शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीचा जाच घोडबंदरकरांच्या पाचवीलाच, उलटलेल्या टोमॅटो ट्रकने घोडबंदर रोड पाच तास रोखला

By अजित मांडके | Updated: January 23, 2024 16:58 IST

या अपघातात ट्रकमधील सुमारे २ ते ३ टन टोमॅटो रस्त्यावर पसरून अक्षरश: चिखल झाला होता. तसेच ट्रकमधील तेलही रस्त्यावर सांडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला.

ठाणे : वाहतूक कोंडी घोडबंदरवासियांची पाठ सोडत नसल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी बोरिवली येथे घोडबंदर रोड मार्गे निघालेल्या टोमॅटोच्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक पातलीपाडा उड्डाणपुलावर उलटल्याची घटना पहाटे चार ते सव्वाचार वाजण्याच्या घडली. या अपघातात ट्रकमधील सुमारे २ ते ३ टन टोमॅटो रस्त्यावर पसरून अक्षरश: चिखल झाला होता. तसेच ट्रकमधील तेलही रस्त्यावर सांडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर तो उड्डाणपूल वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. परंतु त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास पुन्हा मानपाडा उड्डाणुपलावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कंटेनर बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम अंतर्गत रस्त्यावर देखील झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दुपारच्या सत्रात शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना काहीसा लेट मार्क लागला.

महेंद्र गुप्ता यांच्या मालकीच्या ट्रकमधून सुमारे २ ते ३ टन टोमॅटो हे शिरपूर येथून घोडबंदर रोडवरून बोरिवलीला घेऊन निघाला होता. ठाण्यातून जाताना पातलीपाडा उड्डाणपुलावर चालकाचा त्या ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक उलटला. या घटनेत ट्रक मधील टोमॅटो रस्त्यावर पसरले तसेच तेल ही सांडले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी या विभागांनी धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून घटनास्थळावरून ट्रक चालक पळून गेला. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक हायड्रा मशिनच्या साहाय्याने रोडच्या बाजूला करण्यात आला आहे.

याशिवाय पातलीपाडा उड्डाणपुलावरती पडलेले टोमॅटो जेसीबी मशीनच्या सहाय्याने व घनकचरा विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने उचलून घनकचरा विभागाच्या घंटागाडीमध्ये भरण्यात आले आहेत. तर, टोमॅटो पडून चिखल झालेल्या रोडवरती अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारून तो रस्ता साफ करण्यात आला असून सांडलेल्या तेलावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांमार्फत माती पसरविण्यात आली. त्याच्यानंतर पातलीपाडा उड्डाणपूल सुमारे ०५ तासाच्या प्रयत्नानंतर वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

दुसरीकडे ही कोंडी फुटत नाही तोच घोडबंदरवरुन ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मानपाडा येथील उड्डाणपुलावर सकाळी ११ च्या सुमारास कंटेनर बंद पडल्याची घटना घडली. हा कंटेनर पुलावर चढतांनाच बंद पडल्याने त्याचा परिणाम वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. तर या कोंडीतून सुटण्यासाठी वाहन चालकांनी हिरानंदानी मार्गे आझाद नगर, ढोकाळी या मार्गाचा अवलंब केला. मात्र एकाच वेळी अनेक वाहने येथील अंतर्गत रस्त्यांवर आल्याने या मार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. दुपारी १२ च्या सुमारास वाहतूक पोलिसांनी कंटेनर हटविण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरु झाली. परंतु यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना काहीसा लेटमार्क लागल्याचेही दिसून आले. 

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी