शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

उल्हासनगरातील वाहतूक होणार सुसाट; कल्याण-अंबरनाथ मार्गावर बनणार उड्डाणपूल 

By सदानंद नाईक | Updated: October 21, 2023 16:14 IST

मुख्य रस्त्यावर बनणार ५५४ कोटीतून उड्डाणपूल, एमएमआरडीएला प्रस्ताव

उल्हासनगर : शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचे संकेत महापालिकेने दिल्याने, शहरातील वाहतूक सुसाट होणार आहे. गेल्या महिन्यात ५५४ कोटीचा उड्डाणपूल बांधण्याचा प्रकल्प अहवाल महापालिकेने एमएमआरडीएला पाठविल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. 

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्तासह इतर दोन ते तीन रस्त्याचा अपवाद सोडल्यास बहुतांश रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्ता १०० फुटी असूनही वाहन संख्या जास्त असल्याने, वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. शहरातील वाहतूक सुसाट होण्यासाठी एमएमआरडीएने या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा (डीपीआर) प्रकल्प अहवाल महापालिकेकडून मागविला होता. त्यानुसार आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे व शहर अभियंता संदीप जाधव यांच्या संकल्पनेतून गेल्या महिन्यात ५५४ कोटी ५१ लाखाचा सविस्तर प्रकल्प अहवाल एमएमआरडीएला पाठविला आहे. एमएमआरडीएने उड्डाणपुलाच्या प्रकल्प अहवालाला मान्यता दिल्यास, नवीन वर्षात उड्डाणपुलाच्या कामाला सुरू होणार असल्याचे संकेत शहर अभियंता जाधव यांनी दिले.

 शहरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल झाल्यास, बाहेरून येणारी वाहने थेट उड्डाणपूलाद्वारे शहराबाहेर जाणार असल्याने, वाहतूक कोंडी होणार नाही. असे शहर अभियंता जाधव यांचे म्हणणे आहे. देशात सर्वाधिक घनतेचे शहर म्हणून उल्हासनगरची ओळख असून क्षेत्रफळाच्या प्रमाणात वाहनाची संख्या जास्त आहे. मात्र वाहनांच्या प्रमाणात रस्ते अरुंद असल्याने, वाहतूक कोंडी समस्या निर्माण झाली. कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल उभा राहिल्यास वाहतूक समस्या निकाली निघणार असल्याचे आयुक्त अजीज शेख यांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त एमएमआरडीएने शहरातील एकून ७ मुख्य रस्ते बांधणीला गेल्या वर्षी मंजुरी दिली. त्यासाठी १५० कोटींची तरतूद आहे. मात्र अध्यापही रस्त्याच्या कामाला सुरूवात झाले नसल्याने, आरोप प्रत्यारोप होत आहे. 

शहर विकास आराखड्याला मूठमाती शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शहर विकास आराखड्यानुसार विकास कामे केले जातात. मात्र याला उल्हासनगर अपवाद आहे. एकून ७ रस्त्यासाठी १५० कोटीचा निधी मंजूर आहे. मात्र रस्ते डीपीनुसार होण्याऐवजी रस्ता जसा आहे, त्यानुसार बांधण्याचा महापालिकेने संकेत दिले. त्यामुळे भविष्यात शहर कसे असेल? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.