शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चलेजाव चळवळीदरम्यान हौतात्म्य आलेल्यांना पालघरमध्ये पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 18:46 IST

14 ऑगस्ट 1944 पासून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याची परंपरा आजही अविरतपणे सुरू असून ह्या वर्षी आलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रथमच कार्यक्रमाचे स्वरूपात बदल करण्यात आला.

पालघर- इंग्रजांच्या विरोधातील चलेजाव चळवळीदरम्यान पालघरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना नगराध्यक्ष डॉ.उज्वला काळे ह्यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. ह्यावेळी हुतात्म्यांच्या रक्ताच्या सिंचनाने पवित्र झालेल्या ध्वजाचे उपस्थित मान्यवरांनी श्रद्धापूर्वक पूजन केले. प्रथमच 78 वर्षानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर राखीत हा सोहळा साधेपणाने पार पडला. 

14 ऑगस्ट 1942 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले जिल्ह्यातील सातपाटी, वडराई, नांदगाव, घिवली, शिरगाव, मनोर सह हजारो देशबांधव ब्रिटिशा विरोधी घोषणा देत पालघर कचेरीचा ताबा घेण्यासाठी निघाले होते. हे सर्व आंदोलक सध्याच्या हुतात्मा स्तंभा जवळ पोचल्यावर एका इंग्रज अधिकाऱ्यांनी ह्या आंदोलकांना शिवीगाळ केल्यानंतर चवताळलेल्या आंदोलकानी पोलिसांचे कडे तोडून कचेरीच्या दिशेने कूच केली. यावेळी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी अल्मेडा यांनी केलेल्या गोळीबारात प्रथम गोविंद गणेश ठाकूर हे जखमी होऊन त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. आपल्या सहकाऱ्याच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूने स्वातंत्र्यवीर बदला घेण्याच्या भावनेने बेभान झाले होते. भारत माता की जय, अशा घोषणा देत ते त्वेषाने कचेरीच्या दिशेने चालून गेले. यावेळी झालेल्या अमानुष गोळीबारात राम प्रसाद तेवारी, काशिनाथभाई हरी पागधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामचंद्र महादेव चुरी आणि सुकुर गोविंद मोरे या पाच देशभक्तांना हौतात्म्य आले. 

14 ऑगस्ट 1944 पासून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याची परंपरा आजही अविरतपणे सुरू असून ह्या वर्षी आलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रथमच कार्यक्रमाचे स्वरूपात बदल करण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित,आमदार श्रीनिवास वणगा,उपनगराध्यक्ष उत्तम घरत, जिप.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे,जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन,पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, मुख्यकार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, तहसीलदार सुनील शिंदे आदींसह नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थित मास्क, सुरक्षित अंतर राखून ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रथम तहसीलदार कार्यालया जवळील हुतात्मा स्मारका मध्ये जाऊन हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर हुतात्म्यांच्या इतिहासाची शब्दबद्ध केलेल्या ध्वनिफिती द्वारे इतिहास ऐकविण्यात आला. दुपारी 12 वाजून 49 मिनिटांनी दिन खून के हमारे यारो न भूल जाना,हे स्फूर्ती गीत गायले जात हुतात्म्यांना मान्यवर आणि उपस्थित नागरिकांनी पुष्पचक्र आणि फुले वाहत श्रद्धांजली अर्पण करून हुतात्म्यांच्या रक्ताच्या सिंचनाने पवित्र झालेल्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.यावेळी पालघरवासीयांनी नेहमीप्रमाणे उत्स्फूर्तपणे आपली दुकाने,बाजारपेठा बंद ठेवीत हुतात्म्यांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. 

टॅग्स :palgharपालघरIndependence Dayस्वातंत्र्य दिनMartyrशहीद