शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

'नविन ठाणे रेल्वेस्थानकाच्या हस्तांतरित प्रक्रियेला गती मिळावी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 15:11 IST

भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या सुरू झालेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनला 166 वर्षे पूर्ण झाली आहेत

ठाणे : ठाणे शहराची मागील दोन दशकांत प्रचंड झालेली लोकसंख्या वाढ, त्यामुळे दररोज रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडत असलेल्या घटना तसेच रेल्वे प्रवाशांच्या जागेअभावी अपुऱ्या पडणाऱ्या सोयीसुविधा, याकरिता ठाणे महानगरपालिकेने ठाणे रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी राज्यपालांची भेट घेतली. ठाणे-मुलुंड दरम्यान ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर नवीन रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची जागा महानगरपालिकेस हस्तांतरित प्रक्रियाला गती मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची शनिवारी रात्री ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी राजभवनावर जाऊन भेट घेतली, व त्यांना पत्राद्वारे निवेदन दिले. 

भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या सुरू झालेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनला 166 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यामुळे या ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 7 ते 8 लाख प्रवासी रोज ये-जा करीत असतात ठाणे-मुलुंड दरम्यान दिवसाला 4 ते 5 प्रवासी गर्दीमुळे रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडतात. तर मध्य रेल्वेवर दिवसाला 12 जण मृत्युमुखी पडतात, गेल्या 5 वर्षात अंदाजे 3 हजार प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामध्ये ठाणे-मुलुंड दरम्यान मृत्युमुखी पडण्याच्या घटना अधिक असल्याने ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी ठाणे महानगरपालिकेने रेल्वे रुळालगत असलेली ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयच्या 63 एकर जागेपैकी 14.83 एकर जागा द्यावी. ठाणे महानगरपालिकेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हस्तांतरित करण्यास विलंब लागत असल्याने आपण यासंदर्भात दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवांमार्फत ही जागा लवकर हस्तांतरीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी राज्यपालांकडे केली. 

या प्रस्तावाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक  यांच्याकडून सन 2017 ला मंजुरी मिळाली आहे. तसेच या नवीन रेल्वेस्थानकासाठी मनोरुग्णालयाची जागा मिळविण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी अंतर्गत या प्रकल्पासाठी 289 कोटी इतकी रक्कम ठाणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीकडे वर्गही करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने निविदा करून या स्थानकाच्या भूमी परीक्षणाचे कामही सुरू झाले आहे. परंतु, या  जागा हस्तांतरीत प्रक्रियेस विलंब लागत असल्याने रेल्वे रुळाच्याकामासाठी रेल्वेकडे पैसे वर्ग करता येत नाही, याची खंत राज्यपालांशी चर्चा करताना खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली. एलफिस्टन रोडवर झालेल्या दुर्देवी घटनेची पुनरावृत्ती ठाणे स्थानकात होऊ नये, यासाठी संपूर्ण ठाणेकर या नवीन रेल्वेस्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील 31 टक्के व मुलुंड रेल्वे स्थानकातील 24 टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे हेही विचारे यांनी राज्यपालांना पटवून दिले. 

टॅग्स :thaneठाणेMumbai Localमुंबई लोकलlocalलोकल