शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सिग्नल यंत्रणेत बिघाडाने रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 05:58 IST

कळवा रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली होती. धिम्या मार्गावरील या घटनेने दिवसभर वाहतुकीचा खेळखंडोबा झाला.

मुंबई/डोंबिवली : कळवा रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली होती. धिम्या मार्गावरील या घटनेने दिवसभर वाहतुकीचा खेळखंडोबा झाला.त्याआधी सकाळपासूनच कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक अर्ध्या तासाच्या विलंबाने धावत होती. त्याचा फटका दुपारच्या सत्रात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला. त्यामुळे धिम्या मार्गावरील प्रवाशांना त्याचा जास्त फटका बसला.सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ३० ते ४० मिनिटांनी उशिराने चालविण्यात येत होत्या. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. कळवा मार्गावर काही काळ दिवापर्यंत लोकल उभ्या होत्या. त्यामुळे दुपारच्या वेळेत डोंबिवली, दिवा, कल्याण तसेच अन्य स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे दीड ते चार या वेळेत मुंबई दिशेकडे जाणाºया लोकलमध्ये गर्दी झाली होती. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाली. पण त्या १५ मिनिटांत वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने संध्याकाळपर्यंत लोकलचा वेग मंदावला होता.मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम केले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कळवादरम्यान दुपारी अर्धा तास सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे लोकलसेवेवर परिणाम झाला होता, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग यांनी दिली.>मेगाब्लॉक घेऊनही रडगाणे सुरूचप्रत्येक रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. या वेळी सिग्नल यंत्रणा, रेल्वे मार्ग, ओव्हर हेड वायर यांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. मात्र तरीदेखील मेगाब्लॉकच्या दुसºया आणि तिसºया दिवशी रेल्वे मार्गात तांत्रिक अडचणी येत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.