शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

वाहतूककोंडीचे ‘कल्याण’, अवजड वाहनांची सर्रास वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 3:05 AM

मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीमुळे बंद असल्याने अवजड वाहनांची वाहतूक कल्याण-शीळ मार्गाने वळवण्यात आली आहे.

कल्याण : जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेला मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीमुळे बंद असल्याने अवजड वाहनांची वाहतूक कल्याण-शीळ मार्गाने वळवण्यात आली आहे. परंतु, कल्याणमधून रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत या वाहनांना वाहतुकीस मुभा असली तरी हा नियम तोडून अन्य वेळेतही वाहतूक केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण कल्याण शहरावर पडत असून, येथील नागरिकांना रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता प्रामुख्याने कल्याणमधून जातो. तसेच हा रस्ता पुढे नवी मुंबई, पुणे, पनवेल, तळोजा, मुंबई-नाशिक महामार्गला जोडणारा असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. सध्या मुंब्रा बायपासची अवजड वाहनांची वाहतूक कल्याण-शीळ रस्त्याने वळवल्याने शहरातील कल्याण पत्रीपूल, नेतविली, सूचकनाका, टाटा नाका, लोढा जंक्शन, शिवाजी चौक, सहजानंद चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. विशेषत: कंटनेर, ट्रेलरची वाहतूक भर शहरातून सुरू आहे. अवजड वाहनांसाठी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत वाहतुकीस मुभा आहे. मात्र मुंब्रा बायपास रस्ता बंद असल्याचे कारण पुढे करत हे सगळे कंटनेर कल्याण-शीळ रस्त्याने ये-जा करत करत आहेत.शहरातील अत्यंत वर्दळ असलेल्या शिवाजी चौकात काही दिवसांपूर्वी एक भला मोठा लोखंडी पाइप अवजड वाहनावरून खाली पडला. सकाळी ७ ते १० दरम्यान या चौकात नाका कामगारांची गर्दी असते. परंतु, पाइप पहाटे पडल्याने मोठी जीवितहानी झाली नाही. अन्य वेळी हा अपघात घडला असता तर येथे मोठा अनर्थ घडला असता. या घटनेनंतरही वाहतूक नियंत्रण शाखेचे डोळे उघडलेले नाहीत.कल्याण-शीळपाठोपाठ आता कल्याण-अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावरही कंटेनरची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. या वाहतूकप्रश्नी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांची बुधवारी भेट घेत काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणल्या.कल्याण-शीळ रस्त्यावर अनेक शाळा आहेत. त्या भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी अवजड वाहनांमुळे एकच गर्दी होते. कोंडीचा फटका कल्याण-शीळ रस्त्यावरील कोंडीचे जंक्शन असलेल्या ठिकाणांबरोबर सहजानंद चौक ते कर्णिक रोडलाही बसतो. मुरबाड रोडवरही वाहतूककोंडी होते. त्यामुळे गोविंदवाडी बायपास, वालधुनी रेल्वे उड्डाणपूल, विठ्ठलवाडी-कल्याण रेल्वेमार्गावरील आनंद दिघे उड्डाणपूल, पुढे काटेमानिवली उड्डाणपुलावरही वाहने अडकून पडतात. कल्याण-पुणे लिंक रोडही कोंडीने बाधित होतो. या रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही. परिणामी कोंडीत भर पडत आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे एखादा मोठा अपघात होऊ शकतो, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.>शालेय बेकायदा वाहतुकीकडे कानाडोळाकल्याण शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक मिनी टॅक्सी, रिक्षा यांच्यातून केली जाते. टॅक्सी व रिक्षात प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबले जाते. मात्र, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याकडे आरटीओ व वाहतूक नियंत्रण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अशा प्रकारच्या बेकायदा शालेय वाहतुकीमुळे रिक्षा व टॅक्सीला अपघात होऊन विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या विरोधातही कठोर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला दिले.