शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

परिवहन सेवेचे कंत्राट अखेर केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:25 IST

भाईंदर पालिका : दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार

भाईंदर : मीरा- भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा बंद ठेवून शहरातील नागरिकांना सातत्याने वेठीस धरणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट अखेर आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी रद्द केले आहे. या कंत्राटदाराचे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाशी संगनमत असल्याचा आरोप करीत आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्र ार केली होती. जैन यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.मीरा भार्इंदर महापालिकेने बससेवा चालविण्यासाठी गेल्या वर्षी मनोहर सकपाळ यांच्या भागीरथी एमबीएमटीला कंत्राट दिले होते. कोरोनामुळे बससेवा केवळ परराज्यातील नागरिकांना वसई रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी तसेच पालिका आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने - आण करण्यासाठी चालवली गेली. त्यानंतर मेपासून पालिकेने कंत्राटदारास बससेवा सुरू करण्यास सांगूनही बस चालवल्या नाहीत. कंत्राटदाराने आॅगस्टपासून केवळ उत्तन मार्गावर पाच बस सुरू केल्या त्याही ८ सप्टेंबरपासून बंद पडल्या.कंत्राटदाराने २५ सप्टेंबरपासून १० बस तर २८ सप्टेंबरपासून २१ बस चालवण्याचे सांगूनही सुरूच केल्या नाहीत. बससेवा नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. पालिका आणि सत्ताधारी भाजपने नागरिकांची गैरसोय दूर करण्याऐवजी कंत्राटदाराचा आर्थिक फायदा करून दिल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सरनाईक यांनी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांना केली.वारंवार सांगूनही केले दुर्लक्षकंत्राटदारास मोफत बस दिल्या, अत्याधुनिक डेपो - साहित्य दिले, तिकीट व जाहिरातीचे उत्पन्न दिले. अतिरिक्त पैसे देऊनही त्याला प्रचंड आर्थिक फायदा करूनही तो बस चालवत नसल्याने आमदार जैन यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर आयुक्तांनी सोमवारी कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले. वारंवार सांगूनही बससेवा सुरू न केल्याने मूळ करारनाम्यासह पुरवणी करारनामाही रद्द केला आहे.वारंवार सांगूनही बससेवा सुरू करत नसल्याने भागीरथीचे कंत्राट रद्द करण्यात आले असून, नागरिकांची तातडीची गरज पाहता पालिका बससेवा सुरू करण्याबाबत विचार करीत आहे. परिवहन समितीसमोर प्रस्ताव ठेवून त्यांच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल.- अजित मुठे, उपायुक्त, परिवहन

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक