शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

संवाद हरवल्याने आज अनेक प्रश्न निर्माण झालेत मुग्धा चिटणीस-घोडके हिच्या 22व्या स्मृतीदिन सोहळ्यात दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:38 IST

मुग्धा चिटणीस - घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान, ठाणे व व्यास क्रिएशन्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कथाकथनकार मुग्धा चिटणीस - घोडके हिच्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 

ठळक मुद्देशब्दशक्ती प्रचंड आहे नोकरी न करता व्यवसाय करा - मनोहर जोशीग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न

ठाणे : शब्दशक्ती प्रचंड आहे. संवाद हरवल्याने आज अनेक प्रश्न निर्माण झालेत.त्यामुळे जीवनामधला संवाद कायम ठेवा. म्हणजे आयुष्य आनंदी होईल. असा प्रेरक संदेश यंदाच्या मुग्धा चिटणीस-घोडके हिच्या 22व्या स्मृतीदिन सोहळ्याने उपस्थितांना दिला. शिक्षण भरपूर घ्या, नोकरी न करता व्यवसाय करा, वाचन भरपूर करा आणि सन्मार्गानेच यशस्विता मिळते हे लक्षात ठेवा हा सुखी जीवनाचा मूलमंत्र असल्याचे मनोहर जोशी यांनी यावेळी सांगितले.

व्यास क्रिएशन्स् आणि पितांबरी प्रॉडक्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा झालेला हा स्मृतिदिन उपस्थित रसिकांना आनंदाबरोबरच एक ‘विचार’ देऊन गेला. व्यास क्रिएशन्स् प्रकाशित प्रा. अशोक चिटणीस लिखित जगावेगळ्या (चौथी आवृत्ती) आणि यशस्वी उद्योजकांच्या प्रेरक कथा शिवाय अशोक व शुभा दाम्पत्य लिखित संवाद संवादकांशी (चौथी आवृत्ती) या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याने सहयोग मंदिरमधील रविवारची संध्याकाळ प्रकाशमान व प्रसन्न झाली. नवचैतन्य प्रकाशन आणि व्यास क्रिएशन्स् यांनी ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. डॉ. मनोहर जोशी (शिवसेना नेते), प्रा. अरुण गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष), पितांबरीचे रवीन्द्र प्रभुदेसाई,  ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि नामवंत वक्त्या धनश्री लेले या पाचही विशेष अतिथींनी ठाणेकर रसिकांशी हृदयसंवाद साधून कार्यक्रमाला रंगत आणली. अशोक चिटणीस व शुभा चिटणीस हे दाम्पत्य अद्भूत रसायन असून स्वतःचे दुःख विसरून पुस्तक प्रकाशनांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे शिक्कामोर्तब त्यांनी याप्रसंगी केले. ठाणे हे रसिकांचे व गुणवंतांचे असल्याचा निर्वाळा आ. संजय केळकर यांनी दिला. प्रत्येक पुस्तक हे प्रकाश देते, म्हणून पुस्तकांच्या प्रसिद्ध होण्याला प्रकाशन सोहळा म्हणतात हा विचार धनश्री लेले यांनी देऊन चिटणीस दाम्पत्याची पुस्तके हीच एक कार्यशाळा असल्याचे कौतुक केले. रवीन्द्र प्रभुदेसाई यांनी मोठी स्वप्ने बघण्याचे आवाहन करून मराठी माणसांनी उद्योग करण्याला प्राधन्य द्यावे असे सांगितले तर प्रा. अरुण गुजराथी यांनी सांगितले की, ‘‘कागदावर लिहिणारे भरपूर लेखक आहेत. पण काळजावर लिहिणारे चिटणीस दाम्पत्यासारखे विरळेच म्हणावे लागतील. संवाद संपला म्हणून अनेक प्रश्न निर्माण झालेत. वाचनाबरोबरच चिंतन वाढले तर संवाद सुरू होऊन जीवन आनंदी बनेल.’’

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई