शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नोकरी जाण्याच्या भीतीने लोकलला लटकून प्रवास

By संदीप प्रधान | Updated: June 10, 2024 12:00 IST

Mumbai Suburban Railway : प्रवाशांना गृहीत धरून दररोज नवनवी कारणे देत लोकल वाहतूक किमान अर्धा तास उशिरा चालवण्याचा खाक्या त्यांनी वर्षानुवर्षे सुरू ठेवला आहे. या गोंधळामुळे सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी असते. ऑफिसला लेटमार्क होईल, नोकरी जाईल या भीतीने अनेकजण कसेबसे लटकून प्रवास करतात. हात सुटला तर पडून मरण पावतात किंवा जायबंदी होतात.

- संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक)

जगातल्या निगरगट्ट प्रशासनांची यादी केली तर मध्य रेल्वेचे प्रशासन हे सर्वात निगरगट्ट ठरेल. प्रवाशांना गृहीत धरून दररोज नवनवी कारणे देत लोकल वाहतूक किमान अर्धा तास उशिरा चालवण्याचा खाक्या त्यांनी वर्षानुवर्षे सुरू ठेवला आहे. या गोंधळामुळे सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी असते. ऑफिसला लेटमार्क होईल, नोकरी जाईल या भीतीने अनेकजण कसेबसे लटकून प्रवास करतात. हात सुटला तर पडून मरण पावतात किंवा जायबंदी होतात. या प्रत्येक मृत्यूकरिता मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला तरच मध्य रेल्वे सुरळीत होईल.

मागील आठवड्यात मध्य रेल्वेने महामेगाब्लॉक घेतला. ठाणे व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट रुंदीकरणासह कामे केली. लोकल प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावे व वर्क फ्रॉम होम करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे ठाण्याच्या पलीकडे राहणाऱ्या लाखो प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य केले. माध्यमांनी रेल्वेच्या कामाचे व नियोजनाचे कौतुक केले. वेळेत काम पूर्ण केल्याची टिमकी रेल्वे प्रशासनाने वाजवली. सोमवार उजाडल्यावर लोकल वेळेवर धावतील, केलेल्या कामाचा दृश्य स्वरूपात फायदा होईल ही अपेक्षा प्रवाशांनी ठेवली तर त्यात त्यांची चूक काय? पण सोमवारपासून सुरू असलेला गोंधळ आठवडा संपत आला तरी आवरलेला नाही. ब्लॉक घेतल्याने लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग नियंत्रित केला. त्यामुळे गाड्यांचे बंचिंग (एका मागोमाग गाड्या उभ्या राहणे) होते. त्यामुळे गोंधळ सुरू असल्याची निर्लज्ज कबुली रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली. रेल्वेचे अन्य काही अधिकारी खासगीत सांगतात की, मेगाब्लॉकमध्ये केलेली काही कामे सदोष झाल्याने हा बंचिंग कालावधी पहिल्या दिवसापासून हळूहळू कमी झालेला नाही. म्हणजे आता कामात झालेल्या चुका सुधारण्याकरिता नवा महामेगाब्लॉक रेल्वे घेणार का? हस्तीदंती मनोऱ्यातील अधिकाऱ्यांना

दु:ख कसे कळणार?या गोंधळाचा परिणाम असा की, दररोज कुणी ना कुणी लोकलमधून पडून मरण पावत आहे. ज्यांच्यावर कुटुंब अवलंबून आहे, असा माणूस केवळ मध्य रेल्वेच्या अर्धा तास उशिरा लोकल चालवण्यामुळे मरत असेल तर त्याची शिक्षा कुणाला करायची? यावर रेल्वेचे बेरड प्रशासन असा युक्तिवाद करेल की, त्या प्रवाशाला आम्ही लोकलला लटकून प्रवास करायला सांगितले का? बरोबर आहे. अशी जोखीम त्याने पत्करायला नको होती. पण अनेक खासगी कंपन्या वरचेवर कामावर उशिरा येणाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवतात. पोटासाठी धडपडणारा माणूस त्यामुळे जीवावर उदार होतो. कुलाब्यातील बधवार पार्कमधील आलिशान फ्लॅटमध्ये राहायचे आणि सीएसएमटीला काम करायचे अशा हस्तीदंती मनोऱ्यातील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांचे दु:ख कळणार नाही. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी एक दिवस डोंबिवली किंवा दिव्यात सीएसएमटीकडील जलद लोकल सामान्य प्रवाशांसारखी सकाळी पकडून दाखवावी. 

प्रवाशांना होणार फलाटावर आंघोळरेल्वेने ठाण्यातील फलाटांची रुंदी वाढवली. पाऊस आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. या फलाटांवरील शेड पुढेपर्यंत वाढवली नाही तर पावसाळ्यात प्रवाशांना घरी आंघोळ करायची गरज लागणार नाही. धो-धो पाऊस पडत असताना अगोदर छत्री बंद करायची, पावसात भिजायचे की रेल्वेत प्रवेश करायचा अशी तारांबळ प्रवाशांची उडणार नाही. प्रवाशांकरिता नवनवीन संकटे निर्माण करण्याची ही विकृती प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी आहे.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे