शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

उल्हासनगरातील वाहतूक होणार सुसाट; कल्याण-अंबरनाथ मार्गावर बनणार उड्डाणपूल 

By सदानंद नाईक | Updated: October 21, 2023 16:14 IST

मुख्य रस्त्यावर बनणार ५५४ कोटीतून उड्डाणपूल, एमएमआरडीएला प्रस्ताव

उल्हासनगर : शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचे संकेत महापालिकेने दिल्याने, शहरातील वाहतूक सुसाट होणार आहे. गेल्या महिन्यात ५५४ कोटीचा उड्डाणपूल बांधण्याचा प्रकल्प अहवाल महापालिकेने एमएमआरडीएला पाठविल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. 

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्तासह इतर दोन ते तीन रस्त्याचा अपवाद सोडल्यास बहुतांश रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्ता १०० फुटी असूनही वाहन संख्या जास्त असल्याने, वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. शहरातील वाहतूक सुसाट होण्यासाठी एमएमआरडीएने या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा (डीपीआर) प्रकल्प अहवाल महापालिकेकडून मागविला होता. त्यानुसार आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे व शहर अभियंता संदीप जाधव यांच्या संकल्पनेतून गेल्या महिन्यात ५५४ कोटी ५१ लाखाचा सविस्तर प्रकल्प अहवाल एमएमआरडीएला पाठविला आहे. एमएमआरडीएने उड्डाणपुलाच्या प्रकल्प अहवालाला मान्यता दिल्यास, नवीन वर्षात उड्डाणपुलाच्या कामाला सुरू होणार असल्याचे संकेत शहर अभियंता जाधव यांनी दिले.

 शहरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल झाल्यास, बाहेरून येणारी वाहने थेट उड्डाणपूलाद्वारे शहराबाहेर जाणार असल्याने, वाहतूक कोंडी होणार नाही. असे शहर अभियंता जाधव यांचे म्हणणे आहे. देशात सर्वाधिक घनतेचे शहर म्हणून उल्हासनगरची ओळख असून क्षेत्रफळाच्या प्रमाणात वाहनाची संख्या जास्त आहे. मात्र वाहनांच्या प्रमाणात रस्ते अरुंद असल्याने, वाहतूक कोंडी समस्या निर्माण झाली. कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल उभा राहिल्यास वाहतूक समस्या निकाली निघणार असल्याचे आयुक्त अजीज शेख यांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त एमएमआरडीएने शहरातील एकून ७ मुख्य रस्ते बांधणीला गेल्या वर्षी मंजुरी दिली. त्यासाठी १५० कोटींची तरतूद आहे. मात्र अध्यापही रस्त्याच्या कामाला सुरूवात झाले नसल्याने, आरोप प्रत्यारोप होत आहे. 

शहर विकास आराखड्याला मूठमाती शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शहर विकास आराखड्यानुसार विकास कामे केले जातात. मात्र याला उल्हासनगर अपवाद आहे. एकून ७ रस्त्यासाठी १५० कोटीचा निधी मंजूर आहे. मात्र रस्ते डीपीनुसार होण्याऐवजी रस्ता जसा आहे, त्यानुसार बांधण्याचा महापालिकेने संकेत दिले. त्यामुळे भविष्यात शहर कसे असेल? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.