शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

टिटवाळा अग्निशमन केंद्र लवकरच सेवेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवलीप्रमाणे आता टिटवाळ्यातही लवकरच अग्निशमन केंद्र चालू होणार आहे. मांडा टिटवाळा पूर्वेत उभे राहिलेल्या या केंद्रासाठी दोन ...

कल्याण : कल्याण-डोंबिवलीप्रमाणे आता टिटवाळ्यातही लवकरच अग्निशमन केंद्र चालू होणार आहे. मांडा टिटवाळा पूर्वेत उभे राहिलेल्या या केंद्रासाठी दोन फायर वाहने देण्यात आली आहेत. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. लवकरच हे केंद्र सुरू होणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

केडीएमसी हद्दीसह आसपासच्या परिसरात साधारण वर्षभरात ३०० ते ४०० आगीच्या घटना घडतात. कुठेही आग लागली किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन दलास पाचारण केले जाते. कल्याण-डोंबिवली शहरांसह भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वाडा, शहापूर, मुरबाड आदी आसपासच्या शहरातदेखील ही सेवा पुरविली जाते. या कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासह प्राणी पकडणे, अडकलेल्या प्राण्यांची सुटका करणे, पाण्यात बुडालेल्यांना बाहेर काढणे, कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांचे प्राण वाचविणे, झाडे पडण्याच्या घटना आदी जबाबदारीही पार पाडावी लागते.

सध्या केडीएमसीची चार अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. यात कल्याण पश्चिमेतील आधारवाडी या मुख्य केंद्रासह पूर्वेतील ‘ड’ प्रभाग आणि डोंबिवली पूर्वेत एमआयडीसी आणि पश्चिमेकडील ‘ह’ प्रभागातील केंद्रांचा समावेश आहे. टिटवाळ्यात जेव्हा एखादी आगीची अथवा अन्य आपत्कालीन घटना घडते तेव्हा कल्याणमधील आधारवाडीतून अग्निशमन केंद्राची गाडी तेथे रवाना होते. परंतु, अरुंद रस्ते आणि वाहतूककोंडीतून वाट काढत तेथे पोहोचताना विलंब होतो. त्यामुळे टिटवाळ्यात नव्याने सुरू होणारे अग्निशमन केंद्र ही स्थानिकांसाठी तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. येथील कारभार सुरळीत चालू राहण्यासाठी येथे स्थानक प्रमुखासह चार लिडींग फायरमन, चार वाहनचालक, ११ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

-------------------------------

अपुऱ्या मनुष्यबळाचे काय?

- आधीच्या चार केंद्रांवर अपुऱ्या मनुष्यबळाअभावी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फरफट सुरू असताना टिटवाळा केंद्रावरही पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी यंत्रणेची दमछाक होण्याची शक्यता आहे.

- तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या कामामध्ये साधारण अधिकारी, कर्मचारी आणि वाहनचालक असे एका केंद्रावर ३३ जणांची आवश्यकता असते, परंतु मनुष्यबळाअभावी १५ ते २० जणच उपलब्ध असतात. त्यांना तीन शिफ्टमध्ये विभागले जाते. त्यामुळे जेमतेम एका शिफ्टमध्ये सात ते आठ जणच सेवेला असतात.

- २०१५ मध्ये फायरमन पदांसाठी ऑनलाइन परीक्षाही घेण्यात आली होती. यात ५९ जण पात्र ठरले होते, परंतु यातील केवळ २४ जणच घेतले आहेत. उर्वरित पात्र झालेल्यांचे काय? असाही सवाल उपस्थित होत आहे.

------------------------------------------------

लवकरच सेवेत दाखल होईल

टिटवाळ्यात अग्निशमन केंद्राची नितांत आवश्यकता होती. त्यानुसार लवकरच ते केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पलावा येथील केंद्र बंद करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन परीक्षेतील २४ जण सेवेत दाखल करून घेतले आहेत. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ आहे.

- दिलीप गुंड, मुख्य अग्निशमन अधिकारी केडीएमसी

----------------------