शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

वाहतूक कोंडीचा जाच घोडबंदरकरांच्या पाचवीलाच, उलटलेल्या टोमॅटो ट्रकने घोडबंदर रोड पाच तास रोखला

By अजित मांडके | Updated: January 23, 2024 16:58 IST

या अपघातात ट्रकमधील सुमारे २ ते ३ टन टोमॅटो रस्त्यावर पसरून अक्षरश: चिखल झाला होता. तसेच ट्रकमधील तेलही रस्त्यावर सांडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला.

ठाणे : वाहतूक कोंडी घोडबंदरवासियांची पाठ सोडत नसल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी बोरिवली येथे घोडबंदर रोड मार्गे निघालेल्या टोमॅटोच्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक पातलीपाडा उड्डाणपुलावर उलटल्याची घटना पहाटे चार ते सव्वाचार वाजण्याच्या घडली. या अपघातात ट्रकमधील सुमारे २ ते ३ टन टोमॅटो रस्त्यावर पसरून अक्षरश: चिखल झाला होता. तसेच ट्रकमधील तेलही रस्त्यावर सांडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर तो उड्डाणपूल वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. परंतु त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास पुन्हा मानपाडा उड्डाणुपलावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कंटेनर बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम अंतर्गत रस्त्यावर देखील झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दुपारच्या सत्रात शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना काहीसा लेट मार्क लागला.

महेंद्र गुप्ता यांच्या मालकीच्या ट्रकमधून सुमारे २ ते ३ टन टोमॅटो हे शिरपूर येथून घोडबंदर रोडवरून बोरिवलीला घेऊन निघाला होता. ठाण्यातून जाताना पातलीपाडा उड्डाणपुलावर चालकाचा त्या ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक उलटला. या घटनेत ट्रक मधील टोमॅटो रस्त्यावर पसरले तसेच तेल ही सांडले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी या विभागांनी धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून घटनास्थळावरून ट्रक चालक पळून गेला. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक हायड्रा मशिनच्या साहाय्याने रोडच्या बाजूला करण्यात आला आहे.

याशिवाय पातलीपाडा उड्डाणपुलावरती पडलेले टोमॅटो जेसीबी मशीनच्या सहाय्याने व घनकचरा विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने उचलून घनकचरा विभागाच्या घंटागाडीमध्ये भरण्यात आले आहेत. तर, टोमॅटो पडून चिखल झालेल्या रोडवरती अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारून तो रस्ता साफ करण्यात आला असून सांडलेल्या तेलावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांमार्फत माती पसरविण्यात आली. त्याच्यानंतर पातलीपाडा उड्डाणपूल सुमारे ०५ तासाच्या प्रयत्नानंतर वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

दुसरीकडे ही कोंडी फुटत नाही तोच घोडबंदरवरुन ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मानपाडा येथील उड्डाणपुलावर सकाळी ११ च्या सुमारास कंटेनर बंद पडल्याची घटना घडली. हा कंटेनर पुलावर चढतांनाच बंद पडल्याने त्याचा परिणाम वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. तर या कोंडीतून सुटण्यासाठी वाहन चालकांनी हिरानंदानी मार्गे आझाद नगर, ढोकाळी या मार्गाचा अवलंब केला. मात्र एकाच वेळी अनेक वाहने येथील अंतर्गत रस्त्यांवर आल्याने या मार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. दुपारी १२ च्या सुमारास वाहतूक पोलिसांनी कंटेनर हटविण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरु झाली. परंतु यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना काहीसा लेटमार्क लागल्याचेही दिसून आले. 

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी