शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घर वापसी झालेल्या तिघा वरीष्ठ निरीक्षकांची पूर्वीच्या पोलीस ठाण्यातच पुनर्स्थापना

By धीरज परब | Updated: January 13, 2025 23:02 IST

१० पोलीस ठाण्याचे प्रभारी अखेर वपोनि म्हणून कायम

धीरज परब

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ पोलीस निरीक्षकां पैकी संजय हजारे यांची मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून तर  जितेंद्र वनकोटी यांची पेल्हार आणि राजेंद्र कांबळे यांची काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून सोमवारी नियुक्ती केली गेली आहे . तर तेथील पोलीस निरीक्षकांची अन्य पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून उर्वरित १० पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना त्याच पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कायम केले आहे . 

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या आदेशा नुसार ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पोलीस आयुक्तालयातील ३८ पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या गेल्या होत्या .  मात्र त्या बदल्या अन्यायकारक आणि चुकीच्या असल्याचा दावा करत अनेक पोलीस निरीक्षक मॅट मध्ये गेले होते . 

निवडणुकीत मुंबई आदी भागातुन बदली होऊन आलेल्या पोलीस निरीक्षकांची पोलीस ठाण्यात नियुक्ती करताना ती तात्पुरती म्हणून केले गेली होतीच शिवाय पोलीस ठाणे प्रभारी म्हणून देखील उल्लेख केला नव्हता . केवळ तुळींज पोलीस ठाण्यात प्रमोद तावडे यांची वपोनि म्हणून नियुक्ती होती . अश्या प्रकारच्या आदेशाची चर्चा देखील रंगली . परंतु सेवा ज्येष्ठते प्रमाणे पोलीस निरीक्षकांनी पदभार घेतला . 

दरम्यान मिभा - ववी आयुक्तयातून बदली केलेल्यां पैकी संजय हजारे , जितेंद्र वनकोटी, राजेंद्र कांबळे , चंद्रकांत सरोदे , विलास सुपे , दिलीप राख व सुधीर गवळी ह्या ७ पोलीस निरीक्षकांची ३१ डिसेम्बर रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने पुन्हा घरवापसी केली होती . ९ जानेवारी रोजी हे सर्व ७ अधिकारी पोलीस आयुक्तालयात हजर झाले होते . 

संजय हजारे , जितेंद्र  वनकोटी व राजेंद्र कांबळे यांची अपेक्षेप्रमाणे पूर्वीच्या पोलीस ठाण्यात वपोनि म्हणून नियुक्ती केली गेली आहे . विलास सुपे यांना आर्थिक गुन्हे शाखेत तर चंद्रकांत सरोदे यांना नियंत्रण कक्षात वपोनि म्हणून नेमले आहे . 

काशीमीरा पोलीस ठाण्याचे प्रभारी लालू तुरे यांना विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तर मांडवी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रकाश कावळे यांना बोळींज वपोनि म्हणून नेमले आहे . अमली पदार्थ विरोधी शाखेचे अमर मराठे यांना आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून बदलले आहे . 

तर मीरारोड पोलीस ठाण्याच्या मेघना बुरांडे , काशीगावचे महेश तोगरवाड , नया नगरचे अमर जगदाळे, उत्तनचे शिवाजी नाईक , नायगावचे  विजय कदम , माणिकपूरचे हरिलाल जाधव, वालिवचे दिलीप घुगे, आचोळेचे सुजितकुमार पवार , नालासोपाराचे विशाल वळवी व वसई पोलीस ठाण्याचे बाळकृष्ण घाडीगावकर यांना आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्याच पोलीस ठाण्यात कायम केले आहे . 

अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी सदर बदल्या व नियुक्त्यांचे आदेश सोमवार १३ जानेवारी रोजी जारी केले आहेत .

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे