शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आरटीईच्या तीन हजार ९५७ बालकांचे पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:47 IST

आरटीईव्दारे जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित ठेवलेले आहेत. त्यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी प्रवेश अर्ज दाखल केले होते. त्यातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी प्रवर्गातील १३ हजार ४०० बालकांची या आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी निवड झाली आहे. यातून पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली.

ठळक मुद्दे ६५२ शाळांमध्ये पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेशपहिल्या सोडतमधील या बालकांचे निश्चित झालेले प्रवेश एक किमी. अंतरावरील शाळांमध्ये झाले २० मेनंतर होणा-या दुस-या फेरीत प्रवेश

ठाणे : ‘शिक्षणाचा हक्क’ (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील अनुदानीत, विना अनुदानतीत, स्वयंअर्थसहाय्य आदी उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या ६५२ शाळांमध्ये पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. यापैकी पहिल्या फेरित तीन हजार ९५७ बालकांचा प्रवेश निश्चित झाला. उर्वरित विद्यार्थ्यांना २० मेनंतर होणा-या दुस-या फेरीत प्रवेशासाठी निवड केली जाणार आहे.आरटीईव्दारे जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित ठेवलेले आहेत. त्यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी प्रवेश अर्ज दाखल केले होते. त्यातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी प्रवर्गातील १३ हजार ४०० बालकांची या आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी निवड झाली आहे. यातून पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली. यातील चार हजार ६२० विद्यार्थी - विद्यार्थिनींची पहिलीच्या वर्गासाठी झाली होती. यातून तीन हजार १९० बालकांचे आता पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले. उर्वरित २४ बालकांचे प्रवेश अर्ज विविध कागदपत्रांच्या उपलब्धते अभावी रद्द झाले. तर एक हजार ४०५ बालकांचे संबंधीत पालक दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलेच नाही.या पहिलीच्या वर्गातील प्रवेशाप्रमाणेच पूर्व प्राथमिक म्हणजे केजीच्या वर्गातील प्रवेशासाठी एक हजार २७६ विद्यार्थी - विद्यार्थिनींची पहिल्या फेरीत निवड झाली होती. त्यातून ७६७ बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळांवर निश्चित झाले. नवी मुंबईतील तीन आणि ठाणे येथील दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले. उर्वरित ५०२ बालकांचे वडील दिलेल्या शाळांवर जावून बालकांचे प्रवेश घेऊ शकले नसल्याचे निदर्शनात आले. यामध्ये मीरा भार्इंदर मनपा क्षेत्रातील २२१, ठाणे मनपा क्षेत्रातील १०३ विद्यार्थी, ठाणे मनपा १ मधील ६५, अंबरनाथ ५२, भिवंडी मनपातील २६, कल्याण ग्रामीण ११, कल्याण शहर २ , उल्हासनगर १२ आणि शहापूर येथील दहा विद्यार्थ्यांचे पालक दिलेल्या शाळांवर प्रवेशासाठी गेले नाही. यामुळे या बालकांचे प्रवेश रखडले आहेत.पहिल्या सोडतमधील या बालकांचे निश्चित झालेले प्रवेश एक किमी. अंतरावरील शाळांमध्ये झाले आहेत. यानंतर दुसºया सोडतमध्ये १ ते तीन किमी.च्या अंतरावरील शाळांमधील प्रवेशासाठी बालकांची निवड होणार आहे. या दुसºया सोडतीमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतरही विद्यार्थी शिल्लक राहिल्यास तीन किमी. पेक्षा अधीक लांबच्या शाळांमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. झाली आहे. जिल्ह्याभरात ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात होणार आहेत. त्यापैकी पहिल्या सोडतव्दारे तीन हजार १९० बालकांचे पहिलीच्या वर्गात प्रवेश झाल आहेत.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद