शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आगरी महोत्सवातून संस्कृतीची देवाण-घेवाण :विनीता राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 01:23 IST

महोत्सवाचे केले उद्घाटन; स्मरणिकेचे प्रकाशन

डोंबिवली : आगरी महोत्सव हा खरेदी, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि खाद्यसंस्कृतीचा त्रिवेणी संगम आहे, असे मत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनीता राणे यांनी व्यक्त केले.

आगरी युथ फोरमतर्फे १७व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होत्या. या महोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. सावळराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात हा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केडीएमसी महापौर विनीता राणे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

कनसा या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. राणे यांनी हा महोत्सव परंपरा जपण्याचे काम करत आहे, असेही यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, मसापा डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, रामकृष्ण पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, चित्रकार प्रभू कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र चव्हाण म्हणाले की, आगरी महोत्सवाच्या या व्यासपीठावरून अनेक समस्यांना वाचा फोडण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. शहराचा विकास होण्यास या व्यासपीठामुळे मदत झाली.

जगन्नाथ पाटील यांनी वाढणाऱ्या वस्तीला गवसणी घालणे सोपे नाही, असे सांगताच नवीन पिढीला संस्कार देणे गरजेचे आहे, असे सांगितले. आज अतिप्रसंग यांसारख्या घटना घडत आहे. आगरी समाजातील व्यक्ती त्यात नाही. पण तरीही तिसºया पिढीचे प्रबोधन केल्यास त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. या पिढीकडे दुर्लक्ष केले तर ही पिढी वाहवत जाईल.

वाहतूककोंडीवर भाष्य करताना त्यांनी रस्ते वाढत नाही हा सरकारचा दोष असल्याची टीका केली. समाजाची व्याप्ती मोठी असली तरी परंपरेचा पगडा कमी करणे गरजेचे आहे. आगरी युथ फोरमने आगरी महोत्सवाद्वारे समाजप्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. समाजप्रबोधन करणे हे सोपे काम नाही. त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. आगरी समाज लग्न खर्च कमी व्हावा यासाठी बैठका घेत आहे. आगरी समाजातील काही प्रथा आटोक्यात आणण्याची गरज आहे. कणसा या स्मरणिकेतील कथा, कविता वाचण्यास त्यांनी सांगितले. यातील चांगल्या गोष्टीचे चिंतन करण्याचा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

गुलाब वझे यांनी आगरी महोत्सव हा सर्वांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येत असतो. सांस्कृतिक कार्यक्रमातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. खाद्यपदार्थासोबत चांगल्या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने ठेवून बौद्धिक खाद्यही या महोत्सवातून दिले जाते. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आकर्षक देखावे,सेल्फी पॉइंटवर गर्दी

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विविध सणांचे दर्शन घडविणाºया देखावे या महोत्सवात उभारले आहेत. हे देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये विविध सणांची छायाचित्रे अधिक आकर्षण ठरत आहेत. काळ बदलला तसे जीवन गतिमान झाले आणि प्रगतीनुरूप वाहनांचे विविध प्रकार आपल्यासमोर आले. सुरुवातीच्या काळात वापरली जाणारी बैलगाडी आणि सायकल काळाच्या ओघात मागे पडली असली तरी या वाहनांचे स्मरण कायम राहावे यासाठी बैलगाडी, सायकल या वाहनांचा सेल्फी पाइंट ठेवण्यात आला आहे. या सेल्फी पाइंटला सेल्फी काढण्यासाठी तरुणाई गर्दी करत आहे.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे