शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
5
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
6
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
7
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
8
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
10
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
11
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
12
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
13
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
14
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
15
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
16
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
17
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
18
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
19
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
20
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले

झाडे कापली, पाणवठे बुजवले! समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराकडून नियमबाह्य काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 06:26 IST

सुरुंगस्फोटामुळे घरांना तडे

श्याम धुमाळ कसारा : राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान ठेकेदारांकडून सरकारी नियम, अटी-शर्ती सर्रास धाब्यावर बसवल्या जात आहेत. ओपन ब्लास्टिंगसह साग, खैर, निलगिरी, पळस यासारख्या वृक्षांची कत्तल करून वाहतुकीसाठी बेकायदा रस्ते तयार केले आहेत. यामध्ये ठेकेदार, पोटठेकेदार शहापूर तालुक्यातील जलस्रोत मातीचा भराव करून बुजवत आहेत. पाणीटंचाईच्या काळात आधार असलेले हे पाणीसाठेच गायब झाल्याने उन्हाळ्यात येथील गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाई भेडसावणार आहे.

शहापूर तालुक्यातून ५० किलोमीटर समृद्धी मार्ग जात आहे. तालुक्यातील गोलभन, आंब्याचापाडा, कसारा (धोबीपाडा), राईचीवाडी, फुगाळा अशा विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. या महामार्गाचे अधिकृत कंत्राट नवयोगा आणि अपकॉन या आंध्र प्रदेशमधील कंपनीला देण्यात आले आहे. या ठेकेदार कंपनीने बोगदा आणि ब्लास्टिंगचे काम एका पोटठेकेदाराला दिले आहे. ओपन ब्लास्टिंगमुळे अनेकांच्या घरांना तडेही गेले आहेत, तर अनेक गावांतील विहिरीतील पाण्याचे स्रोत कमी झाले आहेत. कंट्रोल ब्लास्टची परवानगी असताना कंपनी ज्वलनशील स्फोटके वापरून ब्लास्टिंग करत आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन ट्रक स्फोटके घेऊन उभे असतात. ब्लास्टिंगमुळे धोबीपाडा येथील घरांना तडे गेले आहेत. मात्र, आजपर्यंत कोणतीही मदत त्यांना देण्यात आलेली नाही.

२०० मीटरवर असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक ३ वरही याचा परिणाम होत आहे. या ठिकाणी चरण्यासाठी येणाऱ्या गुरेही ब्लास्टिंगमुळे भयभीत होत आहेत. संबंधित ठेकेदार हे स्वत:च्या फायद्यासाठी बेकायदा अंतर्गत रस्ते तयार करत आहेत. शेकडो झाडे तोडण्याबरोबरच नैसर्गिक नाले, पाझर तलाव मातीदगडांचा भराव टाकून हे जलस्रोत उघडपणे बुजवले जात आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे पाणवठेच गायब होत असल्याने त्यांची पाण्यावाचून तडफड होत आहे. तसेच पाणीटंचाईच्या काळात लगतच्या गावपाड्यांचा आधार असलेले हे जलस्रोत बुजवल्याने ग्रामस्थांना वणवण करावी लागणार आहे. तसेच फुगाळा येथील गावकीच्या तलावावरही अतिक्रमण करून त्याचे पाणी कामासाठी वापरले जात आहे. याविरोधात कोणी बोलल्यास भाडोत्री गुंडांमार्फत दमदाटी केली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी तक्र ारी करूनही संबंधित यंत्रणेने त्यांना केराची टोपली दाखवली आहे.

आदिवासींनी एखादे झाड तोडले तरी त्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येतो. मात्र, शहापूर तालुक्यात नियमबाह्य व शासन नियम डावलून अनेक वृक्षांची कत्तल करून कंपनीने रस्ते तयार करून वनसंपदा नष्ट केली आहे. याबाबत शहापूर, खर्डी, कसारा, वाशाला वनविभागातील अधिकारी झोपेचे सोंग घेतले आहे. समृद्धीच्या ठेकेदार कंपनीवर महसूल आणि वनविभाग यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या नियमबाह्य कामावर समृद्ध शासकीय यंत्रणेची कृपादृष्टी असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी विहिगाव वनाधिकारी प्रियंका उबाळे आणि शहापूरचे तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.कसारा-वाशाला रस्ता बनला धोकादायकअ‍ॅपकॉन कंपनीची मोठमोठी यंत्रसामग्री कसारा-वाशाला मार्गावरून जात असल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दररोज अपघात होत असून काही दिवसांपूर्वी एसटी बसलाही अपघात झाला होता. या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी वाशाला, ढाकणेसह १२ गावपाड्यांतील नागरिकांनी दोषी कंपनीला जाब विचारला होता. तेव्हा हा रस्ता दुरु स्त करून देण्याची ग्वाही अ‍ॅपकॉन कंपनी प्रशासनाने दिली होती. दोन महिने उलटूनही दुरु स्ती न झाल्यामुळे रस्ता ‘जैसे थे’ आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग