शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाजारपेठेत टीएमटीची अडथळ्यांची शर्यत!, भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:53 IST

स्टेशन ते जांभळीनाका या भागात रस्त्यांवर बसणाºया भाजीविक्रेत्यांचा अडथळा टीएमटीच्या बसेसला होत असून त्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि परिवहनच्या समिती सदस्यांनी शनिवारी पहाटे अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई केली होती.

ठाणे : स्टेशन ते जांभळीनाका या भागात रस्त्यांवर बसणा-या भाजीविक्रेत्यांचा अडथळा टीएमटीच्या बसेसला होत असून त्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि परिवहनच्या समिती सदस्यांनी शनिवारी पहाटे अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई केली होती.रविवारी मात्र दुपारनंतर या भागात भाजीविक्रेत्यांबरोबरच फेरीवाल्यांनी दोन्ही बाजूंनी रस्ता अडवला. त्यामुळे स्टेशन ते जांभळीनाक्यापर्यंत टीएमटी बसेसच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या कारवाईबाबत पुन्हा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.संबंधित रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर येथील फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम जोरात राबवली होती; तरीदेखील येथे फेरीवाल्यांचे वास्तव्य होते. त्यामुळे आळीपाळीने विविध अधिकारी आणि एस्ट्रा फोर्स घेऊन येथे कारवाई सुरू असूनही या मार्गावरील फेरीवाल्यांची संख्या कमी झालेली नाही. या फेरीवाल्यांचा आता टीएमटीच्या बसेसलादेखील अडथळा निर्माण होऊ लागला आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या बाजारपेठमार्गातून परिवहनच्या बसेस धावू लागल्या आहेत. परंतु, फेरीवाल्यांचा आणि आता पहाटे या बाजारपेठेत बसणाºया भाजीविक्रेत्यांचा फटका परिवहनच्या बसेसला बसत असल्याची माहिती समोर आली आहे.पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत या मार्गावर शहरातील छोटे विक्रेते भाजीखरेदीसाठी येत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावरून स्थानकाच्या दिशेने जाणाºया बसेसला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांनादेखील याचा फटका बसत आहे.भाजीखरेदी करणाºया ग्राहकांना बसचा धक्का लागून अपघात होण्याची भीतीही व्यक्त होते. काँग्रेसचे परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत ठरावीक वेळेत बस पूर्वीच्या मार्गाने वळवण्याची मागणी केली; मात्र बसचा मार्ग वळवल्यास प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती.दरम्यान, या मागणीच्या पार्श्वभूमीवर परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी, सभापती अनिल भोर, सदस्य सचिन शिंदे आणि राजेंद्र महाडिक यांनी शनिवारी पहाटे बाजारपेठ मार्गाची पाहणी केली. त्यानंतर, बसचा विनाअडथळा आणि अपघातमुक्त प्रवास व्हावा, यासाठी पालिकेच्या अतिक्र मण पथकाची मदत घेण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला. बाजारपेठ मार्गावर पहाटे ते सकाळपर्यंत भाजीविक्रेते बसत असल्यामुळे या काळात येथे अतिक्र मण पथकाचे एक वाहन ठेवायचे आणि भाजीविक्रेत्यांचा बसच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, याकडे पथकाने लक्ष द्याायचे, अशी योजना प्रशासनाकडून आखली जात असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.>अवघ्या तीन मिनिटांसाठी १५ ते २० मिनिटेकारवाई होऊनही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रविवारी फेरीवाले बसल्याचे दिसून आले. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांच्या बाहेर दुचाकींची पार्किंग झाली होती. त्यामुळे जांभळीनाका ते स्टेशनपर्यंतच्या अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरासाठी टीएमटीच्या बसेसला तब्बल १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत होता. त्यामुळे पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करतो की, या फेरीवाल्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला.

टॅग्स :thaneठाणे