शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

सूर्याच्या कालव्यांत झाडाझुडुपांचे साम्राज्य

By admin | Updated: October 28, 2015 23:12 IST

सूर्या धरणाच्या कालव्यात पावसाळी झाडेझुडुपे वाढल्याने प्रवाहास होत असलेली अडचण लक्षात घेऊन खात्याने ही झुडुपे तोडण्याची गरज आहे

डहाणू : सूर्या धरणाच्या कालव्यात पावसाळी झाडेझुडुपे वाढल्याने प्रवाहास होत असलेली अडचण लक्षात घेऊन खात्याने ही झुडुपे तोडण्याची गरज आहे. दरवर्षी या कालव्याच्या दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च होतो. त्यांची अवस्था सुधारावी, ही शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी असून त्यांची दखल खात्याने कधीच घेतली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे त्यातील मोठमोठाले खड्डे आजही दुरुस्त झालेले नाहीत. परिणामी, अनेक भागांत हे कालवे उखडले गेले आहेत. त्यामुळे त्यांना गळती लागून शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. पाटबंधारे खात्याने त्यांच्या देखभालीकडे लक्ष देऊन त्यांची दुरवस्था थांबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. काही दिवसांपासून या त्यांना सतत कोठे ना कोठे भगदाड पडत आहे. त्यातील अपुऱ्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांवर दुबार पिके घेण्याच्या संधीला मुकण्याची वेळ आली आहे. यामुळे येथील भातशेती धोक्यात आली आहे. याशिवाय, त्यात ठिकठिकाणी गाळही साठला आहे. (वार्ताहर)सूर्या प्रकल्पातील कवडास आणि धामणी धरणांचे पाणी शेतीला पुरवण्यासाठी ३० वर्षांपूर्वी डावा आणि उजवा तीर कालवे बांधण्यात आले आहेत. त्यांचे निकृष्ट बांधकाम आणि त्यांच्या देखभाल तसेच दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे कालव्यांना गळती लागून त्यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. याचे प्रमाण वाढल्याने आणि अनेक ठिकाणी मोठी भगदाडे पडल्याने येथील शेतीला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.