शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

ठाण्यात पुन्हा ट्रक पलटी, सहा तास वाहतुकीची कोंडी; चुकीच्या दिशेने आलेल्या बस आणि दुचाकीस्वारांमुळे पुन्हा काेंडीत भर

By जितेंद्र कालेकर | Updated: September 4, 2024 17:01 IST

काेंडीमध्ये मुंबईकडे जाणारे अनेक मंत्रालयीन अधिकाऱ्यांसह शाळकरी मुलेही चार ते पाच तास या वाहतूक काेंडीमध्ये अडकल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशीही बुधवारी सकाळी पॅराफॉर्मल्डिहाइड या रसायनाने भरलेल्या ३४ टनाच्या बॅगा घेउन जाणारा ट्रक पातलीपाडा ब्रिजवर पलटी झाल्याची घटना घडली. त्यामुळे सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या पाच ते सहा तासांच्या कालावधीमध्ये ठाणे ते घाेडबंदर या मार्गावर आधी वाहतूक काेंडी झाली. त्यानंतर अनेक खासगी बस आणि दुचाकीस्वारांनी घाेडबंदर ते ठाणे या मार्गावरही उलट दिशेने वाहने आणली. त्यामुळे घाेडबंदर ते ठाणे हा दुसराही मार्ग बंद पडला. त्यामुळे या काेंडीमध्ये मुंबईकडे जाणारे अनेक मंत्रालयीन अधिकाऱ्यांसह शाळकरी मुलेही चार ते पाच तास या वाहतूक काेंडीमध्ये अडकल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. या अपघातात ट्रक चालक मोहम्मद रुजदार (५०) हा किरकोळ जखमी झाला असून तो ट्रॅक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

ट्रक चालक रुजदार हा नवी मुंबई न्हावा शेवा येथून रसायनाने भरलेल्या बॅगा असलेला ट्रक घेऊन बावल-हरियाणा येथे निघाला होता. या ट्रक घोडबंदर रोडने जाताना पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आल्यावर ७.४५ वाजण्याच्या सुमारास उलटला. या अपघातात चालकाच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. यामुळे वाहतुक कोंडीला सुरुवात झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक शाखेचे पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाठ आणि वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मंजूषा भाेगले यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या ट्रकमध्ये रसायनाने भरलेल्या बॅगा असल्यामुळे त्याची झळ या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांसह वाहतूक पाेलिसांनाही बसली. अनेकांना डाेळयांनाही झळझळ झाली. याच दरम्यान, तीन माेठया हायड्रा मशीनच्या मदतीने उलटलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला. हा ट्रक तीन तासांनी बाजूला करण्यात आला. याचदरम्यान पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रस्ता पातलीपाडा ते हिरानंदानी इस्टेट हा वाहतुकीसाठी बंद केला हाेता. पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. या अपघाताने सलग दुसऱ्या दिवशीही घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळाले.

शाळकरी मुलांची रखडपट्टी-दुपारी शाळा सुटल्यानंतर अनेक मुले स्कूल बसमध्ये दाेन ते तीन तास अडकली हाेती. त्यामुळे दुपारच्या सत्रातील मुलांना नेण्यासाठी बसच उपलब्ध न झाल्याने पालकांना आपल्या वाहनांनी मुलांची शाळा गाठण्यासाठी माेठी कसरत करावी, लागल्याचे एका पालकांने सांगितले. अनेक मुले बसमध्येच अडकल्याने त्यांचे पालकही रडकुंडीला आले हाेते. तर याच मागार्वरुन मंत्रालय गाठणारे प्रशासकीय अधिकारीही काेंडीमध्ये अडकल्याने अनेकांनी महापालिका आणि वाहतूक पाेलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.आधी पातलीपाडयाजवळ पुलावर रसायनाचा ट्रक पलटी झाला. हे रसायन धाेकादायक असल्यामुळे हा ट्रक बाजूला करण्यात अनेक अडचणी आल्या. त्यात चुकीच्या दिशेने आलेले वाहन चालक आणि ११ नंतर याच मार्गाने सुरु झालेली मालवाहू वाहनांची वाहतूक या सर्वच कारणांमुळे ही वाहतूक काेंडी झाली. ज्याठिकाणी अपघात झाला. त्याठिकाणी मेट्राे अधिकाऱ्यांच्या मदतीने रस्ता तातडीने दुरुस्त केला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा अशी वाहतूक काेंडी हाेणार नाही.पंकज शिरसाठ, उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर

टॅग्स :Accidentअपघात