शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मेन्टेनन्स थकविल्याने अनधिकृतपणे पाणी जोडणीच तोडली,  दोन कुटुंबे पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 22:31 IST

मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या पदाधिका-यांनी चक्क दोन कुटूंबियांच्या सदनिकांची नळ जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार रविवारी घडला आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे,  दि. २६  - मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या पदाधिका-यांनी चक्क दोन कुटूंबियांच्या सदनिकांची नळ जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार रविवारी घडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या कुटूंबियांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, वर्तकनगर पोलिसांकडे या कुटूंबियांनी तक्रार केल्यानंतर त्यांना अशा प्रकारे पाणी खंडीत करण्याची कारवाई करता येते, अशी उत्तरे देत त्यांची बोळवण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या इमारतीमध्ये नितिन चव्हाण हे गेल्या सहा वर्षांपासून वास्तव्याला आहेत. इमारतीमधील चौथ्या मजल्यावर त्यांचे कुटंूब तर सातव्या मजल्यावर त्यांचे भाडेकरु वास्तव्याला आहेत. गेल्या चार महिन्यात मेन्टनन्स (देखभाल) पोटी दंडासहित साडे सात हजारांची त्यांची थकबाकी आहे. यासाठी सोसायटीच्या शेख, दास आणि शेट्टी या कथित महिला पदाधिका-यांनी चव्हाण यांच्याकडे मागणी केली. ही मागणी केल्यानंतर सोसायटीनेही दुरुस्ती आणि पाईप लिकेजची कामे करावीत, असे पत्र चव्हाण यांनी सोसायटीला दिले. या पत्राला न जुमानता सोसायटीने थकबाकी न भरल्यास पाणी जोडणी तोडण्याची धमकीच त्यांना दिली. तसे ९ जुलै रोजी लेखी पत्रच दिले. हे पत्र घेऊन चव्हाण कुटूंबिय वर्तकनगर पोलिसांकडे गेले. तेंव्हा हे सिव्हील मॅटर असून त्याची न्यायालयात तक्रार करा, असे बजावले. त्यावर असे करणे बेकायदेशीर असल्याची नोटीस सोसायटीला वकीलामार्फत चव्हाण यांनी बजावली. मात्र, या नोटीसीला न जुमानता ३० जुलैला पुन्हा पाणी तोडण्याचे पत्र सोसायटीने दिले. पुन्हा आपली कैफियत वर्तकनगर पोलिसांकडे चव्हाण यांनी मांडली. त्यावेळी ‘जेंव्हा पाणी तोडतील, तेंव्हा या’ असे त्यांना सांगण्यात आले. त्याचवेळी पोलिसांनीच अशी परवानगी दिल्याचा दावा या सोसायटीच्या महिला पदाधिकाºयांनी केला. याचीच विचारणा चव्हाण यांनी पोलिसांकडे केली. त्यावेळी मेन्टनन्स थकबाकी असल्यास नविन कायद्यानुसार पाणी जोडणी तोडता येऊ शकते, अशी अजब माहिती पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी दोन आठवडयांपूर्वी दिली.दरम्यान, ठरल्याप्रमाणे २४ सप्टेंबर रोजी या सोसायटीच्या काही रहिवाशांनी बेकायदेशीरपणे चव्हाण यांच्या ४०१ आणि ७०४ या दोन सदनिकांची पाणी जोडणी तोडली. पुन्हा ही तक्रार करण्यासाठी गेलेल्या चव्हाण दाम्पत्याला निरीक्षक सावंत यांनी अशी कारवाई करता येऊ शकते, अगदी घराबाहेरही काढता येऊ शकते, असा पुनरुच्चार केला. हाच फायदा घेऊन सोसायटीने गेल्या दोन दिवसांपासून चव्हाण आणि त्यांच्या भाडेकरु अशा दोन कुटूंबियांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे. पाणी खंडीत करणे बेकायदेशीरचचव्हाण कुटूंबियांनी पाणी खंडीत केल्याची तक्रार उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे शहर यांच्याकडे २५ सप्टेंबर रोजी केली. त्यावेळी पाणी ही बाब जीवनावश्यक व अत्यावश्यक गरजांमध्ये अंतर्भूत होते. त्यामुळे एखाद्या थकबाकीसाठी ही अत्यावश्यक सेवा खंडीत करणे अभिप्रेत नाही. अशा थकबाकीसाठी कलम १०१ ची कार्यवाही अभिप्रेत आहे. तरीही कोणी अशी पाणी जोडणी खंडीत केल्यास त्यांच्याविरुद्ध न्यायालयामार्फतीने किंवा थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन कारवाई होऊ शकते, असेही उपनिबंधक अशोक कुंभार यांनी सांगितले.दरम्यान, राज्य मानवी हक्क आयोग आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडेही चव्हाण यांनी न्यायाची मागणी केली असून पाणी पुरवठा पुर्ववत करण्यात यावा. तसेच संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Waterपाणी