शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उल्हासनगरात महिलांच्या जुगार अड्ड्यावर धाड एकूण ८ महिलांवर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: April 16, 2025 20:29 IST

रोख रक्कम जप्त ठाणे, कल्याणहून आल्या जुगार खेळण्याला 

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहराच्या गजबजलेल्या नेहरू चौकातील एका इमारतीच्या फ्लॅट मधील महिला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून ८ महिलांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम जप्त केली असून ठाणे, कल्याण, ग्रामीण परिसरातील महिला येथे जुगार खेळण्यासाठी आल्याचे उघड झाले. या महिलांचे पती उधोगपती व व्यापारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, नेहरू चौकातील क्लासिक इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भतानी नावाची ६० वर्षाची महिला खास महिलांसाठी जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी रात्री साडे आठ वाजता पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळणाऱ्या ८ महिलांना अटक केली. त्यांच्याकडून ३५ हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी दिली. गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या महिलांची चौकशी करून वैयक्तिक जामीनावर सुटका करण्यात आली. सर्वच महिलांचे वय ५० च्या पुढे असून जुगार अड्डा चालविणाऱ्या भतानी नावाच्या महिलेचे वय-६० वर्ष तर बुधवानी नावाची महिला ७० वर्षाची आहे. बहुतांश महिलांचे पती नामचिन उधोगपती व व्यावसायिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी आलेली कानडे नावाची महिला कळवा ठाणे येथील रहिवासी आहे. कटारिया नावाची महिला वरप कल्याण तर वाधवा नावाची महिला खडकपाडा कल्याण येथील राहणारी आहे. इतर महिला शहरातील विविध भागातील राहणाऱ्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार पोलिसांनी महिला जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली असून असे महिला जुगार अड्डे बंद घरात व फ्लॅट मध्ये सुरु आहेत. त्यांची भनक पोलिसांना लागत नाही. असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. क्लासिक इमारतीचे नागरिक व शेजारील नागरिक याबाबत काहीएक बोलण्यास तयार नाहीत. यापूर्वी कॅम्प नं-१, राम मॉलिशवाले परिसरात महिलांना जुगार अड्ड्यावर कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महिलांच्या मानसन्मानाला धक्का बसणार

महिला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या ८ महिलांवर गुन्हा दाखल झाला. महिलांचे वय ५० पुढील असल्याने, त्यांची नावे प्रसिद्ध करू नका. त्यांच्या मानसन्मानाला ठेच पोहचून जीवाचे बरे वाईट करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी