शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्हा परिषद अध्यक्षपदी आदिवासी महिला? श्रमजीवीला न्याय मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 03:00 IST

जिल्हा विभाजनानंतर प्रथमच अस्तित्त्वात येत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आदिवासी महिलेला मिळण्याची शक्यता आहे. हे आरक्षण आधीच जाहीर झाले होते.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्हा विभाजनानंतर प्रथमच अस्तित्त्वात येत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आदिवासी महिलेला मिळण्याची शक्यता आहे. हे आरक्षण आधीच जाहीर झाले होते. पण निवडणुकीवरील बहिष्कार, नंतर न्यायालयात दिलेले आव्हान यामुळे त्या समाजासाठी आरक्षण असूनही ते प्रत्यक्षात आले नव्हते. तसे झाले, तर भाजपाला पाठिंबा दिलेल्या श्रमजीवी संघटनेला त्याचा लाभ होण्याची आणि त्या माध्यमातून सत्ता उपभोगण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.लोकसंख्येचा निकष लावून हे आरक्षण जर आदिवासींकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला आणि घटनात्मकदृष्ट्या मिळालेला हक्क डावलला गेला, तर त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी आदिवासी समाजातील नेत्यांनी केल्याने अध्यक्षपद नेमके कोणाकडे जाणार हा मुद्दा निवडणुकीच्या निकालाइतकाच क्लिष्ट बनण्याची चिन्हे आहेत.ठाणे जिल्हा विभाजनानंतर जानेवारी २०१५ ला होणाºया ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एसटी महिलेसाठी अध्यक्षपद आरक्षित होते. मात्र कल्याण-डोंबिवलीजवळच्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करणे आणि लोकसंख्या वाढलेल्या ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्याचा मुद्दा पुढे करून राजकारण्यांनी निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार टाकला. त्याला न जुमानता ज्यांनी उमेदवारी दाखल केली. ते आठ अपक्ष बिनविरोध निवडून आले होते. पण सदस्य संख्येअभावी जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही. नंतर सहा महिन्याच्या कालावधीत पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या. तोवर २७ गावांचा कल्याण-डोंबिवली पालिकेत समावेश झाल्यामुळे ११ गट कमी झाले. यामुळे अन्य ठिकाणी या गटांचा समावेश करून ५५ गटांचे आरक्षण पडले. पण निवडून आलेल्या आठ सदस्यांचे पद तसेच ठेवून निवडणूक घोषित करण्यात आली होती. त्याविरोधात याचिका दाखल करून न्यायालयाची स्थगिती मिळवण्यात आली आणि सर्व युक्तिवाद, प्रक्रिया पार पाडून आता निवडणूक होते आहे.या निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कोणाचा हक्क असेल, अशी चर्चा जिल्ह्यात मतदान प्रक्रियेच्या काळात सुरू आहे. आधीच्या आरक्षणानुसार एसटी महिलेलाच संधी मिळण्याची जोरदार चर्चा राजकीय नेत्यांत सुरू आहे. तसेही पाच वर्षात अडीच-अडीच वर्षानंतर अध्यक्षपदाचे आरक्षण बदलते. दोन वेळा निवडणुका घोषित होऊनही जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही व दुसºयांदा घोषित झालेल्या निवडणुकीलाही अडीच वर्ष पूर्ण झाले नाही. यामुळे कायदेशीर आणि तांत्रिकदृट्या एसटी महिलेलाच अध्यक्षपदाची संधी मिळायला हवी, असा मुद्दा त्या समाजातील नेत्यांनी पुढे आणला आहे. अन्य समाजाच्या नेत्यांनी मात्र लोकसंख्येचा निकष चर्चेत आणत ओबीसी किंवा खुल्या गटाचे आरक्षण पडण्याची शक्यता मांडली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक