शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

आगरी महोत्सवातून संस्कृतीची देवाण-घेवाण :विनीता राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 01:23 IST

महोत्सवाचे केले उद्घाटन; स्मरणिकेचे प्रकाशन

डोंबिवली : आगरी महोत्सव हा खरेदी, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि खाद्यसंस्कृतीचा त्रिवेणी संगम आहे, असे मत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनीता राणे यांनी व्यक्त केले.

आगरी युथ फोरमतर्फे १७व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होत्या. या महोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. सावळराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात हा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केडीएमसी महापौर विनीता राणे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

कनसा या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. राणे यांनी हा महोत्सव परंपरा जपण्याचे काम करत आहे, असेही यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, मसापा डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, रामकृष्ण पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, चित्रकार प्रभू कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र चव्हाण म्हणाले की, आगरी महोत्सवाच्या या व्यासपीठावरून अनेक समस्यांना वाचा फोडण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. शहराचा विकास होण्यास या व्यासपीठामुळे मदत झाली.

जगन्नाथ पाटील यांनी वाढणाऱ्या वस्तीला गवसणी घालणे सोपे नाही, असे सांगताच नवीन पिढीला संस्कार देणे गरजेचे आहे, असे सांगितले. आज अतिप्रसंग यांसारख्या घटना घडत आहे. आगरी समाजातील व्यक्ती त्यात नाही. पण तरीही तिसºया पिढीचे प्रबोधन केल्यास त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. या पिढीकडे दुर्लक्ष केले तर ही पिढी वाहवत जाईल.

वाहतूककोंडीवर भाष्य करताना त्यांनी रस्ते वाढत नाही हा सरकारचा दोष असल्याची टीका केली. समाजाची व्याप्ती मोठी असली तरी परंपरेचा पगडा कमी करणे गरजेचे आहे. आगरी युथ फोरमने आगरी महोत्सवाद्वारे समाजप्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. समाजप्रबोधन करणे हे सोपे काम नाही. त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. आगरी समाज लग्न खर्च कमी व्हावा यासाठी बैठका घेत आहे. आगरी समाजातील काही प्रथा आटोक्यात आणण्याची गरज आहे. कणसा या स्मरणिकेतील कथा, कविता वाचण्यास त्यांनी सांगितले. यातील चांगल्या गोष्टीचे चिंतन करण्याचा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

गुलाब वझे यांनी आगरी महोत्सव हा सर्वांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येत असतो. सांस्कृतिक कार्यक्रमातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. खाद्यपदार्थासोबत चांगल्या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने ठेवून बौद्धिक खाद्यही या महोत्सवातून दिले जाते. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आकर्षक देखावे,सेल्फी पॉइंटवर गर्दी

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विविध सणांचे दर्शन घडविणाºया देखावे या महोत्सवात उभारले आहेत. हे देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये विविध सणांची छायाचित्रे अधिक आकर्षण ठरत आहेत. काळ बदलला तसे जीवन गतिमान झाले आणि प्रगतीनुरूप वाहनांचे विविध प्रकार आपल्यासमोर आले. सुरुवातीच्या काळात वापरली जाणारी बैलगाडी आणि सायकल काळाच्या ओघात मागे पडली असली तरी या वाहनांचे स्मरण कायम राहावे यासाठी बैलगाडी, सायकल या वाहनांचा सेल्फी पाइंट ठेवण्यात आला आहे. या सेल्फी पाइंटला सेल्फी काढण्यासाठी तरुणाई गर्दी करत आहे.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे