शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ठाणे - उल्हासनगरला  चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 19:20 IST

ठाणे येथे दोन व उल्हासनगर येथील एकाची पावसा दरम्यान मयत झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाकडून कळले. यामध्ये ठाणे येथील मनोरूग्णालय परिसरातील वसाहतीमधील संतोष जाधव (१८) हा तरूण घरात पाणी शिरले असता फ्रीज हलवत असताना त्यास वीजेचा शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर दिवा येथील डीजे कंपाऊंड जवळील नाल्यात सुनित पुनीत (३०) हा तरूण नाल्यात पडून दगावला

ठळक मुद्दे* भातसाचे पाच दरवाजे उघडलेभातसा नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशाराभातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर इतके उघडण्यात आले

ठाणे :जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. या कालावधीत ठाणे व दिवा येथील दोघांसह उल्हासनगर शहरातील दोघे आदी चार जणांचा मृत्यू झाला. यातील तिघे विजेच्या धक्याने व एकाचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. तर भातसा धरण भरल्यामुळे त्यांचे पाच दरवाजे उघडले आहेत. या भातसा नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.         ठाणे येथे दोन व उल्हासनगर येथील एकाची पावसा दरम्यान मयत झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाकडून कळले. यामध्ये ठाणे येथील मनोरूग्णालय परिसरातील वसाहतीमधील संतोष जाधव (१८) हा तरूण घरात पाणी शिरले असता फ्रीज हलवत असताना त्यास वीजेचा शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर दिवा येथील डीजे कंपाऊंड जवळील नाल्यात सुनित पुनीत (३०) हा तरूण नाल्यात पडून दगावला. तर उल्हासनगर येथील गौरी पाडा येथील मनीष चव्हाण या तरूणांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. आजच्या या पावसा दरम्यान झालेल्या. तर आमच्या वार्ताहर कळवतो की उल्हासनगर येथील कॅम्प नंबर एकमध्ये एका बालीकेचा वीजेच्या धक्कयाने मृत्यू झाल्याची घडली आहे.जिल्ह्याभरातील या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. मात्र निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे काही शाळा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहोच करण्याची जबाबदार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शाळांवर सोपवण्यात होती. रेल्वे सेवा पार कोलमडली आहे. सकाळच्या कालावधीत काही ठिकाणी उपनगरीय गाड्यांची सेवा काही काळ बंद करावी लागली. ठाणे स्टेशन परिसरात रेल्वे रूळावर पाणी साचले होते. त्यानंतर दुपारी सुमारे दीड तास उशिराने उपनगरीय गाड्याची वाहतूक सुरू राहिली. सकाळच्या कालावधीत उल्हासनदीच्या पुराचे पाणी वाढल्यामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या महामार्गावरील माळशेज घाटातील अंबे वळणावर एक झाड पडले. ते त्वरीत हटवण्याचे कामही महामार्ग बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचे उपकार्यकारी अभियंता सुनील पाटील, यांनी सांगिले.कल्याण रेल्वे स्थानकातील छत गळतीमुळे प्लॅटफार्मवर पाणीच पाणी झाल्यामुळे प्रवाशांना उभे राहाण्यात अडथळा निर्माण झाला.याशिवाय कल्याण स्टेशन परिसरातही पाणी साचले. तर टाटा पॉवरहाऊस, वरपगांव, म्हारळ, कांबा, टिटवाळा परिसरातील रूंदी आदीं परिसरात पाणी साचले. नद्या पुराच्या पाण्यामुळे दूथडी वाहत होत्या. सततच्या पावसामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर इतके उघडण्यात आले. या धरणातून भातसा सुमारे ९३४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे भातसा नदीच्या काठावरील शहापूर -मुरबाड रस्त्यावरील सापगांव पूल, सापगांव व नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिल्या आहेत. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ८९० मिमी पाऊस पडला. या पावसाची सरासरी १२७.१४ मिमी.नोंद घेण्यात आली. सर्वाधिक पाऊस भिवंडी, शहापूर तालुक्यांमध्ये पडला आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी