शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

बाजारपेठेत टीएमटीची अडथळ्यांची शर्यत!, भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:53 IST

स्टेशन ते जांभळीनाका या भागात रस्त्यांवर बसणाºया भाजीविक्रेत्यांचा अडथळा टीएमटीच्या बसेसला होत असून त्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि परिवहनच्या समिती सदस्यांनी शनिवारी पहाटे अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई केली होती.

ठाणे : स्टेशन ते जांभळीनाका या भागात रस्त्यांवर बसणा-या भाजीविक्रेत्यांचा अडथळा टीएमटीच्या बसेसला होत असून त्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि परिवहनच्या समिती सदस्यांनी शनिवारी पहाटे अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई केली होती.रविवारी मात्र दुपारनंतर या भागात भाजीविक्रेत्यांबरोबरच फेरीवाल्यांनी दोन्ही बाजूंनी रस्ता अडवला. त्यामुळे स्टेशन ते जांभळीनाक्यापर्यंत टीएमटी बसेसच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या कारवाईबाबत पुन्हा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.संबंधित रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर येथील फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम जोरात राबवली होती; तरीदेखील येथे फेरीवाल्यांचे वास्तव्य होते. त्यामुळे आळीपाळीने विविध अधिकारी आणि एस्ट्रा फोर्स घेऊन येथे कारवाई सुरू असूनही या मार्गावरील फेरीवाल्यांची संख्या कमी झालेली नाही. या फेरीवाल्यांचा आता टीएमटीच्या बसेसलादेखील अडथळा निर्माण होऊ लागला आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या बाजारपेठमार्गातून परिवहनच्या बसेस धावू लागल्या आहेत. परंतु, फेरीवाल्यांचा आणि आता पहाटे या बाजारपेठेत बसणाºया भाजीविक्रेत्यांचा फटका परिवहनच्या बसेसला बसत असल्याची माहिती समोर आली आहे.पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत या मार्गावर शहरातील छोटे विक्रेते भाजीखरेदीसाठी येत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावरून स्थानकाच्या दिशेने जाणाºया बसेसला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांनादेखील याचा फटका बसत आहे.भाजीखरेदी करणाºया ग्राहकांना बसचा धक्का लागून अपघात होण्याची भीतीही व्यक्त होते. काँग्रेसचे परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत ठरावीक वेळेत बस पूर्वीच्या मार्गाने वळवण्याची मागणी केली; मात्र बसचा मार्ग वळवल्यास प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती.दरम्यान, या मागणीच्या पार्श्वभूमीवर परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी, सभापती अनिल भोर, सदस्य सचिन शिंदे आणि राजेंद्र महाडिक यांनी शनिवारी पहाटे बाजारपेठ मार्गाची पाहणी केली. त्यानंतर, बसचा विनाअडथळा आणि अपघातमुक्त प्रवास व्हावा, यासाठी पालिकेच्या अतिक्र मण पथकाची मदत घेण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला. बाजारपेठ मार्गावर पहाटे ते सकाळपर्यंत भाजीविक्रेते बसत असल्यामुळे या काळात येथे अतिक्र मण पथकाचे एक वाहन ठेवायचे आणि भाजीविक्रेत्यांचा बसच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, याकडे पथकाने लक्ष द्याायचे, अशी योजना प्रशासनाकडून आखली जात असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.>अवघ्या तीन मिनिटांसाठी १५ ते २० मिनिटेकारवाई होऊनही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रविवारी फेरीवाले बसल्याचे दिसून आले. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांच्या बाहेर दुचाकींची पार्किंग झाली होती. त्यामुळे जांभळीनाका ते स्टेशनपर्यंतच्या अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरासाठी टीएमटीच्या बसेसला तब्बल १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत होता. त्यामुळे पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करतो की, या फेरीवाल्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला.

टॅग्स :thaneठाणे