शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली एक महिला मयत,तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:34 IST

भिवंडी : तालूक्यातील खाडीपार -रसुलाबाग भागात एकता चौकजवळ तीन मजली इमारत रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेजारील चाळीवर कोसळली असुन या दुर्घटनेत एक महिला मयत असून एका मुलीसह दोन महिला असे एकुण तीनजण जखमी झाले असून त्यांना शहरातील इंदिरांगांधी उपजिल्हा रूग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.इमारतीच्या ढिगाऱ्याखाली याकूब कुटूंबातील तीन जण अडकल्याची ...

ठळक मुद्देखाडीपार -रसुलाबाग भागात तीन मजली इमारत रात्री शेजारील चाळीवर कोसळलीग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी आज दुपारी मिटींग घेऊन इमारतीतील सर्वांना बाहेर काढलेग्रामपंचायतीने अनाधिकृत व धोकादायक जाहिर केली होती

भिवंडी : तालूक्यातील खाडीपार -रसुलाबाग भागात एकता चौकजवळ तीन मजली इमारत रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेजारील चाळीवर कोसळली असुन या दुर्घटनेत एक महिला मयत असून एका मुलीसह दोन महिला असे एकुण तीनजण जखमी झाले असून त्यांना शहरातील इंदिरांगांधी उपजिल्हा रूग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.इमारतीच्या ढिगाऱ्याखाली याकूब कुटूंबातील तीन जण अडकल्याची माहिती परिसरांतील लोकांनी दिली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.खैरूनिसा इस्माईल सय्यद(२५)या महिलेचा ढिगाºयाखाली मृत्यु झाला असून कुमारी शेख मरीयम जरार(९),साफीयाबी युसुफ सरदार(६०)मेहरूनिस्सा शेख (४०)या तीनजणी इमारतीच्या दुर्घटनेत जखमी झाल्या आहेत. जखमींवर इंदिरागांधी रूग्णालयांत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदर इमारत ही सात वर्षापुर्वी फौजान सुसे या बिल्डरने बांधली असून ती गेल्या महिन्यात अनाधिकृत व धोकादायक इमारत म्हणून खोणी ग्रामपंचायतीने घोषित केली आहे.ही इमारत पाडण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व एमएमआरडीए यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.परंतू संबधित विभागाने कोणतीही कारवाई केली नाही,अशी माहिती खोणी ग्रामपंचायतीचे सरपंच अल्ताफ शेख याने घटनास्थळी दिली.आज दुपारी या इमारतीची भिंत कोसळल्याने दुपारी खोणी ग्रामपंचायतीचे सरपंच अल्ताफ व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून घेतलेल्या मिटींगनंतर या इमारतीतील सर्व कुटूंबांना बाहेर काढले.त्यामुळे प्राणहानी टळली आहे. परंतू याकुब कुटूंब इमारती बाहेर न पडल्याने त्यांच्या घरातील तीन सदस्य ढिगाºयाखाली अडकल्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली. आज रात्री नऊ वाजता सदर इमारतीचा पुढील भाग शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळीतील लहान मुलीसह तीन महिला जखमी झाल्या आहेत.इमारतीचा काही भाग शौचालयांवर कोसळल्याने त्यामधून दोन पुरूषांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. दुर्घटनेनंतर पालिकेचे आपत्त्कालिन व्यवस्थापन व अग्निशामकदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ढिगाºयाबाहेर काढून उपचारासाठी पाठविले. दरम्यान तहसिलदार शशिकांत गायकवाड यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलास पाचारण केले असून ते रात्री ११-३० वाजता घटनास्थळी पोहोचून त्यांनी मदतकार्य सुरू केले. दुर्घटनेनंतर परिसरांतील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

टॅग्स :BhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना