शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

झाडे कापली, पाणवठे बुजवले! समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराकडून नियमबाह्य काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 06:26 IST

सुरुंगस्फोटामुळे घरांना तडे

श्याम धुमाळ कसारा : राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान ठेकेदारांकडून सरकारी नियम, अटी-शर्ती सर्रास धाब्यावर बसवल्या जात आहेत. ओपन ब्लास्टिंगसह साग, खैर, निलगिरी, पळस यासारख्या वृक्षांची कत्तल करून वाहतुकीसाठी बेकायदा रस्ते तयार केले आहेत. यामध्ये ठेकेदार, पोटठेकेदार शहापूर तालुक्यातील जलस्रोत मातीचा भराव करून बुजवत आहेत. पाणीटंचाईच्या काळात आधार असलेले हे पाणीसाठेच गायब झाल्याने उन्हाळ्यात येथील गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाई भेडसावणार आहे.

शहापूर तालुक्यातून ५० किलोमीटर समृद्धी मार्ग जात आहे. तालुक्यातील गोलभन, आंब्याचापाडा, कसारा (धोबीपाडा), राईचीवाडी, फुगाळा अशा विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. या महामार्गाचे अधिकृत कंत्राट नवयोगा आणि अपकॉन या आंध्र प्रदेशमधील कंपनीला देण्यात आले आहे. या ठेकेदार कंपनीने बोगदा आणि ब्लास्टिंगचे काम एका पोटठेकेदाराला दिले आहे. ओपन ब्लास्टिंगमुळे अनेकांच्या घरांना तडेही गेले आहेत, तर अनेक गावांतील विहिरीतील पाण्याचे स्रोत कमी झाले आहेत. कंट्रोल ब्लास्टची परवानगी असताना कंपनी ज्वलनशील स्फोटके वापरून ब्लास्टिंग करत आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन ट्रक स्फोटके घेऊन उभे असतात. ब्लास्टिंगमुळे धोबीपाडा येथील घरांना तडे गेले आहेत. मात्र, आजपर्यंत कोणतीही मदत त्यांना देण्यात आलेली नाही.

२०० मीटरवर असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक ३ वरही याचा परिणाम होत आहे. या ठिकाणी चरण्यासाठी येणाऱ्या गुरेही ब्लास्टिंगमुळे भयभीत होत आहेत. संबंधित ठेकेदार हे स्वत:च्या फायद्यासाठी बेकायदा अंतर्गत रस्ते तयार करत आहेत. शेकडो झाडे तोडण्याबरोबरच नैसर्गिक नाले, पाझर तलाव मातीदगडांचा भराव टाकून हे जलस्रोत उघडपणे बुजवले जात आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे पाणवठेच गायब होत असल्याने त्यांची पाण्यावाचून तडफड होत आहे. तसेच पाणीटंचाईच्या काळात लगतच्या गावपाड्यांचा आधार असलेले हे जलस्रोत बुजवल्याने ग्रामस्थांना वणवण करावी लागणार आहे. तसेच फुगाळा येथील गावकीच्या तलावावरही अतिक्रमण करून त्याचे पाणी कामासाठी वापरले जात आहे. याविरोधात कोणी बोलल्यास भाडोत्री गुंडांमार्फत दमदाटी केली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी तक्र ारी करूनही संबंधित यंत्रणेने त्यांना केराची टोपली दाखवली आहे.

आदिवासींनी एखादे झाड तोडले तरी त्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येतो. मात्र, शहापूर तालुक्यात नियमबाह्य व शासन नियम डावलून अनेक वृक्षांची कत्तल करून कंपनीने रस्ते तयार करून वनसंपदा नष्ट केली आहे. याबाबत शहापूर, खर्डी, कसारा, वाशाला वनविभागातील अधिकारी झोपेचे सोंग घेतले आहे. समृद्धीच्या ठेकेदार कंपनीवर महसूल आणि वनविभाग यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या नियमबाह्य कामावर समृद्ध शासकीय यंत्रणेची कृपादृष्टी असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी विहिगाव वनाधिकारी प्रियंका उबाळे आणि शहापूरचे तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.कसारा-वाशाला रस्ता बनला धोकादायकअ‍ॅपकॉन कंपनीची मोठमोठी यंत्रसामग्री कसारा-वाशाला मार्गावरून जात असल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दररोज अपघात होत असून काही दिवसांपूर्वी एसटी बसलाही अपघात झाला होता. या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी वाशाला, ढाकणेसह १२ गावपाड्यांतील नागरिकांनी दोषी कंपनीला जाब विचारला होता. तेव्हा हा रस्ता दुरु स्त करून देण्याची ग्वाही अ‍ॅपकॉन कंपनी प्रशासनाने दिली होती. दोन महिने उलटूनही दुरु स्ती न झाल्यामुळे रस्ता ‘जैसे थे’ आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग