शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

भाषांतर ही भिन्न संस्कृतींना जोडण्याची कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 01:03 IST

भाषांतर ही भाषेची तोडमोड नाही, तर एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडण्याची कला आहे.

ठाणे : भाषांतर ही भाषेची तोडमोड नाही, तर एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडण्याची कला आहे. म्हणून, एका अर्थाने व्यापकतेकडे जाणे आहे, हे आपण समजून घ्यावे. देश स्वतंत्र झाल्यावर सर्व विद्यापीठे, प्राध्यापक, लेखक यांनी भाषांतराचे कार्य सुरू केले असते, तर आजचा भारत वेगळा असता, असे मत ज्येष्ठ प्रकाशक व लेखक रामदास भटकळ यांनी मांडले.‘वी नीड यू सोसायटी’ या संस्थेतर्फे २० वर्षे परदेशी भाषांतील साहित्य मराठीत भाषांतरित करून पाश्चिमात्य साहित्य व संस्कृतीचा परिचय करून देणाºया ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाला प्रबोधन पुरस्कार देण्यात आला. शनिवारी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. भटकळ म्हणाले की, आपल्याकडे सानेगुरु जींनी अनेक उत्तम ग्रंथ व साहित्याचा सहजसोपा अनुवाद केला आहे. यावर किमान तीन ते चार पिढ्या समृद्ध झाल्या आहेत. याच हेतूने सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारकाने आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र सुरू केले आहे. यात सहभागी होण्याचे प्रयत्न सर्वांनी करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.अनुवाद हे कार्य केवळ तुम्हाला अन्य भाषा येतात म्हणून करता येणारे शास्त्र नाही. त्यासाठी आंतरिक इच्छा व ओढ लागते. नेमका आशय समजावा लागतो. त्यामुळे केलेल्या भाषांतराची ‘स्क्रुटिनी’ महत्त्वाची असते. यामुळे चुकीचे भाषांतर होत नाही किंवा ते सुधारणे शक्य होते. उदा. गिरीश कर्नाड यांच्या एका पुस्तकाचे भाषांतर करताना ‘कॅटरॅक्ट’ या शब्दाचे भाषांतर मोतीबिंदू केले, पण आशयानुसार ते ‘धबधबा’ असायला हवे होते. ही काळजी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. हा पुरस्कार संपादिका सुनंदा महाजन व अनघा भट यांनी स्वीकारला. त्या म्हणाल्या की, हा भाषांतराचा घाट मराठी समाज अधिक समृद्ध होण्यासाठी दिवंगत विद्यासागर महाजन यांनी घातला. वीस वर्षे तो अथकपणे सुरू आहे. वाचकांचा कायम पाठिंबा व सूचना तसेच सकारात्मक अभिप्राय आमची ताकद वाढवतो.>मान्यवरांकडून कथांचे अभिवाचन : कार्यक्र मात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी फ्रेंच कथेचे, श्रीरंग खरावकर यांनी मेक्सिकन व वासंती वर्तक या दोन्ही मान्यवरांनी एकत्रित एका जर्मन कथेचे अभिवाचन केले. ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाचा परिचय नचिकेत कुलकर्णी यांनी, ‘वी नीड यू’च्या कार्याचा परिचय संजीव साने, पुरस्काराची भूमिका जयंत कुलकर्णी व कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले.