शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीला पुन्हा लागणार घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:28 IST

दीड वर्षानंतर होणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

ठाणे : दीड वर्षानंतर होणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. तौलनिक संख्याबळानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. या निवडणूक प्रक्रियेविरोधात भाजपानेही न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्थायी समिती स्थापन होण्यात अडचणी येणार आहेत.आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत तौलनिक संख्याबळाचा मुद्दा मांडला. यावेळी त्याच्यासमवेत शहरअध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते. १६ मे रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक लागली आहे. त्यासाठी ११ मे रोजी अर्ज भरले जाणार आहेत. या निवडणुकीत आता काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार असली तरीदेखील सभापती हा आमचाच होईल, असा दावा शिवसेनेने केला आहे. परंतु आता या निवडणूक प्रक्रियेवरच राष्टÑवादीने आक्षेप घेतला आहे. स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असून त्याचा अंमित निकाल हा येत्या २५ जून रोजी लागणार आहे. तो येण्यापूर्वीच सत्ताधारी शिवसेनेला याची घाई कशासाठी असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला. त्यातही पालकमंत्र्यांनी ही निवडणूक घेण्यासाठी आग्रह केला असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आता पालकमंत्री ठाणे महापालिकेचा कारभार चालविणार का? असा सवालही त्यांनी केला आहे. निवडणूक घेतांना विरोधी पक्षालादेखील त्यात सहभागी करून घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता हा केवळ मनमानी आणि चुकीचा कारभार केला जात असल्याचेही ते म्हणाले. कोकण विभागीय आयुक्तांनी जे तौलनिक संख्याबळ दिले आहे. त्यानुसार आधी सदस्यांची निवड करावी मगच सभापतीची निवडणूक घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पीठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. यावेळी राष्टÑवादीच्या वतीने तौलनिक संख्याबळानुसार पाच नावे दिली होती. परंतु, त्यांचे एक नाव कापण्यात आले होते. हाच मुद्दा आता हाताशी घेऊन राष्टÑवादीने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकूणच ही निवड प्रक्रिया चुकीची असून या विरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.प्रकरण न्यायालयात प्रलंबित : वास्तविक पाहता स्थायी समिती सदस्यांची निवड ही तौलनिक संख्याबळानुसार झालेली नाही. त्याबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. असे असतांनादेखील थेट सभापतीपदाची निवडणूक लावणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रक्रियेविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनीही दिला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे