शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

येऊर परिसरातील धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 22:55 IST

वनविभागाने घातले निर्बंध : प्रवेशद्वार सायंकाळी ७ नंतर राहणार बंद.

जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळ्यात धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक वाढत्या पाण्यात अडकून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येऊर परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यासाठी वनविभागाने बंदोबस्त नेमला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील येऊरच्या जंगलातील धबधबे हे तरुण पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. परंतु, धबधब्यांचे पाणी वाढल्यानंतर धबधब्यांच्या जवळील नाल्यांत अनेकवेळा पर्यटक अडकल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. लोणावळा आणि राज्यभरातील धबधब्यांच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर येऊरच्या धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. येऊर परिसर हा संरक्षित घोषित केला असल्याने या ठिकाणी जाण्याला बंदी आहे. तरीही काही उत्साही तरुण छुप्या वाटेने या ठिकाणी पोहोचतात. पावसाळ्यात येऊरमध्ये होणाऱ्या मद्य पार्ट्यांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन गेटवर वनविभागाकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते. सुरक्षेचा उपाय म्हणून येऊर प्रवेशद्वार सायंकाळी ७ वाजेनंतर बंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा, गावातील नागरिक, वायू दलाचे अधिकारी, पोलिस आणि वन कर्मचारी यांनाच सायंकाळी ७ वाजेनंतर येऊरला प्रवेश देण्यात येतो, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे