शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

सामूहिक बलात्कार करून आदिवासी महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:35 IST

भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी २४ तासांत हत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

भिवंडी : भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी २४ तासांत हत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील कामगार महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची साडीच्या पदराने गळा आवळून हत्या करण्यात आली. पडघ्यालगतच्या कुरु ंद गावातील तरु णाची प्रेम प्रकरणातून हत्या करून त्याला एका चाळीच्या छताला टांगण्यात आले, तर धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणाऱ्या सख्या मेहुण्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन एकाची हत्या करण्यात आली.गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील महिला अन्य महिलांसोबत वालीव, ता. वसई येथून एसटीने कामावरून घरी परतत असताना रविवारी सायंकाळी महाळुंगे बसस्टॉपवर उतरून दुकानातून घरगुती सामान खरेदी करून घराच्या दिशेने निघाली. तिच्या घराकडे जाणारा रस्ता झाडाझुडुपांतून असल्याने अचानक तिला दोघांनी अडवले व उचलून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली.या घटनेप्रकरणी नितीन नारायण भोसले व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गणेशपुरी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ व ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास एपीआय महेश सगडे करीत आहे.पडघ्यालगतच्या कुरु ंद गावातील सागर सुरेश पठारे (२७) या तरु णाचा मृतदेह कुरु ंदच्या दाता आदिवासीवाडी येथील साईनाथ भोईर यांच्या चाळीतील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. सागर रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण करून घरातून निघाला होता. तो आदिवासीवाडी येथील गणपतीला गेला असावा, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटले. मात्र, त्याने गळफास घेतल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्याचे येथील एका मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याची हत्या केली गेली असावी, असा आरोप मृत सागर याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे पडघा पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रु ग्णालयात पाठवला असून तेथील वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.>भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणाºया सख्ख्या मेहुण्यांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून मेहुण्याने सख्ख्या भावोजींची हत्या केल्याची घटना घडली आहे. अमिन जलील शेख हे भावोजीचे नाव आहे.त्याचे धामणगाव येथे ‘ए-वन केशकर्तनालय’ दुकान असून त्या दुकानात अरमान सलीम शेख (३०) हा काम करीत होता. मात्र, अरमान यास दारूचे व्यसन होते. त्यामुळे अमिन हा त्यास विरोध करायचा. त्यावरून दोघांमध्ये मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले.यावेळी अरमान याने अमिन याच्या डोक्यात धारदार वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. आरोपी अरमान याची भिवंडी न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे करत आहेत.