शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीत झाडांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 01:58 IST

लॉकडाऊनमुळे या संततधार पावसाचा दैनंदिन जीवनावर परिणाम जाणवला नसली तरी रविवारी दिवसभरात १३ ठिकाणी झाडे पडली. यामध्ये मालमत्तेचे किरकोळ नुकसान वगळता कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कल्याण : सलग तिसऱ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार पाहावयास मिळाली. अधूनमधून पावसाचा जोर कमी होत असल्याने साचलेले पाणी ओसरण्यास मदत झाली. लॉकडाऊनमुळे या संततधार पावसाचा दैनंदिन जीवनावर परिणाम जाणवला नसली तरी रविवारी दिवसभरात १३ ठिकाणी झाडे पडली. यामध्ये मालमत्तेचे किरकोळ नुकसान वगळता कोणतीही जीवितहानी झालेली नाही.कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारपासूनच संततधार पाऊस पडत आहे. दोन दिवस राहिलेला पावसाचा जोर रविवारी फारसा दिसून आला नाही. रात्रीच्या विश्रांतीनंतर पावसाने सकाळी पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे काही सखल भागांत पाणी साचले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. रविवारी कल्याण-डोंबिवलीत १३ ठिकाणी झाडे पडली. कल्याणमधील मुरबाड रोड, वालधुनी उड्डाणपूल, हाजीमलंग रोड, चक्कीनाका, पत्रीपूल उर्दू शाळा तर डोंबिवलीतील पांडुरंग शाळेजवळ, आयरेगाव, म्हात्रेनगर, नवापाडा, गरिबाचा वाडा, बालभवन, एमआयडीसी निवासी परिसरात झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. गरिबाचा वाडा येथे झाड पडल्याने मालमत्तेचे झालेले किरकोळ नुकसान वगळता अन्य कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.पाणी तुंबल्याच्या तक्रारी आलेल्या नसल्याचेही ते म्हणाले. कल्याण ग्रामीण भागात दोन दिवसांपासून कोसळणाºया पावसामुळे येथील वडवली नदी आणि देसाई खाडी तुडुंब भरून वाहू लागली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर आजूबाजूच्या गावात तसेच तेथील गृहसंकुलांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे.संरक्षक भिंत कोसळलीसंततधार पडणाºया पावसामुळे डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहाची एका बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना रविवारी घडली. एम्स रुग्णालय रोड, मॉडेल कॉलेज, मिलापनगर तलाव रोडवर पावसाचे पाणी साचले होते. नवीन गटार बांधणीची कामे अर्धवट राहिल्याने तसेच नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्याने पाणी साचल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्याचबरोबर खाजगी केबल कंपन्यांनीही खोदलेले रस्ते सुस्थितीत न केल्याने काही ठिकाणी चिखलमय परिस्थिती निर्माण झाली होती.