शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत तीन आदिवासी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यु अंत्यसंस्कारानंतर पोहोचले पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:26 IST

भिवंडीत तीन आदिवासी मुलींचा पाण्यात बुडून मृत्युअंत्यसंस्कारानंतर पोहोचले पोलीसभिवंडी : तालुक्यातील कांबे गावात पिलानी पाडा येथे रहाणा-या आदिवासी कुटूंबातील तीन मुली आंघोळीस गेल्या असता खदानीच्या डबक्यातील पाण्यात बुडून मरण पावल्या.ही घटना घडल्यानंतर शोकाकुल झालेल्या कुटूंबीयांनी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचल्याने परिसरांत संताप व्यक्त केला जात आहे.निता चैत्या फकाट(१४) ,रोहिता ...

ठळक मुद्देआदिवासी कुटूंबातील तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यु मावशी व तीच्या दोन भाच्यांचा मृत्यु झाल्याने शोकाकुलएकमेकींना वाचविताना तीघीजणी पाण्यात पडून बुडाल्या

भिवंडीत तीन आदिवासी मुलींचा पाण्यात बुडून मृत्युअंत्यसंस्कारानंतर पोहोचले पोलीसभिवंडी : तालुक्यातील कांबे गावात पिलानी पाडा येथे रहाणा-या आदिवासी कुटूंबातील तीन मुली आंघोळीस गेल्या असता खदानीच्या डबक्यातील पाण्यात बुडून मरण पावल्या.ही घटना घडल्यानंतर शोकाकुल झालेल्या कुटूंबीयांनी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचल्याने परिसरांत संताप व्यक्त केला जात आहे.निता चैत्या फकाट(१४) ,रोहिता रवी मांगात(१३) व रसिका रवी मंगात(१२) असे तीन बुडालेल्या मुलींची नांवे असून निता फकाट ही रोहिता व रसिका या दोन मुलींची मावशी आहे. त्यापैकी निताने शाळेत जाण्याचे सोडले होते. तर रोहिता व रसिका या दोन्ही बहिणी खोणी गावातील मराठी विद्यालयांत ७वीत शिकत होत्या.त्यांच्या परिक्षा झाल्याने त्यांना सुट्टी लागली होती. घरांतील कुटूंब मोलमजूरीस गेले असता त्या तिघी सोमवारी दुपारच्या वेळेस आपल्याच शेतातील खदानीच्या डबक्यात साचलेल्या पाण्यात आंघोळीस गेल्या होत्या. त्यावेळी डबक्यातीलखोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यामधील एक मुलगी खड्ड्यातील पाण्यात बुडायला लागली.तेंव्हा एकमेकींना वाचविताना तीघीजणी पाण्यात पडून बुडाल्या. ही घटना तेथे खेळत असलेल्या लहान मुलांनी पाहिली आणि त्यांना वाचविण्याच्या हेतूने मुलींच्या घरी जाऊन झालेली घटना सांगीतली. तेंव्हा गावातील मुलांनी त्या तिघींना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारून तिघींना पाण्याबाहेर काढले. परंतू तो पर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. ही घटना झाल्यानंतर परिसरांतील आदिवासींनी मिळून त्यांच्या मृतदेहावर सोमवारी रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार केले. त्यानंतर ही घटना निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीसांना समजली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र ही घटना होऊन चोवीस तास उलटून झाल्यानंतरही पोलीस ठाण्याच्या डायरीत मुलींच्या बुडून मृत्यु पावल्याची नोंद केलेली नव्हती.तसेच कांबा गावातील पोलीस पाटलाने देखील याबाबत पोलीसांना महिती दिली नाही. त्यामुळे परिसरांत पोलीसांच्या कार्यपध्दतीबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

 

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात