शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

सामूहिक बलात्कार करून आदिवासी महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:35 IST

भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी २४ तासांत हत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

भिवंडी : भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी २४ तासांत हत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील कामगार महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची साडीच्या पदराने गळा आवळून हत्या करण्यात आली. पडघ्यालगतच्या कुरु ंद गावातील तरु णाची प्रेम प्रकरणातून हत्या करून त्याला एका चाळीच्या छताला टांगण्यात आले, तर धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणाऱ्या सख्या मेहुण्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन एकाची हत्या करण्यात आली.गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील महिला अन्य महिलांसोबत वालीव, ता. वसई येथून एसटीने कामावरून घरी परतत असताना रविवारी सायंकाळी महाळुंगे बसस्टॉपवर उतरून दुकानातून घरगुती सामान खरेदी करून घराच्या दिशेने निघाली. तिच्या घराकडे जाणारा रस्ता झाडाझुडुपांतून असल्याने अचानक तिला दोघांनी अडवले व उचलून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली.या घटनेप्रकरणी नितीन नारायण भोसले व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गणेशपुरी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ व ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास एपीआय महेश सगडे करीत आहे.पडघ्यालगतच्या कुरु ंद गावातील सागर सुरेश पठारे (२७) या तरु णाचा मृतदेह कुरु ंदच्या दाता आदिवासीवाडी येथील साईनाथ भोईर यांच्या चाळीतील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. सागर रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण करून घरातून निघाला होता. तो आदिवासीवाडी येथील गणपतीला गेला असावा, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटले. मात्र, त्याने गळफास घेतल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्याचे येथील एका मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याची हत्या केली गेली असावी, असा आरोप मृत सागर याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे पडघा पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रु ग्णालयात पाठवला असून तेथील वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.>भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणाºया सख्ख्या मेहुण्यांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून मेहुण्याने सख्ख्या भावोजींची हत्या केल्याची घटना घडली आहे. अमिन जलील शेख हे भावोजीचे नाव आहे.त्याचे धामणगाव येथे ‘ए-वन केशकर्तनालय’ दुकान असून त्या दुकानात अरमान सलीम शेख (३०) हा काम करीत होता. मात्र, अरमान यास दारूचे व्यसन होते. त्यामुळे अमिन हा त्यास विरोध करायचा. त्यावरून दोघांमध्ये मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले.यावेळी अरमान याने अमिन याच्या डोक्यात धारदार वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. आरोपी अरमान याची भिवंडी न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे करत आहेत.