शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

टाउन हॉलचे कोरोना रुग्णालयात रूपांतर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:55 IST

नेत्यांनी केली मागणी : रुग्णसंख्या ४०० च्या वर गेल्याने उल्हासनगर शहर ठरतेय हॉटस्पॉट

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या ४०० च्या वर गेल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिकेने टाउन हॉल आणि जलतरण इमारतीचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून होत आहे. सोमवारी सुरु झालेल्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ५० च्या पुढे गेली असून संसर्ग रुग्णाची वाढती संख्या बघता रुग्णांना बेड कमी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.उल्हासनगर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून रुग्णांची संख्या मंगळवारी ४०० च्या वर गेली. संसर्ग रुग्णाची अशीच संख्या वाढत राहिल्यास महापालिकेला कोरोना रुग्णालयासाठी नवीन जागा शोधावी लागणार आहे. डॉ. आंबेडकर अभ्यासिकेचे रुपांतर कोरोना रुग्णालयात केले असून १०० ऐवजी १५० बेड येथे ठेवण्यात येणारआहे.तसेच शेजारील आयटीआय कॉलेजमध्ये ६० बेडचे कोरोना रुग्णालय उभारण्याचे काम पालिकेने सुरू केले. कॅम्प नं -४ व ३ येथील कोरोना रुग्णालयातील बेडची क्षमता ५० ऐवजी ७५ केली असून प्रत्यक्षात ८० पेक्षा जास्त रुग्ण ठेवण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनालकर यांनीदिली.कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाची वाढती संख्या बघून व त्यांना वेळेत व चांगले उपचार मिळण्यासाठी रुग्णालयासाठी जागा शोधण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. नेत्यांनी महापालिकेच्या टाऊन हॉल व तरणतलाव येथील इमारतीचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे लावून धरली आहे.तसेच त्याठिकाणी संशयित कोरोना रुग्णांना क्वारंटाइन करण्याचेही सुचविले आहे. दोन्ही इमारती चांगल्या अवस्थेत असून मुख्य रस्त्याला लागून असल्याने कोणतीही समस्या निर्माण होणार नसल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.बदलापुरात एकाच दिवशी २९ रुग्णबदलापूर : शहरात बुधवारी कोरोनाचे नवीन २९ रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांमधील २२ रुग्ण हे बाधित व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. तर दोघांना संसर्ग कसा झाला हे समजू शकलेले नाही. उर्वरित पाच रुग्णांमध्ये एक वैद्यकीय कर्मचारी, प्रिंटिंग प्रेसमधील एक कर्मचारी, मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी आणि दोन जण लॅब टेक्निशियन आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या २६१ इतकी झाली आहे. दुसरीकडे १३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, १२४ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पालिकेस बुधवारी ५२ जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २९ जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.भिवंडीत १९ नवे रु ग्णभिवंडी : भिवंडी शहरात १२ तर ग्रामीण भागात सात कोरोना रुग्ण बुधवारी आढळले. ग्रामीण भागात खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दोन, दिवा अंजुर येथे चार तर अनगाव येथे एक रुग्ण सापडला.क्वारंटाइन सेंटर दीड तास अंधारातठाणे : पावसामुळे भार्इंदरपाड्यातील क्वारंटाइन सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळीही वीज गेल्याने रुग्णांना दीड तास अंधारात काढावा लागला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस