शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

ठाणकरपाड्यात कचऱ्याची समस्या

By admin | Updated: July 13, 2015 03:16 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग ‘क’ कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १७, ठाणकरपाडा या प्रभागामध्ये पायवाटांचे काम बऱ्यापैकी झाले असले

अरविंद म्हात्रे , चिकणघरकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग ‘क’ कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १७, ठाणकरपाडा या प्रभागामध्ये पायवाटांचे काम बऱ्यापैकी झाले असले तरी कचऱ्याची समस्या, गटारांच्या दैनंदिन साफसफाईची समस्या मात्र आहेच. या प्रभागातील बराचसा भाग बैठ्या चाळींचा आहे. दोन चाळींच्या पाठीमागच्या गल्ल्यांकडे दुर्लक्ष आहे. गजानन महाराज मंदिर रोडवरील अष्टविनायक चाळीमध्ये पायवाटा नाहीत. कधी तरी बसविलेल्या जुन्या लाद्या निखळलेल्या आहेत. येथे पेव्हरब्लॉक अथवा नव्या टाइल्स का बसविल्या नाहीत, असा सवाल चाळीत राहणारे नागरिक विचारत आहेत.स्वच्छतेच्या बाबतीत जेथे काळजी घ्यायला पाहिजे, तेथे ती घेतली जात नाही. जैन शाळेच्या बाजूलाच कचराकुंडी आहे. या दुर्गंधीचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. आग्रा रोडवरून ठाणकरपाड्यात जाताना रस्त्यावरच ही कचराकुंडी आहे. सकाळी कचरा उचलला तरी दिवसभरात ती पुन्हा भरते. अशीच अवस्था गजानन महाराज मंदिराजवळ आहे. या दोन्ही कचराकुंड्या येथून हटविण्यास नगरसेवकाला काय अडचण आहे, असा सवाल नागरिक करीत आहे. सरहद्दीचा वाद येथेही आहे. ठाणकरपाडा आणि काळातलाव यांच्या हद्दीवरील ठाणकरपाडा- गावठाणचा रस्ता, गटारे अद्याप प्रलंबित आहेत. याच रस्त्यावर मनपाचे हॉस्पिटल आहे. मात्र, विकासकाच्या अनियमित बांधकामामुळे हे सेवेसाठी तयार असलेले हॉस्पिटल अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. या प्रभागातील नगरसेवकांना नागरिकांच्या आरोग्याचे गांभीर्यच नाही. मनपा अधिकाऱ्यांचेही काही जात नसल्याने ते गंभीर नाहीत. मला काय त्याचे, ही धारणा दोघांचीही असल्याने हे हॉस्पिटल सुरू होऊ शकलेले नाही. या प्रभागामध्ये दुर्गानगर, गजानन महाराजनगर, मोहिंदरसिंग काबुलसिंग रोडकडून रमाबाई आंबेडकरनगर, परवाणीचापाडा, साईबाबानगर आदी परिसरांचा समावेश आहे.मोहिंदरसिंग काबुलसिंग रस्त्यावरून हायवेकडे जाताना गजानन महाराज मंदिराकडे वळणाऱ्या रस्त्यावरच सम्राट अशोक चौक आहे. या चौकाच्या सुशोभीकरणासाठी आमदार निधी खर्च झाला आहे. परंतु, चौकाच्या सुशोभीकरणाची कोणतीच निशाणी नजरेस पडत नाही. फक्त सम्राट अशोक चौक असा बोर्ड आहे. विधान परिषद आ. संजय दत्त यांनी हा निधी दिलेला आहे. मात्र, ज्या कामासाठी निधी मिळाला, त्यासाठी तो वापरला गेला नसल्याने चौक भकासच आहे. नगरसेवकाने मात्र प्रभाग समस्यामुक्त झाल्याचा दावा केला आहे.