शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

आगरी महोत्सवातून संस्कृतीची देवाण-घेवाण :विनीता राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 01:23 IST

महोत्सवाचे केले उद्घाटन; स्मरणिकेचे प्रकाशन

डोंबिवली : आगरी महोत्सव हा खरेदी, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि खाद्यसंस्कृतीचा त्रिवेणी संगम आहे, असे मत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनीता राणे यांनी व्यक्त केले.

आगरी युथ फोरमतर्फे १७व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होत्या. या महोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. सावळराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात हा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केडीएमसी महापौर विनीता राणे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

कनसा या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. राणे यांनी हा महोत्सव परंपरा जपण्याचे काम करत आहे, असेही यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, मसापा डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, रामकृष्ण पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, चित्रकार प्रभू कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र चव्हाण म्हणाले की, आगरी महोत्सवाच्या या व्यासपीठावरून अनेक समस्यांना वाचा फोडण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. शहराचा विकास होण्यास या व्यासपीठामुळे मदत झाली.

जगन्नाथ पाटील यांनी वाढणाऱ्या वस्तीला गवसणी घालणे सोपे नाही, असे सांगताच नवीन पिढीला संस्कार देणे गरजेचे आहे, असे सांगितले. आज अतिप्रसंग यांसारख्या घटना घडत आहे. आगरी समाजातील व्यक्ती त्यात नाही. पण तरीही तिसºया पिढीचे प्रबोधन केल्यास त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. या पिढीकडे दुर्लक्ष केले तर ही पिढी वाहवत जाईल.

वाहतूककोंडीवर भाष्य करताना त्यांनी रस्ते वाढत नाही हा सरकारचा दोष असल्याची टीका केली. समाजाची व्याप्ती मोठी असली तरी परंपरेचा पगडा कमी करणे गरजेचे आहे. आगरी युथ फोरमने आगरी महोत्सवाद्वारे समाजप्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. समाजप्रबोधन करणे हे सोपे काम नाही. त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. आगरी समाज लग्न खर्च कमी व्हावा यासाठी बैठका घेत आहे. आगरी समाजातील काही प्रथा आटोक्यात आणण्याची गरज आहे. कणसा या स्मरणिकेतील कथा, कविता वाचण्यास त्यांनी सांगितले. यातील चांगल्या गोष्टीचे चिंतन करण्याचा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

गुलाब वझे यांनी आगरी महोत्सव हा सर्वांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येत असतो. सांस्कृतिक कार्यक्रमातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. खाद्यपदार्थासोबत चांगल्या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने ठेवून बौद्धिक खाद्यही या महोत्सवातून दिले जाते. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आकर्षक देखावे,सेल्फी पॉइंटवर गर्दी

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विविध सणांचे दर्शन घडविणाºया देखावे या महोत्सवात उभारले आहेत. हे देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये विविध सणांची छायाचित्रे अधिक आकर्षण ठरत आहेत. काळ बदलला तसे जीवन गतिमान झाले आणि प्रगतीनुरूप वाहनांचे विविध प्रकार आपल्यासमोर आले. सुरुवातीच्या काळात वापरली जाणारी बैलगाडी आणि सायकल काळाच्या ओघात मागे पडली असली तरी या वाहनांचे स्मरण कायम राहावे यासाठी बैलगाडी, सायकल या वाहनांचा सेल्फी पाइंट ठेवण्यात आला आहे. या सेल्फी पाइंटला सेल्फी काढण्यासाठी तरुणाई गर्दी करत आहे.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे