शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कार करून आदिवासी महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:35 IST

भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी २४ तासांत हत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

भिवंडी : भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी २४ तासांत हत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील कामगार महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची साडीच्या पदराने गळा आवळून हत्या करण्यात आली. पडघ्यालगतच्या कुरु ंद गावातील तरु णाची प्रेम प्रकरणातून हत्या करून त्याला एका चाळीच्या छताला टांगण्यात आले, तर धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणाऱ्या सख्या मेहुण्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन एकाची हत्या करण्यात आली.गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील महिला अन्य महिलांसोबत वालीव, ता. वसई येथून एसटीने कामावरून घरी परतत असताना रविवारी सायंकाळी महाळुंगे बसस्टॉपवर उतरून दुकानातून घरगुती सामान खरेदी करून घराच्या दिशेने निघाली. तिच्या घराकडे जाणारा रस्ता झाडाझुडुपांतून असल्याने अचानक तिला दोघांनी अडवले व उचलून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली.या घटनेप्रकरणी नितीन नारायण भोसले व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गणेशपुरी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ व ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास एपीआय महेश सगडे करीत आहे.पडघ्यालगतच्या कुरु ंद गावातील सागर सुरेश पठारे (२७) या तरु णाचा मृतदेह कुरु ंदच्या दाता आदिवासीवाडी येथील साईनाथ भोईर यांच्या चाळीतील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. सागर रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण करून घरातून निघाला होता. तो आदिवासीवाडी येथील गणपतीला गेला असावा, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटले. मात्र, त्याने गळफास घेतल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्याचे येथील एका मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याची हत्या केली गेली असावी, असा आरोप मृत सागर याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे पडघा पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रु ग्णालयात पाठवला असून तेथील वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.>भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणाºया सख्ख्या मेहुण्यांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून मेहुण्याने सख्ख्या भावोजींची हत्या केल्याची घटना घडली आहे. अमिन जलील शेख हे भावोजीचे नाव आहे.त्याचे धामणगाव येथे ‘ए-वन केशकर्तनालय’ दुकान असून त्या दुकानात अरमान सलीम शेख (३०) हा काम करीत होता. मात्र, अरमान यास दारूचे व्यसन होते. त्यामुळे अमिन हा त्यास विरोध करायचा. त्यावरून दोघांमध्ये मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले.यावेळी अरमान याने अमिन याच्या डोक्यात धारदार वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. आरोपी अरमान याची भिवंडी न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे करत आहेत.