शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

भिवंडी-शीळ मार्गावर टोल, सहापदरी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:43 IST

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे. त्यासाठी १.७५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. ती संपादित झाली की प्रकल्पाच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. या कामावर सुमारे ३९० कोटी खर्च होणार असून तो वसूल करण्यासाठी या रस्त्यावर २०३६ सालापर्यंत टोल द्यावा लागणार आहे. राज्यातील सर्व टोल बंद करण्याची घोषमा करणाºया भाजपा-शिवसेना सरकारनेच या नव्या टोलचा प्रस्ताव मांडला आहे, हे याचे वैशिष्ट्य आहे.भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, कल्याण-निर्मल-नांदेड या महामार्गांना जोडणारा आहे. पायाभूत सुविधांतर्गत सरकारने २००६ साली या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने खाजगी कंत्राटदाराकडून तो विकसित केला. ते काम २००९ ला पूर्ण झाले. भिवंडी-कल्याण-शीळ प्लस या कंपनीला त्याच्या टोलवसुलीचे काम देण्यात आले. त्या कंपनीने २००९ पासून २०१३ पर्यंत टोलवसुली केली. आताही तेथे अवजड वाहनांकडून काटई आणि कोन येथे टोलवसुली सुरु आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच टोलवसुली झाल्याने हे प्रकरण उच्च न्यायालायात गेले होते. ही टोलवसुली बंद करण्यासाठी २००९ साली आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपोषण केले होते.वाढती वाहतूक लक्षात घेता तो सहा पदरी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा रस्ता २१ किमीचा आहे. त्याच्या सहापदरीकरणावर ३८९ कोटी ६३ लाखाचा खर्च होणार आहे. त्यासाठी २०१७-१८ मध्ये ४५ कोटी, २०१८-१९ मध्ये ६० कोटी, २०१९-२० मध्ये ४५ कोटीची रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०१४ सालच्या टोलवसुली धोरणातून या प्रकल्पाला सूट देत २०१६ पर्यंत या रस्त्यावर टोलवसुली होणार आहे.रस्त्यासाठी भूसंपादन झाले की, निविदा काढली जाईल. ती मंजूर झाल्यावर कार्यादेश देत तीन वर्षात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तीन वर्षाचा बांधकाम कालावधी पाहता रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या पाच टक्के खर्चासाठी नऊ कोटी ८१ लाख बांधकामाच्या किंमतीत समाविष्ट केले आहेत. प्रकल्पात बाधित होणाºयांच्या पुनर्वसनासाठी नऊ कोटी ८० लाखांची, भूसंपादनासाठी ९० कोटीची आणि टोलनाके उभारणीसाठी २५ कोटीची तरतूद याच खर्चात केली आहे.या सहापदरीकरणासाठी एक हजार ४० झाडे तोडावी लागणार आहेत. त्यासाठी रस्ते विकास महामंडळाने केडीएमसीकडे परवानगी मागितली आहे. त्यावर पालिकेने हरकती सूचना मागवल्या आहेत. पण निर्णय झालेला नाही.असा होईल खर्चसहा पदरीकरणासाठी-७७ कोटी ७२ लाखदेसाई खाडी पूल- तीन कोटी ३७ लाखचार लहान पूल- तीन कोटी २७ लाखलोढा जंक्शन दोन पदरी उड्डाणपूल-३४ कोटी ३२ लाखकाटई रेल्वे मार्गावर दोन पदरी पूल -९ कोटी ९ लाखपत्रीपूल भागात दोन पूल-४ कोटी ६५ लाख१८ मोºया - १ कोटी ५४ लाखजंक्शन सुधारणा- ९ कोटी ८४ लाखसेवा रस्ते- ३ कोटी ४ लाखबस शेल्टर- ७८ लाखसल्लागार खर्च- ३ कोटी ९२ लाखएजन्सी चार्जेस- ११ कोटी ७७ लाखरस्ते सुरक्षा खर्च- ४९ लाखसेवा वाहिन्या हलविण्यासाठी- ४ कोटी १० लाखपर्यावरण बाबींसाठी- ३ कोटी १६ लाखदेखभाल-दुरुस्तीसाठी - नऊ कोटी ८१ लाखपुनर्वसनासाठी - नऊ कोटी ८० लाखभूसंपादन - ९० कोटीटोलनाके उभारणी - २५ कोटीचौपदरीकरणाचा दुसरा टप्पा गायबभिवंडी-कल्याण-शीळ या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यावर २६३ कोटी खर्च झाले. त्याचा दुसरा टप्पा २६८ कोटीचा असेल, असे जाहीर केले होते. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु होती. नंतर दुसºया टप्प्याची फाईल गायब झाली. आता सहा पदरीकरण होणार आहे आणि त्याला शासन निर्णयात पहिला टप्पा असे म्हटले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गbhiwandiभिवंडीkalyanकल्याण