शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नेवाळी फाट्यावर वाहतूक कोंडी झालीये नित्याची; रुग्णवाहिका काढायलाही पोलिसांना लागतोय वेळ

By पंकज पाटील | Updated: May 31, 2023 17:57 IST

अशाच वाहतूक कोंडीत अर्धा तास रुग्णवाहिका देखील अडकली होती. 

अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा हा सध्या वाहतूक कोंडीचे नवीन डेस्टिनेशन झाल्याची जाणीव होऊ लागली आहे. नेवाळी फाट्यावर वाहतूक पोलिसांना योग्य नियोजन करता येत नसल्याने या चौकात दररोज वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. आज दुपारी एक वाजता अशाच वाहतूक कोंडीत अर्धा तास रुग्णवाहिका देखील अडकली होती. 

काटईनाका ते बदलापूर या राज्य महामार्गातील नेवाळी फाटा हे सर्वात वरदळीचे ठिकाण ठरत आहे. नेवळी फाट्यावरून एक रस्ता हा मलंगडकडे तर दुसरा रस्ता कल्याण शहराकडे जात असल्यामुळे या राज्य महामार्गावर नियमित वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चौकात पोलीस चौकी देखील असून त्या ठिकाणी 24 तास पोलीस कर्मचारी तैनात असतात. असे असले तरी वाहतुकीचे नियोजन करण्यात पोलीस प्रशासन आणि वाहतूक पोलिसांना देखील अपयश येत आहे. याच राज्य महामार्गाच्या एका भागात काँक्रिटी करण्याचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.

बुधवारी दुपारी एक वाजता याच ठिकाणी भली मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तब्बल दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दहा ते पंधरा मिनिटं एकाच ठिकाणी वाहन चालकांना गाडीतच थांबावे लागत होते, तर वाहतूक क्लियर करण्यासाठी देखील वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. नेवाळी फाट्यावर वाहतूक कोंडी झाल्यावर स्थानिक ग्रामस्थांसह अनेक वाहन चालक हे रॉंग साईडने गाड्या टाकत असल्याने त्याचा देखील वाहतूक कोंडीला दुहेरी फटका बसत आहे.

आज दुपारी झालेल्या वाहतूक कोंडीत तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ एका रुग्णवाहिकेला उभी करून ठेवण्याची वेळ आली होती. अखेर काही नागरिकांनी पुढाकार घेतल्यानंतर या ॲम्बुलन्सला रॉंग साईडने जागा उपलब्ध करून देत ती पुढे मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. नेवाळी फाटा परिसरात होणारी वाहतूक कोंडी ही आता स्थानिक नागरिकांसाठी देखील डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ