शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
"I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
5
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
6
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
7
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
8
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
9
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
10
वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
11
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
12
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
13
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
14
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
15
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
16
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
17
चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?
18
मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
20
"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत तीन आदिवासी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यु अंत्यसंस्कारानंतर पोहोचले पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:26 IST

भिवंडीत तीन आदिवासी मुलींचा पाण्यात बुडून मृत्युअंत्यसंस्कारानंतर पोहोचले पोलीसभिवंडी : तालुक्यातील कांबे गावात पिलानी पाडा येथे रहाणा-या आदिवासी कुटूंबातील तीन मुली आंघोळीस गेल्या असता खदानीच्या डबक्यातील पाण्यात बुडून मरण पावल्या.ही घटना घडल्यानंतर शोकाकुल झालेल्या कुटूंबीयांनी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचल्याने परिसरांत संताप व्यक्त केला जात आहे.निता चैत्या फकाट(१४) ,रोहिता ...

ठळक मुद्देआदिवासी कुटूंबातील तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यु मावशी व तीच्या दोन भाच्यांचा मृत्यु झाल्याने शोकाकुलएकमेकींना वाचविताना तीघीजणी पाण्यात पडून बुडाल्या

भिवंडीत तीन आदिवासी मुलींचा पाण्यात बुडून मृत्युअंत्यसंस्कारानंतर पोहोचले पोलीसभिवंडी : तालुक्यातील कांबे गावात पिलानी पाडा येथे रहाणा-या आदिवासी कुटूंबातील तीन मुली आंघोळीस गेल्या असता खदानीच्या डबक्यातील पाण्यात बुडून मरण पावल्या.ही घटना घडल्यानंतर शोकाकुल झालेल्या कुटूंबीयांनी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचल्याने परिसरांत संताप व्यक्त केला जात आहे.निता चैत्या फकाट(१४) ,रोहिता रवी मांगात(१३) व रसिका रवी मंगात(१२) असे तीन बुडालेल्या मुलींची नांवे असून निता फकाट ही रोहिता व रसिका या दोन मुलींची मावशी आहे. त्यापैकी निताने शाळेत जाण्याचे सोडले होते. तर रोहिता व रसिका या दोन्ही बहिणी खोणी गावातील मराठी विद्यालयांत ७वीत शिकत होत्या.त्यांच्या परिक्षा झाल्याने त्यांना सुट्टी लागली होती. घरांतील कुटूंब मोलमजूरीस गेले असता त्या तिघी सोमवारी दुपारच्या वेळेस आपल्याच शेतातील खदानीच्या डबक्यात साचलेल्या पाण्यात आंघोळीस गेल्या होत्या. त्यावेळी डबक्यातीलखोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यामधील एक मुलगी खड्ड्यातील पाण्यात बुडायला लागली.तेंव्हा एकमेकींना वाचविताना तीघीजणी पाण्यात पडून बुडाल्या. ही घटना तेथे खेळत असलेल्या लहान मुलांनी पाहिली आणि त्यांना वाचविण्याच्या हेतूने मुलींच्या घरी जाऊन झालेली घटना सांगीतली. तेंव्हा गावातील मुलांनी त्या तिघींना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारून तिघींना पाण्याबाहेर काढले. परंतू तो पर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. ही घटना झाल्यानंतर परिसरांतील आदिवासींनी मिळून त्यांच्या मृतदेहावर सोमवारी रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार केले. त्यानंतर ही घटना निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीसांना समजली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र ही घटना होऊन चोवीस तास उलटून झाल्यानंतरही पोलीस ठाण्याच्या डायरीत मुलींच्या बुडून मृत्यु पावल्याची नोंद केलेली नव्हती.तसेच कांबा गावातील पोलीस पाटलाने देखील याबाबत पोलीसांना महिती दिली नाही. त्यामुळे परिसरांत पोलीसांच्या कार्यपध्दतीबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

 

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात