शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

भिवंडी-शीळ मार्गावर टोल, सहापदरी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:43 IST

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे. त्यासाठी १.७५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. ती संपादित झाली की प्रकल्पाच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. या कामावर सुमारे ३९० कोटी खर्च होणार असून तो वसूल करण्यासाठी या रस्त्यावर २०३६ सालापर्यंत टोल द्यावा लागणार आहे. राज्यातील सर्व टोल बंद करण्याची घोषमा करणाºया भाजपा-शिवसेना सरकारनेच या नव्या टोलचा प्रस्ताव मांडला आहे, हे याचे वैशिष्ट्य आहे.भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, कल्याण-निर्मल-नांदेड या महामार्गांना जोडणारा आहे. पायाभूत सुविधांतर्गत सरकारने २००६ साली या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने खाजगी कंत्राटदाराकडून तो विकसित केला. ते काम २००९ ला पूर्ण झाले. भिवंडी-कल्याण-शीळ प्लस या कंपनीला त्याच्या टोलवसुलीचे काम देण्यात आले. त्या कंपनीने २००९ पासून २०१३ पर्यंत टोलवसुली केली. आताही तेथे अवजड वाहनांकडून काटई आणि कोन येथे टोलवसुली सुरु आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच टोलवसुली झाल्याने हे प्रकरण उच्च न्यायालायात गेले होते. ही टोलवसुली बंद करण्यासाठी २००९ साली आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपोषण केले होते.वाढती वाहतूक लक्षात घेता तो सहा पदरी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा रस्ता २१ किमीचा आहे. त्याच्या सहापदरीकरणावर ३८९ कोटी ६३ लाखाचा खर्च होणार आहे. त्यासाठी २०१७-१८ मध्ये ४५ कोटी, २०१८-१९ मध्ये ६० कोटी, २०१९-२० मध्ये ४५ कोटीची रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०१४ सालच्या टोलवसुली धोरणातून या प्रकल्पाला सूट देत २०१६ पर्यंत या रस्त्यावर टोलवसुली होणार आहे.रस्त्यासाठी भूसंपादन झाले की, निविदा काढली जाईल. ती मंजूर झाल्यावर कार्यादेश देत तीन वर्षात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तीन वर्षाचा बांधकाम कालावधी पाहता रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या पाच टक्के खर्चासाठी नऊ कोटी ८१ लाख बांधकामाच्या किंमतीत समाविष्ट केले आहेत. प्रकल्पात बाधित होणाºयांच्या पुनर्वसनासाठी नऊ कोटी ८० लाखांची, भूसंपादनासाठी ९० कोटीची आणि टोलनाके उभारणीसाठी २५ कोटीची तरतूद याच खर्चात केली आहे.या सहापदरीकरणासाठी एक हजार ४० झाडे तोडावी लागणार आहेत. त्यासाठी रस्ते विकास महामंडळाने केडीएमसीकडे परवानगी मागितली आहे. त्यावर पालिकेने हरकती सूचना मागवल्या आहेत. पण निर्णय झालेला नाही.असा होईल खर्चसहा पदरीकरणासाठी-७७ कोटी ७२ लाखदेसाई खाडी पूल- तीन कोटी ३७ लाखचार लहान पूल- तीन कोटी २७ लाखलोढा जंक्शन दोन पदरी उड्डाणपूल-३४ कोटी ३२ लाखकाटई रेल्वे मार्गावर दोन पदरी पूल -९ कोटी ९ लाखपत्रीपूल भागात दोन पूल-४ कोटी ६५ लाख१८ मोºया - १ कोटी ५४ लाखजंक्शन सुधारणा- ९ कोटी ८४ लाखसेवा रस्ते- ३ कोटी ४ लाखबस शेल्टर- ७८ लाखसल्लागार खर्च- ३ कोटी ९२ लाखएजन्सी चार्जेस- ११ कोटी ७७ लाखरस्ते सुरक्षा खर्च- ४९ लाखसेवा वाहिन्या हलविण्यासाठी- ४ कोटी १० लाखपर्यावरण बाबींसाठी- ३ कोटी १६ लाखदेखभाल-दुरुस्तीसाठी - नऊ कोटी ८१ लाखपुनर्वसनासाठी - नऊ कोटी ८० लाखभूसंपादन - ९० कोटीटोलनाके उभारणी - २५ कोटीचौपदरीकरणाचा दुसरा टप्पा गायबभिवंडी-कल्याण-शीळ या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यावर २६३ कोटी खर्च झाले. त्याचा दुसरा टप्पा २६८ कोटीचा असेल, असे जाहीर केले होते. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु होती. नंतर दुसºया टप्प्याची फाईल गायब झाली. आता सहा पदरीकरण होणार आहे आणि त्याला शासन निर्णयात पहिला टप्पा असे म्हटले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गbhiwandiभिवंडीkalyanकल्याण