शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

ई-पॉसवर अंगठा; लाभार्थ्यांना वाढणार कोरोनाचा धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 23:45 IST

शिधावाटप दुकानदारांचा संप : अन्नधान्यापासून नागरिक वंचित

सुरेश लोखंडे

ठाणे : गोरगरीब, मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिधापत्रिकाधारकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून मोफत अन्नधान्यवाटप शिधावाटप दुकानांतून करण्यात येत आहे. परंतु, सध्याचा कोरोनाचा कहर पाहता ई-पॉसवर अंगठा घेऊन अन्नधान्यवाटप केले जात आहे. यामुळे दुकानदार, शिधापत्रिकाधारकांच्या जीवावर कोरोनाचा संसर्ग बेतण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासह मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामीण भागांत काही ठिकाणी दुकानदारांनी शनिवारी संप केला.

रेशनवर प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहे. जिल्ह्यातील एकूण साडेबारा लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. शहरांत शनिवारपासून या अन्नधान्यवाटपाला प्रारंभ झाला आहे. ब्रेक द चेनअंतर्गत घातलेल्या कडक निर्बंधांमुळे मागील १५ दिवसांपासून अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी १५ मेपर्यंत वाढवल्याने गरीब, मजूरवर्गांपुढील समस्या गंभीर बनल्या आहेत. कामधंदा बंद झाल्यामुळे गोरगरीब कार्डधारकांना किराणा भरता आलेला नाही. त्यामुळे मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन दुकानांवर गर्दी वाढणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. तसेच ई-पॉस मशीनवर प्रत्येक कार्डधारकांचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाणार आहे. त्यातून कोरोना पसरण्याची भीतीही लाभार्थी व दुकानदारांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, दुकानदारांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामीण भागातील दुकानदारांनी शनिवारी संप पुकारला. त्यामुळे अन्नधान्यवाटप थांबले असल्याचे मुरबाड तालुक्यात आढळून आले. परिणामी, या अन्नधान्याच्या लाभापासून ग्रामीण भागातील नागरिक वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांत पाच लाख ग्रामस्थ, आदिवासी जनता या अन्नधान्याचे लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील या शहरी भागात साडेसात लाख कार्डधारकांपैकी अंत्योदय योजनेचे १३ हजार २३० लाभार्थी आहेत.

दुकानांवर सामाजिक अंतर पाळूनच अन्नधान्य वाटप होत आहे. आजपासून ठिकठिकाणी वाटप सुरू झाले आहे. १ तारखेपर्यंत सर्व दुकानांवर धान्यपुरवठा होऊन ते पुरवण्यात येत आहे. ग्रामीणमधील काही दुकानदारांमध्ये संभ्रम आहे. पण, ई-पॉजऐवजी दुकानदारांच्या ओळखीने कार्डधारकास अन्नधान्य वाटप करण्याची त्यांची एक मागणी मान्य केली आहे.    - राजू थोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे.

आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. त्यामुळे दुकानदारांमध्ये संताप आहे. मागण्यांसाठी ५ मेपर्यंत सर्व रास्त भाव दुकानदार संपावर असल्याने दुकाने बंद आहेत.    - गणपत देऊ कराळे, अध्यक्ष, रास्त     भाव दुकानदार संघटना, मुरबाड     तालुका

टॅग्स :thaneठाणे