शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वाहतूक कोंडीचा जाच घोडबंदरकरांच्या पाचवीलाच, उलटलेल्या टोमॅटो ट्रकने घोडबंदर रोड पाच तास रोखला

By अजित मांडके | Updated: January 23, 2024 16:58 IST

या अपघातात ट्रकमधील सुमारे २ ते ३ टन टोमॅटो रस्त्यावर पसरून अक्षरश: चिखल झाला होता. तसेच ट्रकमधील तेलही रस्त्यावर सांडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला.

ठाणे : वाहतूक कोंडी घोडबंदरवासियांची पाठ सोडत नसल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी बोरिवली येथे घोडबंदर रोड मार्गे निघालेल्या टोमॅटोच्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक पातलीपाडा उड्डाणपुलावर उलटल्याची घटना पहाटे चार ते सव्वाचार वाजण्याच्या घडली. या अपघातात ट्रकमधील सुमारे २ ते ३ टन टोमॅटो रस्त्यावर पसरून अक्षरश: चिखल झाला होता. तसेच ट्रकमधील तेलही रस्त्यावर सांडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर तो उड्डाणपूल वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. परंतु त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास पुन्हा मानपाडा उड्डाणुपलावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कंटेनर बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम अंतर्गत रस्त्यावर देखील झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दुपारच्या सत्रात शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना काहीसा लेट मार्क लागला.

महेंद्र गुप्ता यांच्या मालकीच्या ट्रकमधून सुमारे २ ते ३ टन टोमॅटो हे शिरपूर येथून घोडबंदर रोडवरून बोरिवलीला घेऊन निघाला होता. ठाण्यातून जाताना पातलीपाडा उड्डाणपुलावर चालकाचा त्या ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक उलटला. या घटनेत ट्रक मधील टोमॅटो रस्त्यावर पसरले तसेच तेल ही सांडले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी या विभागांनी धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून घटनास्थळावरून ट्रक चालक पळून गेला. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक हायड्रा मशिनच्या साहाय्याने रोडच्या बाजूला करण्यात आला आहे.

याशिवाय पातलीपाडा उड्डाणपुलावरती पडलेले टोमॅटो जेसीबी मशीनच्या सहाय्याने व घनकचरा विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने उचलून घनकचरा विभागाच्या घंटागाडीमध्ये भरण्यात आले आहेत. तर, टोमॅटो पडून चिखल झालेल्या रोडवरती अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारून तो रस्ता साफ करण्यात आला असून सांडलेल्या तेलावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांमार्फत माती पसरविण्यात आली. त्याच्यानंतर पातलीपाडा उड्डाणपूल सुमारे ०५ तासाच्या प्रयत्नानंतर वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

दुसरीकडे ही कोंडी फुटत नाही तोच घोडबंदरवरुन ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मानपाडा येथील उड्डाणपुलावर सकाळी ११ च्या सुमारास कंटेनर बंद पडल्याची घटना घडली. हा कंटेनर पुलावर चढतांनाच बंद पडल्याने त्याचा परिणाम वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. तर या कोंडीतून सुटण्यासाठी वाहन चालकांनी हिरानंदानी मार्गे आझाद नगर, ढोकाळी या मार्गाचा अवलंब केला. मात्र एकाच वेळी अनेक वाहने येथील अंतर्गत रस्त्यांवर आल्याने या मार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. दुपारी १२ च्या सुमारास वाहतूक पोलिसांनी कंटेनर हटविण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरु झाली. परंतु यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना काहीसा लेटमार्क लागल्याचेही दिसून आले. 

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी