शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

भिवंडी-शीळ मार्गावर टोल, सहापदरी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:43 IST

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे. त्यासाठी १.७५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. ती संपादित झाली की प्रकल्पाच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. या कामावर सुमारे ३९० कोटी खर्च होणार असून तो वसूल करण्यासाठी या रस्त्यावर २०३६ सालापर्यंत टोल द्यावा लागणार आहे. राज्यातील सर्व टोल बंद करण्याची घोषमा करणाºया भाजपा-शिवसेना सरकारनेच या नव्या टोलचा प्रस्ताव मांडला आहे, हे याचे वैशिष्ट्य आहे.भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, कल्याण-निर्मल-नांदेड या महामार्गांना जोडणारा आहे. पायाभूत सुविधांतर्गत सरकारने २००६ साली या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने खाजगी कंत्राटदाराकडून तो विकसित केला. ते काम २००९ ला पूर्ण झाले. भिवंडी-कल्याण-शीळ प्लस या कंपनीला त्याच्या टोलवसुलीचे काम देण्यात आले. त्या कंपनीने २००९ पासून २०१३ पर्यंत टोलवसुली केली. आताही तेथे अवजड वाहनांकडून काटई आणि कोन येथे टोलवसुली सुरु आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच टोलवसुली झाल्याने हे प्रकरण उच्च न्यायालायात गेले होते. ही टोलवसुली बंद करण्यासाठी २००९ साली आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपोषण केले होते.वाढती वाहतूक लक्षात घेता तो सहा पदरी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा रस्ता २१ किमीचा आहे. त्याच्या सहापदरीकरणावर ३८९ कोटी ६३ लाखाचा खर्च होणार आहे. त्यासाठी २०१७-१८ मध्ये ४५ कोटी, २०१८-१९ मध्ये ६० कोटी, २०१९-२० मध्ये ४५ कोटीची रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०१४ सालच्या टोलवसुली धोरणातून या प्रकल्पाला सूट देत २०१६ पर्यंत या रस्त्यावर टोलवसुली होणार आहे.रस्त्यासाठी भूसंपादन झाले की, निविदा काढली जाईल. ती मंजूर झाल्यावर कार्यादेश देत तीन वर्षात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तीन वर्षाचा बांधकाम कालावधी पाहता रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या पाच टक्के खर्चासाठी नऊ कोटी ८१ लाख बांधकामाच्या किंमतीत समाविष्ट केले आहेत. प्रकल्पात बाधित होणाºयांच्या पुनर्वसनासाठी नऊ कोटी ८० लाखांची, भूसंपादनासाठी ९० कोटीची आणि टोलनाके उभारणीसाठी २५ कोटीची तरतूद याच खर्चात केली आहे.या सहापदरीकरणासाठी एक हजार ४० झाडे तोडावी लागणार आहेत. त्यासाठी रस्ते विकास महामंडळाने केडीएमसीकडे परवानगी मागितली आहे. त्यावर पालिकेने हरकती सूचना मागवल्या आहेत. पण निर्णय झालेला नाही.असा होईल खर्चसहा पदरीकरणासाठी-७७ कोटी ७२ लाखदेसाई खाडी पूल- तीन कोटी ३७ लाखचार लहान पूल- तीन कोटी २७ लाखलोढा जंक्शन दोन पदरी उड्डाणपूल-३४ कोटी ३२ लाखकाटई रेल्वे मार्गावर दोन पदरी पूल -९ कोटी ९ लाखपत्रीपूल भागात दोन पूल-४ कोटी ६५ लाख१८ मोºया - १ कोटी ५४ लाखजंक्शन सुधारणा- ९ कोटी ८४ लाखसेवा रस्ते- ३ कोटी ४ लाखबस शेल्टर- ७८ लाखसल्लागार खर्च- ३ कोटी ९२ लाखएजन्सी चार्जेस- ११ कोटी ७७ लाखरस्ते सुरक्षा खर्च- ४९ लाखसेवा वाहिन्या हलविण्यासाठी- ४ कोटी १० लाखपर्यावरण बाबींसाठी- ३ कोटी १६ लाखदेखभाल-दुरुस्तीसाठी - नऊ कोटी ८१ लाखपुनर्वसनासाठी - नऊ कोटी ८० लाखभूसंपादन - ९० कोटीटोलनाके उभारणी - २५ कोटीचौपदरीकरणाचा दुसरा टप्पा गायबभिवंडी-कल्याण-शीळ या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यावर २६३ कोटी खर्च झाले. त्याचा दुसरा टप्पा २६८ कोटीचा असेल, असे जाहीर केले होते. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु होती. नंतर दुसºया टप्प्याची फाईल गायब झाली. आता सहा पदरीकरण होणार आहे आणि त्याला शासन निर्णयात पहिला टप्पा असे म्हटले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गbhiwandiभिवंडीkalyanकल्याण