शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ठाणे - उल्हासनगरला  चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 19:20 IST

ठाणे येथे दोन व उल्हासनगर येथील एकाची पावसा दरम्यान मयत झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाकडून कळले. यामध्ये ठाणे येथील मनोरूग्णालय परिसरातील वसाहतीमधील संतोष जाधव (१८) हा तरूण घरात पाणी शिरले असता फ्रीज हलवत असताना त्यास वीजेचा शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर दिवा येथील डीजे कंपाऊंड जवळील नाल्यात सुनित पुनीत (३०) हा तरूण नाल्यात पडून दगावला

ठळक मुद्दे* भातसाचे पाच दरवाजे उघडलेभातसा नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशाराभातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर इतके उघडण्यात आले

ठाणे :जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. या कालावधीत ठाणे व दिवा येथील दोघांसह उल्हासनगर शहरातील दोघे आदी चार जणांचा मृत्यू झाला. यातील तिघे विजेच्या धक्याने व एकाचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. तर भातसा धरण भरल्यामुळे त्यांचे पाच दरवाजे उघडले आहेत. या भातसा नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.         ठाणे येथे दोन व उल्हासनगर येथील एकाची पावसा दरम्यान मयत झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाकडून कळले. यामध्ये ठाणे येथील मनोरूग्णालय परिसरातील वसाहतीमधील संतोष जाधव (१८) हा तरूण घरात पाणी शिरले असता फ्रीज हलवत असताना त्यास वीजेचा शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर दिवा येथील डीजे कंपाऊंड जवळील नाल्यात सुनित पुनीत (३०) हा तरूण नाल्यात पडून दगावला. तर उल्हासनगर येथील गौरी पाडा येथील मनीष चव्हाण या तरूणांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. आजच्या या पावसा दरम्यान झालेल्या. तर आमच्या वार्ताहर कळवतो की उल्हासनगर येथील कॅम्प नंबर एकमध्ये एका बालीकेचा वीजेच्या धक्कयाने मृत्यू झाल्याची घडली आहे.जिल्ह्याभरातील या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. मात्र निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे काही शाळा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहोच करण्याची जबाबदार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शाळांवर सोपवण्यात होती. रेल्वे सेवा पार कोलमडली आहे. सकाळच्या कालावधीत काही ठिकाणी उपनगरीय गाड्यांची सेवा काही काळ बंद करावी लागली. ठाणे स्टेशन परिसरात रेल्वे रूळावर पाणी साचले होते. त्यानंतर दुपारी सुमारे दीड तास उशिराने उपनगरीय गाड्याची वाहतूक सुरू राहिली. सकाळच्या कालावधीत उल्हासनदीच्या पुराचे पाणी वाढल्यामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या महामार्गावरील माळशेज घाटातील अंबे वळणावर एक झाड पडले. ते त्वरीत हटवण्याचे कामही महामार्ग बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचे उपकार्यकारी अभियंता सुनील पाटील, यांनी सांगिले.कल्याण रेल्वे स्थानकातील छत गळतीमुळे प्लॅटफार्मवर पाणीच पाणी झाल्यामुळे प्रवाशांना उभे राहाण्यात अडथळा निर्माण झाला.याशिवाय कल्याण स्टेशन परिसरातही पाणी साचले. तर टाटा पॉवरहाऊस, वरपगांव, म्हारळ, कांबा, टिटवाळा परिसरातील रूंदी आदीं परिसरात पाणी साचले. नद्या पुराच्या पाण्यामुळे दूथडी वाहत होत्या. सततच्या पावसामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर इतके उघडण्यात आले. या धरणातून भातसा सुमारे ९३४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे भातसा नदीच्या काठावरील शहापूर -मुरबाड रस्त्यावरील सापगांव पूल, सापगांव व नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिल्या आहेत. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ८९० मिमी पाऊस पडला. या पावसाची सरासरी १२७.१४ मिमी.नोंद घेण्यात आली. सर्वाधिक पाऊस भिवंडी, शहापूर तालुक्यांमध्ये पडला आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी