शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

कोरोनाकाळात जिल्ह्यात 11,438 कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:52 IST

महिला व बालकल्याण विभागाने पोषण आहाराचे घरपोच केले वाटप

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्याच्या आदिवासी दुर्गम, अतिदुर्गम आणि ग्रामीण भागांच्या गावपाड्यांसह खेड्यांमध्ये आजमितीस एक हजार ६९० कुपोषित (सॅम, मॅम) बालके जिल्ह्यात रांगत आहेत, तर कोरोना कालावधीत म्हणजे कोरोना  प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या संचारबंदीत ११ हजार ४३८ तीव्र व मध्यम कुपोषित बालकांवर आरोग्य यंत्रणेने उपचार केले आहेत. त्यांच्या सुदृढ आरोग्याकरिता महिला व  बालकल्याण विभागाने पोषण आहाराचे घरपोहोच वाटप करून त्यांची काळजी घेतली. यामध्ये तीव्र कुपोषित एक हजार १५ बालकांसह मध्यम कुपोषित दहा हजार ४२३ बालकांचा समावेश आहे. मात्र, कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाभरातील गावपाड्यांमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होऊन वर्षभरात तब्बल ११ हजार ४३८ बालकांवर उपचार करावा लागल्याचे अहवालावरून उघड झाले आहे.जिल्ह्यात गावपाड्यांतील या कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी शहापूर, डोळखांब या दोन मोठ्या प्रकल्प कार्यालयांसह सात अंशत: आदिवासी प्रकल्प कार्यालये सक्रिय आहेत. या यंत्रणेद्वारे व आरोग्य विभागाच्या निगराणीत या १४७ तीव्र कुपोषित (सॅम) बालकांसह मध्यम कुपोषित (मॅम) एक हजार ५४३, असे एक हजार ६९० कुपोषित आहेत.कुपोषित मुलांवर उपचार करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले असल्याचे दिसून येत आहे.

 जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात सध्याच्या प्रत्येक कुपोषित बालकाचे ट्रेसिंग व ट्रेकिंग, सीटीसी, एनआरसी आणि व्हीसीडीसीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दत्तक पालक योजनेवर कुषोषित बालकांची श्रेणी सुधारण्यावर भर दिला जात आहे. याकरिता महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या समन्वयावर भर दिला जात आहे. यातून नियमित पर्यवेक्षण व संनियंत्रणावर लक्ष दिले जात आहे.     - भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी     अधिकारी, जि. प. ठाणे

१७७३ बालके पाच वर्षांत कुपोषणमुक्तnजिल्ह्यातील एक हजार ७७३ बालके पाच वर्षांत कुपोषणमुक्त झाली आहेत. गेल्या वर्षाच्या कालावधीत ३५७ तीव्र कुपोषित बालकांमध्ये सुधारणा होऊन ते कुपोषणमुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक ५०७ तीव्र कुपोषित बालके २०१६ ला कुपोषणमुक्त झाली आहेत. nत्याखालोखाल २०१७ ला ४१६ बालके, तर २०१८ व २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत अनुक्रमे २६४ व २२९ तीव्र कुपोषित बालके या जीवघेण्या कुपोषणातून मुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. nमात्र, कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाभरातील गावपाड्यांमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होऊन वर्षभरात तब्बल ११ हजार ४३८ बालकांवर वर्षभर उपचार करावा लागला आहे.