शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाहतूक पोलिसांची वर्षभरात दीड कोटीची दंडात्मक वसुली, बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:59 IST

रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७ हजार ८२५ प्रकरणांत दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे.

महाड - रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७ हजार ८२५ प्रकरणांत दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ४० लाख ५४ हजार ४०० रु पये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये वाहने चालवणा-या १७५ अल्पवयीन मुलांच्या पालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.रायगड जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वाढतोय, शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे रस्ते अपघातांंसह वाहतूककोंडी देखील वाढतच आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन हे या मागचे प्रमुख कारण असल्याचे वास्तव पुढे आले आहे. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी व वाहतुकीवर नियंत्रण राहावे याकरिता तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात वाहतूक पोलीस कर्मचाºयांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्ग, इतर प्रमुख रस्ते, शहरे या ठिकाणी मोहीम सुरू आहे.वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतातच, परंतु अल्पवयीन मुलांना दुचाकी देणारे बेजबाबदार पालकही मुलांच्या अपघातांना कारणीभूत असतात. अशा पालकांना पोलिसांनी जरब दाखवली आहे. वाहतूक पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात जिल्ह्यातील १७५ अतिउत्साही पालकांवर त्यांच्या मुलांना वाहने चालवण्यास दिल्या प्रकरणी कोर्टाची पायरी चढावी लागली आहे.याशिवाय वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहने हाकताना सिट बेल्ट न बांधणे, हेल्मेट न वापरणे आणि मोबाइलवर बोलणे, वाहनांना गॉगल काचा, सिग्नल तोडणे, धोक्याची ड्रायव्हिंग, अतिवेग, मद्यपान करून गाडी चालवणे, नो पार्किंग व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक अशा विविध प्रकारे वाहतूक नियम मोडणाºयांवर कारवाई करण्यात आली आहे.६ हजार २१६ जणांवर कारवाईच्सिट बेल्ट न बांधणाºया ६ हजार २१६ जणांवर कारवाई झाली असून हे प्रमाण सर्वाधिक आहे, तर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक कारवाई केवळ १४ जणांवर झाली आहे. ही संख्या सर्वात कमी असली तर दंडात्मक वसुली सर्वाधिक म्हणजेच २० लाख झालेली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRaigadरायगड