शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

गुरुजींच्या दारुपार्ट्यांचा महापूर

By admin | Updated: February 1, 2017 04:24 IST

पाच राज्ये, दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे राजकीय पक्ष, संघटना वगळता अन्यत्र फारशा चर्चेत नसलेल्या कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत

ठाणे : पाच राज्ये, दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे राजकीय पक्ष, संघटना वगळता अन्यत्र फारशा चर्चेत नसलेल्या कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत दारूपार्ट्याची चंगळ सुरू असून भेटवस्तू संस्कृतीला ऊत आल्याच्या सुरस कहाण्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत. शिक्षक हेच मतदार असलेल्या या निवडणुकीत मतांना तीन हजारांपर्यंतचा ‘भाव’ आल्याची धक्कादायक चर्चाही रंगली आहे. याबाबत उघडपणे कोणी बोलण्यास तयार नसले, तरी खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू असल्याची कुजबूज शिक्षकांत आहे.ज्यांचा निर्णय पक्का नाही, अशा उमेदवारांच्या मताचा काही दिवसांपर्यंत दोन हजारांवर असलेला भाव शेवटच्या दोन-तीन दिवसांत तीन हजारांवर गेल्याच्या कानगोष्टी शिक्षकांत सुरू होत्या. राजकीय पक्षांनी पाठबळ दिलेल्या संघटना आजवर या निवडणुकीत परस्परांशी लढत. पण युती तुटल्यानंतर शिक्षक परिषद या भाजपप्रणित संघटनेला शिवसेनेच्या शिक्षक सेनेने थेट आव्हान दिले आहे. शेकापतर्फेबाळाराम पाटील यांनी दंड थोपटले आहेत. विधान परिषदेच्या या जागेसाठी राजकीय पक्षांनीच थेट आव्हान दिल्याने तेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. शैक्षणिक संघटनांतील काम हा शिक्षक परिषदेने आजवर प्रचाराचा मुद्दा बनवला होता. त्याच आधारावर आमदार कपिल पाटील यांची शिक्षक भारतीही मुद्दे घेऊन उतरत होती. मात्र मुख्याध्यापक संघटनेच्या बळावर शिवसेनेने भाजपाची खिचडी साफ करण्याची घोषणा केली. शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व म्हणून रामनाथ मोते यांनी या मतदारसंघावर ठसा उमटविला होता. पण ज्या पद्धतीने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली किंवा तसे चित्र उभे राहिले, त्यामुळे भाजपाप्रणित मतांना धक्का बसेल, असे अंदाज वर्तवले जाऊ लागले. त्यातही अन्य सर्व उमेदवारांनी शैक्षणिक प्रश्न मांडताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून भाजपाला लक्ष्य केल्याने ‘भाजपा विरूद्ध सारे’असेच लढतीचे चित्र उभे राहिले आहे. शिवसेनेने किती शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, असा प्रश्न भाजपाच्या नेत्यांनी उपस्थित केला; तर परिवारातील व्यक्ती घुसवून भाजपाची विचारसरणी मानणाऱ्यांनी किती संस्था बळकावल्या असा शिवसेनेचा सवाल आहे. शिक्षक भारतीने यापुढे जात हे सर्व पक्ष शिक्षणाच्या खाजगीकरणाचा पुरस्कार करणारे आहेत, असा ठपका ठेवल्याने शैक्षणिक मुद्द्यांची राळ उडाली आहे. (विशेष प्रतिनिधी)दारूकारण आणले! : सुशिक्षित मतदारांच्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी अर्थकारणासोबत दारूकारणही आणले आहे. हे सर्व पक्ष खाजगीकरणाचा पुरस्कार करणारे आहेत. त्यामुळे ते शिक्षकांचे प्रश्न किती मांडणार आणि कसे सोडविणार? - कपिल पाटील, शिक्षक आमदार‘फक्त स्नेहभोजन’शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांसाठी मद्याच्या पार्ट्या होत असल्याच्या वृत्ताबाबत कानावर हात ठेवले. कोण करतेय असे, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. आम्ही चर्चा, स्नेहभोजनावर भर दिल्याचे ते म्हणाले. रिंगणातील उमेदवार : या निवडणुकीसाठी शिक्षक परिषदेतर्फे वेणूनाथ कडू, शिक्षक भारतीने अशोक बेलसरे, शिक्षक सेनेने ज्ञानेश्वर म्हात्रे, शेकापने बाळाराम पाटील यांना संधी दिली आहे. मुदत पूर्ण होणारे आमदार रामनाथ मोते बंडखोर करून उभे आहेत. अशोक बहिरव, केदार जोशी, महादेव सुळे, नरसू पाटील, मिलिंद कांबळे हेही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. अमर्याद खर्च, उमेदवार ‘सोशल’ सुशिक्षितांचा मतदारसंघ असल्याने आणि सुसंस्कृतपणे निवडणूक लढविली जाईल हे गृहित असल्याने या निवडणुकीत आयोगाने खर्चाला मर्यादा घातलेली नाही. त्यामुळे काही उमेदवारांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्याची वर्णने केली जात होती. एकीकडे उपस्थितीसाठी विद्यार्थ्यांबरोबर सेल्फीला शिक्षकांचा विरोध असला, तरी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पसरलेल्या या मतदारसंघातील प्रचारासाठी यंदा सोशल मीडियाचा भरपूर वापर झाला. माहितीचे मेल, नियमित व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर कामाचे तपशील टाकत उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. अशा प्रचारासाठी परवानगीचे आयोगाचे बंधन होते. प्रचार आज संपणार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार बुधवार, १ फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. मतदान शुक्रवारी, ३ फेब्रुवारीला, तर मतमोजणी सोमवारी, ६ फेब्रुवारीला होणार आहे. पसंतीक्रम मतदान पद्धत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत त्याची रंगीत तालीमही करण्यात आली. संस्थाचालकांचा दबावनिवडून येणाऱ्या उमेदवाराने आपले प्रश्न सोडवावे, यासाठी यंदा अनेक संस्थाचालकांनी आपल्या शब्दाखातर एकगठ्ठा मते द्यावी, यासाठी मतदारांना म्हणजेच शिक्षकांना सुचवले आहे. बैठका घेऊन त्यांनी ‘संस्थेचे हित’ कशात आहे, त्याची माहिती दिली. ठिकठिकाणी अशा बैठका झाल्याचे वृत्त आहे.भाजपांतर्गत संघर्षाची किनारनागरपूरमधील निवडणुकीत, प्रचारात मनपासून रस घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणच्या निवडणुकीकडे फारसे लक्ष न दिल्याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरू होती. एक तर विनोद तावडे यांचा प्रभाव असलेला हा परिसर असल्याने काही नेत्यांनी जाणीवपूर्वक प्रचारात रस घेतला नसल्याचे बोलले जात होते.भेटवस्तू, गाड्या, पार्ट्या यंदाच्या निवडणुकीत मतदारांना घरपोच भेटवस्तू दिल्याचीही चर्चा शिक्षकांत आहे. ज्यांचा अद्याप निर्णय झालेला नाही किंवा ज्यांनी विशिष्ट पक्षाची बांधिलकी मानलेली नाही, अशा मतदारांना त्याचा लाभ झाल्याचे समजते. शिवाय मतदान जवळ आल्याने गेला आठवडाभर पार्ट्या दणक्यात सुरू होत्या. मतदानावेळी केंद्रावर शिक्षकांना आणण्यासाठी काही उमेदवारांनी खास गाड्यांची व्यवस्था केल्याचेही सांगितले जात होते.