शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

स्थायी समितीला पुन्हा लागणार घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:28 IST

दीड वर्षानंतर होणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

ठाणे : दीड वर्षानंतर होणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. तौलनिक संख्याबळानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. या निवडणूक प्रक्रियेविरोधात भाजपानेही न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्थायी समिती स्थापन होण्यात अडचणी येणार आहेत.आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत तौलनिक संख्याबळाचा मुद्दा मांडला. यावेळी त्याच्यासमवेत शहरअध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते. १६ मे रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक लागली आहे. त्यासाठी ११ मे रोजी अर्ज भरले जाणार आहेत. या निवडणुकीत आता काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार असली तरीदेखील सभापती हा आमचाच होईल, असा दावा शिवसेनेने केला आहे. परंतु आता या निवडणूक प्रक्रियेवरच राष्टÑवादीने आक्षेप घेतला आहे. स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असून त्याचा अंमित निकाल हा येत्या २५ जून रोजी लागणार आहे. तो येण्यापूर्वीच सत्ताधारी शिवसेनेला याची घाई कशासाठी असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला. त्यातही पालकमंत्र्यांनी ही निवडणूक घेण्यासाठी आग्रह केला असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आता पालकमंत्री ठाणे महापालिकेचा कारभार चालविणार का? असा सवालही त्यांनी केला आहे. निवडणूक घेतांना विरोधी पक्षालादेखील त्यात सहभागी करून घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता हा केवळ मनमानी आणि चुकीचा कारभार केला जात असल्याचेही ते म्हणाले. कोकण विभागीय आयुक्तांनी जे तौलनिक संख्याबळ दिले आहे. त्यानुसार आधी सदस्यांची निवड करावी मगच सभापतीची निवडणूक घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पीठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. यावेळी राष्टÑवादीच्या वतीने तौलनिक संख्याबळानुसार पाच नावे दिली होती. परंतु, त्यांचे एक नाव कापण्यात आले होते. हाच मुद्दा आता हाताशी घेऊन राष्टÑवादीने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकूणच ही निवड प्रक्रिया चुकीची असून या विरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.प्रकरण न्यायालयात प्रलंबित : वास्तविक पाहता स्थायी समिती सदस्यांची निवड ही तौलनिक संख्याबळानुसार झालेली नाही. त्याबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. असे असतांनादेखील थेट सभापतीपदाची निवडणूक लावणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रक्रियेविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनीही दिला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे