखमी झाला असून तो ट्रॅक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

ट्रक चालक रुजदार हा नवी मुंबई न्हावा शेवा येथून रसायनाने भरलेल्या बॅगा असलेला ट्रक घेऊन बावल-हरियाणा येथे निघाला होता. या ट्रक घोडबंदर रोडने जाताना पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आल्यावर ७.४५ वाजण्याच्या सुमारास उलटला. या अपघातात चालकाच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. यामुळे वाहतुक कोंडीला सुरुवात झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक शाखेचे पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाठ आणि वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मंजूषा भाेगले यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या ट्रकमध्ये रसायनाने भरलेल्या बॅगा असल्यामुळे त्याची झळ या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांसह वाहतूक पाेलिसांनाही बसली. अनेकांना डाेळयांनाही झळझळ झाली. याच दरम्यान, तीन माेठया हायड्रा मशीनच्या मदतीने उलटलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला. हा ट्रक तीन तासांनी बाजूला करण्यात आला. याचदरम्यान पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रस्ता पातलीपाडा ते हिरानंदानी इस्टेट हा वाहतुकीसाठी बंद केला हाेता. पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. या अपघाताने सलग दुसऱ्या दिवशीही घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळाले.

शाळकरी मुलांची रखडपट्टी-दुपारी शाळा सुटल्यानंतर अनेक मुले स्कूल बसमध्ये दाेन ते तीन तास अडकली हाेती. त्यामुळे दुपारच्या सत्रातील मुलांना नेण्यासाठी बसच उपलब्ध न झाल्याने पालकांना आपल्या वाहनांनी मुलांची शाळा गाठण्यासाठी माेठी कसरत करावी, लागल्याचे एका पालकांने सांगितले. अनेक मुले बसमध्येच अडकल्याने त्यांचे पालकही रडकुंडीला आले हाेते. तर याच मागार्वरुन मंत्रालय गाठणारे प्रशासकीय अधिकारीही काेंडीमध्ये अडकल्याने अनेकांनी महापालिका आणि वाहतूक पाेलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.आधी पातलीपाडयाजवळ पुलावर रसायनाचा ट्रक पलटी झाला. हे रसायन धाेकादायक असल्यामुळे हा ट्रक बाजूला करण्यात अनेक अडचणी आल्या. त्यात चुकीच्या दिशेने आलेले वाहन चालक आणि ११ नंतर याच मार्गाने सुरु झालेली मालवाहू वाहनांची वाहतूक या सर्वच कारणांमुळे ही वाहतूक काेंडी झाली. ज्याठिकाणी अपघात झाला. त्याठिकाणी मेट्राे अधिकाऱ्यांच्या मदतीने रस्ता तातडीने दुरुस्त केला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा अशी वाहतूक काेंडी हाेणार नाही.पंकज शिरसाठ, उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर

टॅग्स :Accidentअपघात