शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

चार प्रभागांत कचरा कंत्राटदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:15 IST

१०७ कोटींचे कंत्राट : स्थायीत मंजुरी, ओला-सुका कचराही करणार वेगळा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे काम खाजगी कंत्राटदाराला देण्यास शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पाच वर्षांसाठी १०७ कोटींचे हे कंत्राट आहे. याविषयी सर्वपक्षीय सदस्यांनी केलेल्या काही सूचना विचारात घेऊन समितीने ही मंजुरी दिली. यामध्ये कंत्राटदाराने घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याची अट घातली आहे. २४ तासांच्या आत कचरा न उचलल्यास कंत्राटदाराला कचरा उचलण्याच्या दराच्या दुप्पट दंड आकारला जाणार आहे.

‘ब’ व ‘क’ या प्रभाग क्षेत्रांसाठी पाच वर्षांसाठी५९ कोटी १८ लाखांचे, तर ‘ड’ व ‘जे’ या प्रभाग क्षेत्रांसाठी ४८ कोटींचे कंत्राट मंजूर केले आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता शिवसेना सदस्य रमेश म्हात्रे यांनी हा प्रस्ताव पूर्ण माहितीनिशी नाही. तसेच कंत्राटदाराला प्रतिटन कचरा उचलण्यासाठी दिलेला दर जास्त असल्याचा मुद्दा मांडला. शिवसेना सदस्य निलेश शिंदे यांनी ‘ब’ आणि ‘क’ हे प्रभाग क्षेत्र डम्पिंग ग्राउंड प्रकल्पापासून जवळ आहे. तर ‘ड’ आणि ‘जे’ हे दोन्ही प्रभाग कल्याण पूर्वेला असून ते प्रकल्पापासून दूर आहेत. चारही प्रभाग क्षेत्रांत कंत्राटदार कंपनीने कचरा गोळा करण्याचा व वाहतुकीचा दर सारखाच लावलेला आहे, हे लक्षात आणून दिले. शिवसेना सदस्य छाया वाघमारे यांनी शहर स्वच्छतेसाठी हे काम उपयुक्त असले, तरी त्याने योग्य प्रकारे काम केले पाहिजे. मागच्या कंत्राटदाराची पुनरावृत्ती होता कामा नये, अशी प्रशासनाकडे अपेक्षा व्यक्त केली.

शिवसेना सदस्य दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, कंत्राट दिल्यावर कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढणार आहे की नाही? शहर कचराकुंडीमुक्त होणार आहे की नाही? अन्यथा, कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात कचरा पडून राहणार असेल, तर त्याचा उपयोग होणार नाही. या सगळ्या बाबींचा खुलासा प्रशासनाकडून केला पाहिजे.

कचरा उचलण्याचे कंत्राट दिल्याने या चार प्रभागांतील सफाई कर्मचारी अन्य सहा प्रभाग क्षेत्रांत दिले पाहिजेत. ते किती व कधी दिले जातील, याची हमी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी भाजपा सदस्य संदीप पुराणिक यांनी केली. यासंदर्भात उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी खुलासा केला की, कंत्राटदार नेमल्यावर त्याच्याकडून कचरावाहक वाहनांची संख्या वाढणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून द्यायची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. सुका कचरा आणि ओला जैविक कचरा थेट डम्पिंगवर न टाकता त्यावर प्रक्रिया केली जाईल. घरोघरी जाऊन कंत्राटदार कचरा गोळा करणार असल्याने कचराकुंड्या राहणार नाहीत. सगळ्या प्रकारचा कचरा त्याने उचलणे बंधनकारक आहे. जेवढा कचरा उचलला जाईल, तेवढेच पैसे त्याला अदा केले जाणार आहेत.