शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

कामगारांवर ओढवणार उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

लॉकडाऊन मुळे भिवंडीतील कामगारांवर उपासमारीची वेळ नितीन पंडीत लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस ...

लॉकडाऊन मुळे भिवंडीतील कामगारांवर उपासमारीची वेळ

नितीन पंडीत

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, शहरातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्यभर सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध, तर शनिवार, रविवार दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सरकारच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, भिवंडी शहरात परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे शहरातील कामगारांवर मात्र उपासमारीची शक्यता ओढवली आहे.

भिवंडीत यंत्रमाग व कापड व्यवसाय तसेच गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. यंत्रमाग व्यवसायाला अत्यावश्यक सेवेप्रमाणे संचारबंदी व लॉकडाऊनच्या नियमांमधून सूट दिली असली तरी इतर आस्थापने बंद असल्याने त्याचा फटका येथील कामगारांना सहन करावा लागत आहे. शहरात इतर छोटे, मोठे व्यवसाय, व्यापार असलेली दुकाने बंद असल्याने या दुकानातील व आस्थापनांमधील कामगारांवर उपासमार ओढवली आहे.

शहरात सध्या ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आल्याने सर्व दुकाने बंद करण्यात येत आहेत. त्यातच एप्रिल महिन्यात हिंदू, मुस्लिम बांधवांचे सण, उत्सव सुरु होणार असल्याने व्यापारी वर्गाकडून या महिन्यात नफा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येणार होता. मात्र, याच महिन्यात वीकेंड लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केल्याने व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. साहजिकच या सर्व बाबींचा परिणाम या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर होणार आहे. मागीलवर्षी व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये आपल्या कामगारांना उदरनिर्वाहाच्या साहित्याचा पुरवठा त्याचबरोबर थोडीफार आर्थिक मदत केली होती. मात्र, यावेळी व्यापाऱ्यांवरच आर्थिक संकट ओढवल्याने व्यापारी कामगारांना आर्थिक मदत करण्याच्या मानसिकतेत नाहीत. किंबहुना त्यांना तशी मदत करणे सध्यातरी शक्य नाही, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत असल्याने यावेळी संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कामगारांवर निश्चितच उपासमार ओढवणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.